( Temperature update ) राज्यात उन्हाळ्याचा चटका दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, आता शहापूर शहरासह तालुक्यात तब्बल ४३ अंश सेल्सियस इतकं विक्रमी तापमान नोंदवलं गेलं आहे. हा आकडा यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
Read More
नाशिक : दोन दिवसांच्या बेमोसमी पावसामुळे शहरातून गायब झालेली थंडी पुन्हा जाणवायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये ( Nashik ) गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वातावरणात चांगलाच गारवा वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिकचा पारा सारखा खाली सरकत असल्याचे दिसून येत आहे. रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी १२.५ अंश असलेले तापमान सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी ३ अंशांनी घसरुन ९.५ अंशांवर आले. तर मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी पारा आणखी खालावत ९.४ अंशावर पोहोचला.
राज्यासह देशभरात उसळलेल्या उष्णतेच्या लाटेने जागतिक तापमानवाढ आणि त्याच्या दुष्परिणामांची झळ यंदा अधिक तीव्रतेने प्रत्येकालाच बसलेली दिसते. तेव्हा, उष्णतेची लाट, त्यामागील तापमानवाढ, त्याचे परिणाम आणि उपाययोजना यांविषयी उहापोह करणारा हा लेख...
उन्हाळ्यात संपूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये तापमानात सतत वाढ होत आहे. तसेच या प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त असलेल्या ठाणेकराना गार वाऱ्यामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारी, पारा किमान २१ अंशावर घसरल्याने ठाण्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. ढगाळ वातावरण आणि थंड हवेच्या प्रवाहामुळे नागरिक हिवाळयाची अनुभूती घेत आहेत.
मनुष्याच्या शरीराचे तापमान हे ९८ डिग्री फॅरनहाईटच्या आसपास असते. बाहेरील तापमान कमी असो वा जास्त असो, शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्याची सुंदर रचना मानवी शरीरात आहे. तापाची इतरही अनेक कारणे आहेत. तेव्हा, सध्या घराबाहेर उन्हाचा ताप आणि घरातही या अशा विचित्र वातावरणामुळे डोके वर काढणारा ताप... अशा या तापाचे स्वरुप, विविध प्रकार यांची माहिती देणारा हा लेख...
एप्रिल महिन्यात उन्हाच्या कडाक्याने कहर केला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताच राहिला आहे. बुधवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअस ओलांडले असून, सूर्य आग ओकत असल्याने जीवाची काहिली होत होती.
अवकाळीमुळे राज्यातील जनता त्रस्त झाली असताना या आठवड्यात देशभरात उष्णतेची प्रचंड लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानातही लक्षणीय वाढ होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात झापाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष नको, असा हवामान विभागाने दिला आहे.
एकीकडे उच्चांकी तापमानाचे नवनवीन प्रस्थापित होणारे विक्रम आणि दुसरीकडे अवकाळी-गारपिटीचा जोरडार तडाखा, अशा या लहरी हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढीचा कहरही दिवसेंदिवस वाढताना दिसतो. केवळ भारतातच नाही, तर जगभरात कमी-अधिक प्रमाणात वातावरण बदलाचे हे विदारक परिणाम दृष्टिपथास पडतात. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाची कारणं, त्याचे परिणाम हे आता तसे सर्वश्रुत. याविषयी कित्येक जागतिक परिषदांमधून वारंवार चर्चाही झडल्या. सर्व देश आपापल्यापरीने कार्बन उत्सर्जनाचे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशीलही दिसतात.
काही दिवसांपूर्वीच नेपाळमधील बर्फाळ प्रदेशात वाघ आणि बिबट्याचा संचार तेथील पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे बर्फाळ प्रदेशांमध्ये अशा प्रकारे वाघ किंवा बिबट्यांचा होणारा वावर याकडे प्राण्यांच्या बदलत्या अधिवासाची खूण या दृष्टिकोनातून संशोधकांनी यावर अभ्यासही सुरू केला. यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, वन्यजीवांच्या अधिवासात होणारे हे बदल किती योग्य? किती अयोग्य? आणि त्यामागची नेमकी कारणं तरी काय?
सध्या राज्यात हळूहळू गारठा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली गेला असून मुंबईतही किमान तापमानाची नोंद ही 20 अंशांच्या खाली झाली आहे. राज्यात पुढील 10 ते 12 दिवस थंडीचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या ईशान्येकडून वाहणार्या शीत वार्यांच्या प्रभावामुळे तापमानात घट जाणवत आहे. मुंबई उपनगरांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी हवेतील गारठा वाढल्याचे जाणवले.
मुंबई(प्रतिनिधी): रविवार दि. ०५ जून हा गोंदिया आणि ब्रम्हपुरी शहरांसाठी या हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता. या शहरांमध्ये कमाल तापमान ४६.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. तर नागपूर आणि वर्ध्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके होते. या उलट दक्षिण कोकण, कोल्हापूर, सांगली, आणि सातारा येथे पूर्वमौसमी पावसाने हजेरी लावली आहे.
यावर्षी हवामान खात्याच्या अचूक अंदाजानुसार मान्सून अंदमानच्या किनारपट्टीवर लवकर धडकणार असून येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवा्यातील काही भागात तसेच महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी वर मान्सून पुर्व पाऊस कोसळेल असे भाकित वेधशाळेने केले आहे.
कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसून येत आहे.या शहरांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात मुंबईचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. तसेच मुंबई आणि उपनगरात पुढील महिन्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वायव्य तसेच मध्य भारत आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये या महिन्यात कमाल तापमान नेहेमीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
जमिनीखालच्या अंध लाल मुंग्या या कोकण किनारपट्टीवर जन्म घेणाऱ्या सागरी कासवांच्या पिल्लांच्या जीवावर उठल्या आहेत. ही बाब संशोधनाअंती समोर आली आहे. हवामान बदलामुळे तापमान वाढ झाल्याने कोकणातील सागरी कासवांच्या ( konkan sea turtle ) विणीच्या हंगामात बदल झाला आहे. परिणामी पिल्लांच्या जन्मावर त्याचा प्रभाव पडला असल्याचेही संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. ( konkan sea turtle )
राज्यात काही दिवसांपासून थंडीने उसंत घेतली होती. मात्र, येत्या दोन ते तीन दिवासांमध्ये राज्यातील किमान तापमानामध्ये घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खास करुन नाशिक,पुणे, जळगाव आणि मुंबईमध्ये थंडीची लाट पुन्हा येणार आहे.
जागतिक तापमान बदलामुळे हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे आशियातील लाखो लोकांच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. साधारण ४००-७०० वर्षांपूर्वी मोठ्या हिमनद्यांचा शेवटचा विस्तार झाला. तेव्हापासून गेल्या काही दशकांमध्ये हिमनद्या सरासरीपेक्षा दहापट अधिक वेगाने वितळत आहेत. ’सायन्टिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असेही दिसून आले आहे की, हिमालयातील हिमनद्या जगातील इतर भागांतील हिमनद्यांपेक्षा कितीतरी वेगाने आक्रसत आहेत.
तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायत स्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
‘आयपीसीसी’ने असे भाकित वर्तविले आहे की, २१०० सालापर्यंत पृथ्वीवरील तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ होईल. वरकरणी दोन अंश सेल्सिअसची तापमानवाढ सामान्यांना कदाचित क्षुल्लकही वाटू शकते.
‘ग्रीनहाऊस’मधील गॅस उत्सर्जनामुळे पूर्व-औद्योगिक काळापासून जागतिक तापमानामध्ये अंदाजे एक अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. परिणामी, प्रवाळांच्या (कोरल) आम्लीकरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ‘प्रवाळ रीफ’ ही जगातील एक संकटग्रस्त परिसंस्था म्हणून तयार होत आहे.
येत्या 24 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा
महाराष्ट्रात तापमानात होणारी वाढ आणि हवामानातील बदलामुळे भविष्यात अन्नधान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. प्रामुख्याने २०३३ सालानंतर राज्यातील हवामानात होणाऱ्या बदलांमुळे बहुतांश प्रदेशातील महत्वाचे पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम अपेक्षित आहेत. या संशोधनानुसार २०५० पर्यंत राज्याच्या वार्षिक सरासरी तापमानामध्ये ०.५ ते २.५ अंश सेल्सिअस वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शहराच्या कमाल तापमानात वाढ होण्याचे सत्र गुरुवारी देखील सुरू राहिले. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझमधील स्वयंचलित हवामान केंद्राने गुरुवारी शहरातील कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले. हे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वोच्च आणि सर्वसामान्य तापमानाच्या मर्यादेपेक्षा ५.२ अंशापेक्षा जास्त आहे.
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध झालेल्या लसीच्या साठ्याकरिता ‘गोदरेज’ कंपनीने अतिशय कमी तापमानाचे फ्रीज तयार केले आहेत. ‘गोदरेज’ समूहाची प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अॅण्ड बॉईज’ आपल्या स्थापनेपासूनच भारताला स्वावलंबी बनविण्यात हातभार लावत आहे. ‘गोदरेज अप्लायन्सेस’ या आपल्या ‘बिझनेस युनिट’च्या माध्यमातून, देशातील आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, ‘गोदरेज अॅण्ड बॉईज’ ही कंपनी सध्या देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होत आहे.
राज्यात किमान तापमानाचा पारा उतरणार
बिहार निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. मात्र, कोरोना महामारीच्या ( कोव्हीड 19 ) काळात मतदान होणार तरी कसे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काय ? मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या नादात महामारी पुन्हा ओढावली तर काय करणार ?, असे असंख्य प्रश्न आता बिहार निवडणूक निमित्ताने उपस्थित होत आहे. महाराष्ट्र किंवा अन्य येत्या काळात होणाऱ्या अन्य राज्यांतील निवडणूकांमध्येही हाच पॅटर्न लागू होणार असल्याने कोरोनाच्या सावटात होणाऱ्या या निवडणूका महत्वाच्या आहेत.
तर विदर्भात तुरळक पावसाची शक्यता
तापमानामधील १० अंशांहून अधिक बदलामुळे स्ट्रोकचा धोका १२ ते १८ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. तेव्हा, स्ट्रोक म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि उपाययोजना या विषयांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
दिल्लीमध्ये तापमान २.४ डिग्रीपर्यंत घसरले
जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हा आज दारिद्य्र, कुपोषण, महागाई, बेरोजगारी यांच्यासह एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून जगासमोर उभा ठाकला आहे. पर्यावरण ही आपली सर्वांची संपत्ती आहे. त्यामुळे या संपत्तीचा आपल्याला हवा तसा वापर करणे, हे आपले कामच आहे. असा समज अनेकांचा असतो. त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि हवामान बदल यासाठी चिंता करणारे आणि काम करणारे नागरिक जगाच्या पाठीवर आज नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. Article on Greta Thunberg and real environment atavist
अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक आणि अॅटमॉसफिअरिक अॅडमिनिस्ट्रेशन’ अर्थात ‘एनओएए’ या संस्थेने जागतिक तापमानाविषयी केलेल्या संशोधनात यंदाचे वर्ष हे आजवरचे दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकाचे ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ ठरू शकते, असे जाहीर केले आहे.
दक्षिण तटीय आंध्र प्रदेश, रायालसीमा, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, किनारपट्टी व दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.
'संवेदनशीलता' जशी प्राण्यांमध्ये वा वनस्पतींमध्ये दिसून येते, तशीच ती मनुष्यांमध्येही फार प्रभावीपणे दिसून येते. या संवेदनशीलतेचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, वातावरणात होणार्या बदलांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, तसेच विविध ऋतू व विविध प्रदेशांमधील वातावरण, हवामान व तापमान यांचा माणसावर व त्याच्या राहणीमान व सवयींवर होणारा परिणाम. उदा. एखादा माणूस तापमानातील कठोर बदलांना व्यवस्थित तोंड देतो. दुसरा माणूस त्याच तापमानात आजारी पडतो.
यंदाची दिवाळी फटाक्यांबरोबर ढगातल्या कडाडणार्या विजांचा लखलखाट, कोसळणार्या जलधारा आणि ओल्याचिंब रस्त्यांमुळे सदैव स्मरणात राहील. पण, हवामानाने बदललेली ही कूस म्हणजे अचानक ओढवलेले नैसर्गिक संकट नक्कीच नाही. 'हवामान बदला'चे विशेषत्वाने गेल्या दोन-तीन दशकांतले गंभीर परिणाम जगभरातील देशांनी अनुभवले. जागतिक तापमानामध्ये १ अंश सेल्सिअसची झालेली वाढ असो वा बर्फाचे मोठमोठाले ग्लेशिअर वितळल्याने समुद्राच्या पाणी पातळीत झालेली वाढ, भारतासह जगभरातील देश या वातावरणीय बदलांमुळे चिंतेच्या छायेत आहेत.
‘पारा’ म्हणजे आमचा प्रथितयश चित्रकार आणि सर जे. जे. स्कूलचा ज्येष्ठ कलाध्यापक ज्याचं कागदोपत्री नाव ‘राजेंद्र पाटील’ असं आहे. ‘पारा’ हे नाव अर्थात टोपणनाव. पण हे नाव कसं पडलं, हा प्रश्न मी कदाचित त्याला विचारणारही नाही. कारण, ‘पाटील’चा ‘पा’ आणि राजेंद्रचा ‘रा’ असा ‘पारा’ बनला असेल, अशी मी रास्त समजूत करून घेऊन ‘पारा’च्या कलाकृतींचा आशय शोधण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहे.
गेल्या कित्येक दिवसात हळूहळू देशातील उष्णतेच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत तर उष्णतेचा पारा खाली येण्याचे नावच घेत नाहीये अशातच देशातील अन्य महत्वाच्या भागांमध्ये काल तापमानाने ४२ अंशांची पातळी ओलांडली.
हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहता यावे यासाठी अशा मुद्यांची वैज्ञानिक आणि संशोधकांनी दखल घ्यावी, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले
मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. राज्यातल्या बऱ्याच भागांतील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक काळ घराबाहेर राहिल्यामुळे हिट एक्झॉर्शन आणि सनबर्नचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच या दोन्ही संदर्भात प्रथमोपचाराची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
रविवारी ३७ अंश सेल्सिअसपर्यंत असणाऱ्या तापमानात सोमवारी वाढ
वन विभागाची 'कन्या वन समृद्धी योजना' यशस्वी होताना दिसून येत आहे. राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात २ हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर २१ हजार ७७० रोपांची लागवड झाली
गुरुवारी सकाळी ७ वाजता निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वर आणि मुंबईचे किमान तापमान सोमवारी १६ अंश नोंदविण्यात आले. हिवाळ्यातील गारव्यात वाढ झाल्यामुळे पहाटेच्या वेळी मुंबईकरांना महाबळेश्वरचा अनुभव घेता येणार आहे.
उन्हाळ्यात पाऊस पडणे, हिवाळ्यात चटके लागणारे ऊन पडणे, चक्रीवादळ, त्सुनामी आणि अनियमित पावसाळा हीच ती लक्षणे आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो.
जागतिक सरासरी तापमानवाढ २ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास भारतीय उपखंडाला याचा सर्वात मोठा फटका बसणार
समुद्राच्या रचनेतील बदल, पाण्याच्या तापमानातील वाढ, समुद्राच्या पातळीतील वाढ, पर्जन्यमानातील बदल, वादळीवारे यांचा संबंध हवामान बदलाशी आहे. या समस्यांमुळे प्रजातींच्या उत्पादक प्रक्रियेत बदल होत आहे. तसेच समुद्री जिवांना अनेक रोग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
‘ग्लोबल वॉर्मिंग’ अर्थात जागतिक तापमानवाढ याला सर्वस्वी जबाबदार असल्याचा निष्कर्ष यावरुन तज्ज्ञांनी काढला
सर्वच मोठ्या उद्योगधंद्यांच्या कार्यालयात, व्यवस्थापनामध्ये एसी आहेतच. त्याचे काय?
राज्यातील अनेक शहरांच्या तापमानाने चाळिशी पार केली आहे. विदर्भातील अकोला, वर्धा व चंद्रपूर भागात उष्णतेची सर्वाधिक लाट आहे.