एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटर या प्रभावशाली समाजमाध्यमाने केलेल्या भविष्यवाणीमुळे पाकची डोकेदुखी वाढली आहे. त्याचे झाले असे की, रविवारी या भागातील लोकांनी पाकिस्तान सरकारच्या अधिकृत हॅण्डलमधील घडामोडी पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले, तेव्हा हे हॅण्डल ब्लॉक करण्यात आल्याचा संदेश झळकला. यासोबतच हा भाग भारताचा भाग असलेल्या काश्मीर अंतर्गत असल्याचे सांगण्यात आले.
Read More
१९४७ मध्ये पाकिस्तानने बळजबरीने गिलगिट-बाल्टिस्तानवर कब्जा केल्यानंतर तिथल्या कुशासनामुळे हा प्रदेश विकास आणि प्रगतीपासून वंचित ठेवला गेला व यामुळेच यावरून पाकिस्तान सरकारवर टीका होत आली. अशा स्थितीत या प्रदेशाच्या प्रशासकीय स्थितीशी छेडछाड करणे उपयुक्त उपायाऐवजी राजकीय उपायच म्हटला पाहिजे.
इमरान खान सरकारने १ नोव्हेंबर रोजी गिलगिट-बाल्टिस्तानला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आणि दोन आठवड्यांत तेथे निवडणुकाही घेतल्या. या निवडणुका म्हणजे निव्वळ धूळफेक होती.
गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात पाकिस्तानकडून आता बुद्धाच्या वारशाची नासधूस सुरू आहे. सगळ्या जगाला शांती आणि अहिंसेचे धडे देणारा बुद्ध युद्धपिपासू पाकिस्तानला कधीच पटणार नाही. किंबहुना, पाकिस्तानला बुद्ध नको आहे. मात्र, त्याकरिता ऐतिहासिक वारसा पुसण्याचा उद्योग चालवून पाकिस्तान नेमका कोणता संदेश देऊ इच्छितो?
भारताने गिलगिट-बाल्टिस्तान रिकामे करण्याच्या दिलेल्या जबर धमकीमुळे इमरान खान सरकारसोबतच पाकिस्तानी सैन्याचीही चांगलीच तंतरली. म्हणूनच की काय, पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा काश्मीरला ‘विवादित क्षेत्र’ म्हणून मोकळे झाले आणि भारताने त्याचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न केला, तर युद्धखोरीची नेहमीची भाषाही त्यांनी केली. म्हणजे, इतके वर्षं काश्मीर आमचेच, काश्मीरवर भारताचा हक्क नाही, असा तावातावाने अपप्रचार करणारा पाकिस्तान आता साफ उघडा पडला आहे.
धरण बांधायचे, मग जनतेनेच पैसे द्यावे, कोरोनाशी सरकारला लढायचे आहे, तरी जनतेनेच सरकारला आर्थिक मदत करायची, रुग्णालय जनतेला हवे ना, तर लोकांनीच देणगी द्यायची, अशा चोराच्या उलट्या बोंबा. जनतेचा खिसा आधीच रिकामा, त्यात आता फाटलेला, शिल्लक काही नाही, महागाईचा आगडोंब उसळलेला, पण जावेद मियांसारख्या पाकी श्रीमंतांना मात्र या सगळ्याची नाही, तर अणुबॉम्बचीच चिंता जास्त.
सातत्याने वाढणार्या दहशतवादी घटनांशी त्याचवेळी आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे गहन अंतर्गत संबंध आहेत आणि हे संबंध पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याच्या अवैध षड्यंत्राशीदेखील जोडलेले असू शकतात.
गेल्या ७०पेक्षा अधिक वर्षांपासून गिलगिट-बाल्टिस्तान आणि काश्मीरचा काही भाग बळकावणार्या पाकिस्तानला या प्रदेशातून लवकरच चंबुगबाळ आवरावे लागेल, याचे थेट संकेत भारताने दिले. तसेच पाकिस्तानच्या शिरपेचात अपयशाचा आणखी एक तुरा खोवण्यापासून भारताला कोणीही रोखू शकत नाही, हेही निश्चित झाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाक्न अब्बासी यांनी काल गिलगीट-बाल्टीस्तानच्या संसदेला भेट देऊन दोन्ही सभागृहांच्या नेत्यांशी चर्चा केली.