संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ’जग ब
Read More
राज्यभरात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवार, ६ जून रोजी त्यांनी गडचिरोली येथे माध्यमांशी संवाद साधला.
केवळ संघकार्याचा किंवा शाखांचा विस्तार म्हणजे संघाचा विस्तार नव्हे. तर संघातील स्वयंसेवकत्वाचा विस्तारही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
ज्या व्यक्तीच्या केवळ विचारांनी, कृतीने जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती निर्माण होते, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासातून किती आमूलाग्र बदल होत असेल, हे सांगायलाच नको. परमेश्वरालाही भेदाभेद मान्य नाही, असे वेद-पुराणांतील अनेक दाखले सर्व संतांनी दिले. समाजसुधारकांनी वर्षानुवर्षे प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर या कार्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला मिळालेला शाप आहे, असे वाटणार्या व्यक्तींपैकी एक अनंत हरी गद्रे यांनी उर्वरित आयुष्य अस्पृश्यता निवारणासाठी घालविले. मात्र
( 4 Naxalites killed in Gadchiroli ) गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त चकमकीमध्ये चार कट्टर नक्षलवाद्यांचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला आहे.
चित्रकार श्रीकांत गडकरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालन येथे आयोजित करण्यात आले आहे. दि. 19 मे ते दि. 25 मे रोजीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात दर्शकांना आपल्या भोवतालाचे चित्रमय दर्शन अनुभवता येईल.
"सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन 'प्रकरणे' दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १२ मे रोजी केली
Amit Gadkari निफाडचे सुपुत्र अमित गडकरी यशस्वी उद्योजक, तसेच समाजशील कार्यकर्ताही आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
( Minister Nitin Gadkari on service-education sector ) “खेड्यातील अर्थव्यवस्था जोपर्यंत सुदृढ होत नाही, तोवर भारत आत्मनिर्भर किंवा विश्वगुरू होऊ शकत नाही. त्यासाठी समाजकारण, सेवा-शिक्षण या क्षेत्रात काम करणे ही खरी आजची आवश्यकता आहे. तसे झाल्यास भारत विश्वगुरू म्हणून नावारुपास येईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्
(Gadchiroli Unseasonal Rain) राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेलेला आहे. तर दुसरीकडे काही शहरांना अवकाळीचा फटका बसला आहे. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे.
सिनेक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत, समाजभान जपणार्या वनिता राजे गडदे यांची गोष्ट...
( Farmers become fuel providers in the future Union Minister Nitin Gadkari ) आपल्या देशात प्रदूषणाची मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जैविक इंधन तयार करण्याचा प्रकल्प पानिपत येथे सुरू केला आहे. जैविक इंधनाचे 400 प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यातील 60 प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाता, हवाई इंधन दाताच नव्हे, तर बिटुमेन दाताही होणार आहे. त्यामुळे येणार्या काळात आपण ऊर्जा आयात करणारे नाही, तर निर्यात करणारा
( MP Savra meets minister gadkari for road demand ) “अर्धकुंभ मेळा 2027 नाशिक या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर या महामार्गांच्या दुरुस्ती व विस्तारासाठी तातडीने निधी मंजूर करा,” अशी मागणी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
Swargate rape Case स्थानकात घडलेल्या बलात्कारकांडाने अनेक प्रश्न उपस्थित झाले. हीच घटना नव्हे, तर अनेक घटनांमध्ये नीच, नराधमी बलात्कार्यांनी मुली-महिलांच्या विश्वासाचा, भोळेपणाचा, अज्ञानाचा मुख्यत: असाहाय्यतेचा गैरफायदा घेतला आहे. यासंदर्भात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्या महिलांचे मत जाणून घेतले. त्यातून जाणवते की, त्यांनी सांगितलेल्या सूचना, विचार यांचा महिलांनी दैनंदिन जीवनात उपयोग केला, तर अशा घटनांना थोडा तरी आळा बसू शकतो. ‘महिला सुरक्षा’ हा विषय एकट्या महिलेचा, तिच्या कुटुंबाचा नसून,
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी मध्यरात्री गुनाट गावातून त्याला अटक करण्यात आली आहे.
पुणे अत्याचार घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला अटक करण्यात गुनाट गावच्या नागरिकांनी मोठी मदत केली. दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आरोपीच्या अटकेबाबत सविस्तर माहिती दिली
पुणे अत्याचार घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. दत्तात्रय गाडेच्या अटकेनंतर आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत या घटनेच्या तपासाबद्दल सविस्तर माहिती दिली.
पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानक. या गजबजलेल्या बस स्थानकात मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने महाराष्ट्राला हादरा बसला. घटना घडल्यानंतर जवळपास २४ तासानंतर ती उघडकीस आली. गेले ३ दिवस या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांना गुंगारा देत होता. घटनेनंतर जवळपास ६० तासानंतर पोलिसांना मिळालेले क्लूज, त्यानंतर आरोपीच्या मागावर असलेली अडीचशेहून अधिक पोलिसांची फौज, ५० हुन अधिक सीसीटिव्ही कॅमेरे, रात्रभर केलेला तपास, डॉग स्क्वाड, शिरुरच्या गुणाट गावातल्या नाग
स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरुर येथील गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपला असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक गुनाट गावात दाखल झाले असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिथे कुठल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव' या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवामुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
दावोसमध्ये गडचिरोलीसाठी पहिला सामंजस्य करार करण्यात आला आहे. कल्याणी समुहाकडून पोलाद उद्योगासाठी ५ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
(Nitin Gadkari) केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार देणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात 'केबल कार' प्रकल्प राबविण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. येत्या ७ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे 'विकसित भारत २०४७' या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक होणार आहे.
राज्य सरकारने दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांवर केलेली पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
लोकशाहीत सत्तेवर कोणाला बसवायचे, याचा निर्णय जनतेच्या हाती असतो. पण, सत्ता हाती आल्यावर या नेत्यांकडून जनहिताची कामे करवून घेणे हे जनतेच्या हाती नसते. लोककल्याणाची तीव्र इच्छाशक्ती आणि देशाबद्दल असीम प्रेम असलेला नेताच जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा जाणकार आणि धडाडीचा नेता सत्तेवर आल्यापासून राज्यात विकासकामांचे दृष्य परिणाम दिसून येऊ लागले आहेत. या विकासातही गडचिरोलीसारख्या अतिशय मागास भागाला त्यांनी दिलेले प्राधान्य त्यांच्या दूरदृष्टीचे आणि जनहिताशी असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेचे
राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात नवीन वर्ष साजरे करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.
गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवा सुरु करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बसला हिरवा झेंडा दाखवत स्वत: बसमधून प्रवास केला.
(CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील विकासप्रकल्पांची पाहणी आणि लोकार्पण केले. "मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित आहे.येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार", असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी जहाल नक्षली ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा शुभारंभ त्यांनी केला. याव
Atal Bihari Vajypayee Jayanti आजवर अनेक चढउतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरविले. कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडून आलो. महापौर झालो. आमदार झालो. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुन्हा निवडून आलो. बहुमत असतांनाही राजकीय गणितांच्या गोळा बेरिजेमध्ये निराशा घ्यावी लागली. मला प्रत्येक क्षणी श्रद्ध्येय अटल बिहारी बाजपेयी यांचे हार नही मानुंगा हे शब्द प्रेरणा देत राहि
नागपूर : अत्यंत आवाहनात्मक अशा काळात सुमतीताईंनी खुप संघर्ष केला. अनेक लोक आंदोलने केली. त्यांच्या त्यांच्या सोबत अनेक घटकातील कार्यकर्त्यांनी संघर्षाची बीजे घेऊन समाजात विश्वासार्हता निर्माण केली. ताईंच्या संघर्षाच्या समृध्द वारसेवरच आम्हाला यश प्राप्त करणे शक्य झाले. त्याकाळात ताईंसह अनेक निस्वार्थ कार्यकर्त्यांनी रचलेल्या पायावर आम्हाला कळसापर्यंत पोहचता आले या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सुमतीताई या केवळ लढवय्या ताई नव्हत्या तर त्यांना लोकमात
गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवण्याची माझी ईच्छा आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद फडणवीसांकडेच राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बुधवार, २५ डिसेंबर रोजी नागपूर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या मीट द प्रेसमध्ये ते बोलत होते.
अनिल शर्मा दिग्दर्शित गदर चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. गदर १ आणि गदर २ या दोन्ही चित्रपटातील सनी देओल यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर लवकरच गदर ३ येणार असेही सांगितले जात आहे. आणि या तिसऱ्या भागात नाना पाटेकर दिसणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच, नुकताच अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत होते.
नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ ( Sudhir Rasal ) यांना ’विंदांचे गद्यरुप’ पुस्तकासाठी यंदा हा जाहीर झाला आहे. आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
(CM Devendra Fadnavis) राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दि. ११ ते १२ डिसेंबर दरम्यान पहिला दिल्ली दौरा केला. या दौऱ्यावर असताना त्यांनी दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. या भेटीत त्यांनी निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.
गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये २००२ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आदी अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, हा चित्रपट पंतप्रधानांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत पाहिला असून चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विक
पुणे : गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे ( Asha Kale ) यांना जाहीर झाला आहे. सोबतच गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांना, तर ‘चैत्रबन पुरस्कार’ प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक, गीतकार क्षितीज पटवर्धन, ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर
ठाणे : “महाराष्ट्राला पुढे आणण्यासाठी भाजपने जीवाचे रान केले आहे. राज्यात आम्ही चांगले पेरले तेच उगवले असल्याने राज्यात जनतेने बंपर विजय महायुतीला दिला. प्रत्येक पक्षाला वाटते आपल्या जागा वाढल्या पाहिजेत, आपला महापौर झाला पाहिजे. या अनुषंगाने ठाणे महापालिकेत भाजपच्या जागा वाढवण्याकरिता कार्यकर्त्यांची ताकद लावणार आहोत,” अशी भूमिका आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी व्यक्त केली.
नागपूर : भाजपसह महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश राज्य व केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अमलबजावणीसह कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी दिली. गडकरी म्हणाले, ’भाजप-महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासात मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपवर संविधान बदलाचे खोटे आरोप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. या सर्व आरोपांना शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने जातीपातीच्या राजकारणाकडे द
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराचा झंझावात केला. एकूण ६४ ठिकाणी त्यांच्या रॅली, रोड शो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या ५० वर सभा त्यांनी अवघ्या १३ दिवसांत केल्या. म्हणजे सरासरी चार सभा त्यांनी दररोज घेतल्या. सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये त्यांनी शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.
ठाणे : साठ वर्षात काँग्रेस करू शकले नाही ते दहा वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने करून दाखवले.तेव्हा, विकास कामे करण्याकरीता पैशांची नाही तर इमानदार नेत्यांची गरज आहे. असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी करून उपहारगृहात चवीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जाताना जात पाहत नाही, मग निवडणूकीत आपण जात का बघतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नागपूर : पोलिओग्रस्त प्रणयाच्या शस्त्रक्रियेसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी मदत केल्याने दोन्ही पायांनी अपंग असणारा प्रणय आता चालू लागला आहे. त्याच्या पायाला बळ मिळाले आहे. तो भविष्यात रोजगारक्षम व्हावा यासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे वचनही श्री बावनकुळे यांनी गादा गावात भेटी दरम्यान दिले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गडेकर कुटुंबीयांसाठी चंद्रशेखर बावनकुळे हे देवदुताप्रमाणे ठरले.
डोंबिवली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांसह सर्वच मोठे नेते हे देशाच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. राष्ट्र पुढे नेण्यासाठी आपल्या सारख्यांचे हजारो हात गरजेचे असून सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान करावे,” असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra chavan ) यांनी केले. त्यावर कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर चव्हाण अशा शब्दात त्यांचा गौरव करून शहरातील बुद्धिवंतांनी त्यांचे समर्थन केले.
डोंबिवली : दिवाळी म्हंटली की फटाके फोडायचे मजा करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ( Fort construction ) हुबेहूब बांधून त्याला कोणी काही करणार नाही यासाठी अहोरात्र काळजी घ्यायची. डोंबिवलीतल्या शेकडो बच्चेकंपनीने टिळकनगर, पेंडसेनगर, फडके पथ, रामनगर, पश्चिमेला कोपर, चिंचोळ्याचा पाडा, नवापाडा या सर्व भागात एकसे एक गडकिल्ले बांधले आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
‘शारदा ज्ञानपीठम्’चे संस्थापक आणि ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक, लेखक, पत्रकार पंडित वसंतराव गाडगीळ यांचे १८ ऑक्टोबर रोजी पुण्यात वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी गाडगीळ यांनी अवघे आयुष्य समर्पित केले होते. प्राचीन संस्कृत ग्रंथांसह, वेद, उपनिषदांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत अध्यापन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, ‘शारदा’ संस्कृत मासिक, असे संस्कृतच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण असेच. अशा या ऋषित