अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आता त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? त्यांच्याकडून पैसे परत घेणार का? यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, ३१ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
Read More
अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच काही सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब लक्षात आली असून तेव्हापासूनच त्यांना लाभ देण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवार, २४ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
MPs will be representing the government abroad, the message that there is political consensus in India regarding this action will be sent abroad as well विरोधी पक्षांमधील फाटाफुटीचा आणि काही पक्षांतील आंतरिक दुफळीचा अचूक वापर करून मोदी यांनी काही विरोधकांच्या पाकिस्तानवादी भूमिकेला छेद दिला. परदेशात हे खासदार सरकारचीच भूमिका मांडणार असल्याने परदेशांतही भारतात या कारवाईबद्दल राजकीय एकमत असल्याचा संदेश जाईल. शिवाय, शिष्टमंडळातील विरोधी खासदारांच्या अंतर्भावामुळे भारतात खर्या अर्थाने लोकशाही नांदत असल्याचेही
( Important meeting state government ) भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
Some Muslim women were seen they are so fond of Pakistan, then why do they live in India The Indian government needs to take action against these पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवू नये, म्हणून भारतातच भारतीयांशी भांडण-वाद करणार्या काही मुस्लीम महिला दिसल्या. कोण आहेत या? यांना पाकिस्तानचा इतका पुळका आहे, तर त्या भारतात का राहतात? या महिलांवर भारत सरकारने तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. पदरातले निखारे नव्हे, तर देशाला पोखरणार्या मानवीरूपातील वाळवी आहेत या बायका! असे हे लोक!
र्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा आदेश, मंगळवार दि. ६ मे रोजी दिला आहे. न्यायालयाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासंहित निवडणूका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्याच्या सुनावणी दरमान्य दिले आहेत.
( Actor Nagarjuna presence WAVES 2025 Summit ) शिखर संमेलनात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांनी उपस्थित राहून या मंचाला विशेष महत्त्व प्राप्त करून दिलं. विविध राज्यांतून आणि सर्जनशील क्षेत्रांमधून आलेल्या प्रतिनिधींनी या संमेलनात एकत्र येत भारताच्या चित्रपट आणि माध्यमसृष्टीच्या भविष्यावर विचारमंथन केलं.
India is rapidly advancing in the manufacturing sector, and the central government has announced a National Manufacturing Mission to strengthen this sector उत्पादन क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे येत असून, या क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय उत्पादन अभियानाची घोषणा केली आहे. सेवा क्षेत्राच्या मर्यादा लक्षात घेता, उत्पादन क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होते. चीनला समर्थ पर्याय म्हणून बहुसंख्य राष्ट्रे भारताकडे आशेने बघत आहेत. अशावेळी, ही योजना म्हणूनच महत्त्वाची ठरते.
( Sri Chakradhar Swami ) महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
देशाच्या ईशान्य भागात मोदी सरकारच्या काळात, सकारात्मक बदल दिसून येत आहेत. यामागे सातत्याने, मोदी सरकारचे प्रयत्न कारणीभूत आहेत. याआधीही ईशान्य भारतासाठी निर्णय घेतले गेले, मात्र ते सारेच सुरक्षेच्या दृष्टीने होते. मात्र, मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे ईशान्य भारताला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या उद्देशाने होते. मोदी सरकारच्या या प्रयत्नांमुळे बदललेल्या ईशान्य भारताचा घेतलेला हा आढावा...
(Pope Francis Death) सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या दीर्घ आजारानंतर सोमवार दि. २१ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्रक जारी केले असून त्याद्वारे पोप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्ग प्रतिष्ठित " स्कॉच २०२५" पुरस्काराने सन्मानित
( Bengal government involved in corruption Teachers protest ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ भ्रष्टाचारात सामील असून आम्हाला त्यांनी केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप दिला आहे, अशी जळजळीत टिका नोकरी गमवावी लागलेल्या शिक्षिका सुमन बिस्वास यांनी केली आहे.
( Bangladesh government leader Mohammad Yunus ) “बांगलादेशचे तुकडे करून ईशान्य भारताला समुद्राशी जोडावे,” अशा शब्दांत ईशान्य भारतातील नेत्यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना सुनावले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा हवाला देत चीनला आपली अर्थव्यवस्था वाढवण्याचे आवाहन केले होते. या विधानाचा भारताकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
भारतीय बँकांनी यावर्षी भांडवल निर्मितीत मोठा उच्चांक गाठला आहे. बँकांसाठी भांडवलनिर्मितीसाठीचे महत्वाचे साधन असलेल्या ठेव प्रमाणपत्रांच्या माध्यमातून भारतीय बँकांनी तब्बल १.१७ लाख कोटी रुपये उभारले आहेत
१० हजार चौ.फु. शासकीय जमिनीवर 'हिरवे' अतिक्रमण - संजय उपाध्याय
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
यंदा देशात बहुतांश ठिकाणी होळी आणि धुलिवंदनाचा सण शांततामय वातावरणात पार पडला असला तरी, झारखंडमध्ये मात्र धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर केलेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले.
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
Maharashtra Budget 2025 राज्य सरकार एक जिल्हा एक उत्पादन योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे आता प्रत्येक जिल्हा हा निर्यात केंद्र बनणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच आता निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरीता राज्याने 'महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-2023' जाहीर केले असून राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, 8 कृषि निर्यात क्षेत्रे, निर्यातकेंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत. त्यामुळे, देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान 15.4 टक्के झाले आहे. याशिवाय “एक जिल्हा-एक उत्पादन”, ज
(minister dharmendra pradhan on NEP DMK government ) राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून (एनईपी) द्रमुक सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केला. त्याचवेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी द्रमुकवर तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा पलटवार केला.
विधानसभेत राज्य सरकारकडून माहिती
ब्रिटिशकालीन जागतिक वारसा इमारती मुंबईची शान वाढवत असताना, आज मुंबई कोस्टल रोड, अटल सेतू, वांद्रे-वरळी सी लिंक यांसारखे भव्य अभियांत्रिकी अविष्कारही जागतिक स्तरावर आपली मान उंचावत आहेत. अशावेळी मुंबईतील १०० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जीर्णावस्थेत असलेल्या मुंबईतील अनेक रेल्वे आणि रस्ते उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या सौंदर्यात भर घालणार्या प्रस्तावित चार रस्ते उड्डाणपुलांचा आढावा घेणारा लेख.
झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असले, तरी त्यास अद्याप यश आलेले नाही. झाकीर नाईकविरुद्ध ठोस पुरावे देण्याची मलेशिया सरकारची मागणी आहे. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने झाकीर नाईकविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले असून, त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेतच.
देशात महाकुंभमेळ्याने धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवले असताना, देहरादून येथे मात्र क्रीडासंस्कृतीचे दर्शनही अनुभवायला मिळाले. देहरादून येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडामहोत्सवामुळे, देशातील क्रीडासंस्कृती तसेच या स्पर्धेला उपस्थित असलेल्या, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यामुळे सरकारची क्रीडासंस्कृतीविषयी असलेली वचनबद्धताही अधोरेखित झाली.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बुकावूमध्ये ‘एम २३’ गटाच्या बंडखोरांनी घुसखोरी केली असून, त्यांनी बुकावूच्या उत्तरेकडील विमानतळ आपल्या ताब्यात घेतले आहे. सोबतच त्यांनी गोमा शहरही आपल्या ताब्यात घेतले. गोमा येथे भारतीय लष्कराच्या मेडिकल कॉर्प्सचे एकूण ८० सैनिक आणि अधिकारी सध्या उपस्थित आहेत. हे सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेचा एक भाग म्हणून काम करतात. या बंडखोरांनी शांतीसेनेच्या लेव्हल थ्री फील्ड हॉस्पिटल असलेल्या कॅम्पला वेढा घातला. त्यामुळे हे ‘एम २३’ प्
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीतच लढणार, असे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
ITI कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम' अर्थात 'ट्रेन द टीचर्स' या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून, विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
‘लार्सन आणि टुब्रो कंपनी’चे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी नुकतेच मजुरांबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. एकप्रकारे सरकारी योजनांच्या यशाची ती कबुलीच होती. मात्र, त्यात मजुरांच्या परिस्थितीचा विचारही नव्हता हे तितकेच सत्य. श्रमसन्मानाचे करण्याचे वातावरण देशात निर्माण होण्याची गरज या विधानाने अधोरेखित केली आहे.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ( Mahad's Super Specialty Hospital ) उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार
सर्व कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार
महाकुंभमेळ्यामुळे संघटित होत असलेले हिंदू मन लक्षात घेऊन पूर्वश्रमीचे पापक्षालन करण्याच्या हेतूने, गंगासागर मेळाव्याच्या जाहिराती देत हिंदूंसाठी पश्चिम बंगाल सरकार किती कष्ट घेते हे दाखवण्याचा उद्योग ममता बॅनर्जी ( Mamata Government ) यांनी चालवला आहे. मात्र, देशातील समस्त हिंदू संत ‘काय भुललासी वरलिया रंगा’ ही चोखोबांची शिकवण मनात दृढ धरून आहेत.
मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते व पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले जाते. परंतु त्या दिवशी या महापुरुषांच्या प्रतिमेसह त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे फलक ठेवण्यात येत नव्हते. त्यामुळे सर्व सामान्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्राबाबत योग्य माहिती मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने थोर महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलक सुद्धा लावाव
(Kanpur) कानपूरच्या शिवराजपूरमधील बराजपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर रिकामा गॅस सिलडर आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. रेल्वे पोलीस आणि जीआरपीने गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. बुधवारी जीआरपीच्या एसपीने घटनास्थळी तपासणी केली. रेल्वे पोलीसांनी गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
नवी दिल्ली : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’ने (विहिंप) ( VHP ) गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी देशभरात जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.
( Dr. Manmohan Singh Death) माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर आता नवनिर्वाचित मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने ( government residences ) आणि कार्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चित्रकुट, तर विखे पाटलांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे.
ठाणे : पदोन्नती आणि प्रशासकिय बदल्यासाठी वस्तु व सेवा कर (जीएसटी) ( GST ) विभागांतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवार २० डिसेंबर रोजी ठाणे जीएसटी कार्यालयात दोन तास काम बंद आंदोलन केले. महाराष्ट्र वस्तु व सेवा कर कर्मचारी संघटना, मुंबई या संघटनेच्या माध्यमातून गेले तीन दिवस महाराष्ट्रभर हे कामबंद आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत काम ठप्प झाल्याने ठाणे जीएसटी कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.
Beef Ban आसाम भाजप सरकारने गोमांसवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी याची घोषणा केली. ते म्हणाले की, राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये गोमांसवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोमांसचा वापर करू शकत नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले की, याआधी मंदिराच्या ५ किलोमीटरच्या अंतरावर गोमांस खाण्यास बंदी होती, मात्र आता संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी याप्रकरणात व्यप्ती वाढवली जात आहे.
Muhammad Yunus बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर हिंदूंवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे. काही दिवसांआधी इस्कॉनशी संलग्न असलेले धर्मगुरू चिन्मय कृष्णादास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता बांगलादेश सरकारने यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. अंतरिम सरकारचे मुहम्मद युनूस यांचे सचिव आलम यांनी माहिती दिली आहे. आलम म्हणाले, की त्यांच्या सरकारला भारताबाहेर चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या ढाका येथील दौऱ्याआधी
मुंबई : सरकार स्थापन करताना गावाला यायचे नाही? असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो. निवडणुकीत एवढे दौरे आणि प्रचार झाले. निवडणूक आम्ही महायुती मोठ्या मताधिक्यांनी जिंकलो, अशी माहिती राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की, मी नेहमी सांगायचो की, जनता आम्हाला कामाची पावती देईल. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळात कामे थांबवल
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने प्राप्तिकर विभागाच्या परमनंट अकाऊंट नंबर(पॅन) 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वापरकर्ता कार्यक्षम बनवून ते जारी करून व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया सुविहित आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील ७८ कोटी पॅन धारकांना कार्यक्षम सेवा देत करदात्यांच्या गरजांची पूर्तता करण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारने सरकारी इ-मार्केट(GeM) पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेती व बागकामासाठी दर्जेदार बियाण्यांच्या १७० श्रेणी विक्रीसाठी पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. पोर्टलवर आता बियाण्यांची सुमारे ८ हजार वाणे उपलब्ध असून येणाऱ्या शेतकी हंगामात राज्य तसेच केंद्रसरकारी कंपन्यांना देशभरात पुढील वितरणासाठी उपयोगी पडावीत यादृष्टीने रचना केली आहे.
तुमच्या आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? आणि महायुती सरकारने दोन वर्षांत काय केले हे होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी, आम्ही हिशोब द्यायला तयार असून तुम्ही काय केले ते सांगा अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अनुसूचित जाती (एससी) समुदायांसाठी अंतर्गत आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एक सदस्यीय आयोग स्थापन करून आवश्यक डेटा गोळा करत पुढील पावले उचलली जाणार आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला. आयोगाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कर्नाटकातील सर्व नोकऱ्या भरतींवर बंदी असताना काँग्रेस सरकार आरक्षणात आरक्षण आणत आहे.
कर्मचारी राज्य विमा योजना(ईएसआय) अंतर्गत आणखी नव्या कामगारांची नोंद झाली आहे. ईएसआय योजनेंतर्गत नव्या २०.७४ लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून यात तरूण वर्गाचा मोठा वाटा आहे.
राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ होत असतानाच महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणा(महारेरा)ने मोठा निर्णय घेतला आहे. महारेराने नुकतेच एक परिपत्रक जारी करून रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. नव्या निर्णयाच्या माध्यमातून ब्रोकरेज दस्तऐवजीकरण, वेळेवर पेमेंट सुनिश्चिती आणि कमिशनवरील विवाद कमी करण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) आर्थिक संकटात असलेल्या स्थितीत महाराष्ट्र सरकारने विविध घटकांना सवलत देत प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सवलत मुल्याची रक्कम एसटी महामंडळाला सुपूर्त केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणात काहीसा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लडाखमधील कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि इतरांना राष्ट्रीय राजधानीत जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मागणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात मागे घेण्यात आली. गृह मंत्रालयाने लडाखमधील कार्यकर्त्यांशी पुन्हा संवाद सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे वांगचुक यांनी त्यांचे ताजे उपोषण संपवल्यानंतर एक दिवसानंतर ही घडामोड झाली आहे.