गोव्यातील शिरगावमध्ये आयोजित लैराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला असून परिस्थितीबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून आढावा घेतला.
Read More
आपल्या कष्टाचे, मेहनतीचे पैसे गुंतवणूकदार मोठ्या विश्वासाने एखाद्या कंपनीत अथवा वित्तीय संस्थेत गुंतवतात. अल्पकालीन लाभही त्यांच्या पदरी पडतात पण, कालांतराने गुंतवणूक केलेली संस्थाच फसवणूक करीत असल्याचे उघडकीस येते आणि गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांची आयुष्यभराची जमापुंजीच क्षणार्धात नाहीशी होते. मुंबईत अलीकडे उघडकीस आलेला ‘टोरेस’ कंपनीचा घोटाळा असेल किंवा ‘न्यू इंडिया बँके’तील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण, गुंतवणूकदारांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना संपूर्ण खबरदारी घेणे अत्यंत म
Goa Liberation Saga गोव्यावरील पोर्तुगीजांची साडेचारशे वर्षांची जुलूमी, अन्यायकारक राजवट उलथवून भारतीय सैन्याने दि. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केले. गोव्याच्या या मुक्तीसंग्रामात केवळ स्थानिक नव्हे, तर देशभरातील स्वातंत्र्यसेनानी सामील झाले. कित्येकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यानिमित्ताने गोवामुक्ती गाथेचे सिंहावलोकन...
चित्रपट हे जरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे माध्यम असले, तरी त्यातून कायम जीवन जगण्याचा संदेश मिळतोच. मात्र, कुठलीही कलाकृती एकाग्रतेने पाहणेही तितकेच गरजेचे असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘ब्रिंग देम डाऊन’ हा चित्रपट. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग नुकतेच गोव्यातील 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपटप्रेमींसाठी करण्यात आले. जगभरात हा चित्रपट 2025 रोजी प्रदर्शित होणार असून, थोडक्यात जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल...
गोवा पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी या महोत्सवाची सांगता झाली. तसेच, यावेळी भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा देखील संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीचा ठसा उमटवत घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदीवडेकर यांन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकिय पदार्पण हा पुरस्कार पटकावला.
पणजी : ५५व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारात ( Iffi ) महाराष्ट्र चित्रपट, ‘रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून सहभागी झालेल्या ‘छबिला’, ‘तेरवं’, ‘विषयहार्ड’, ‘आत्मपॅमप्लेट’ या चित्रपटांच्या टीमचा सन्मान महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते पणजीमधील मांडवी नदीवरील क्रुझवर करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मा शिरोमणी, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, ‘ऑस्करज्युरी’ उज्ज्वल निरगुडकर, महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, ‘इम्
55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात ‘इफ्फी’ला दि. 20 नोव्हेंबर रोजी दिमाखात सुरुवात झाली असून, या महोत्सवात देशविदेशातील चित्रपटांची मेजवानी चित्रपटप्रेमींना अनुभवायला मिळते आहेच. सोबतच गोव्यातील पारंपरिक संस्कृतीदेखील जपण्याचा विशेष प्रयत्न गोवा सरकारने या महोत्सवात केलेला दिसतो. त्याअंतर्गत शतकानुशतकांची परंपरा असलेले कुणबी कापडाचे आणि इकोफ्रेंडली आकाशकंदिलांचे स्टॉल्स हे लक्षवेधी ठरावे. ‘इफ्फी’ महोत्सवात अशाच कला जगभरातून आलेल्या अतिथींपर्यंत पोहोचविण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आ
गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या ५५व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान बहुचर्चित 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाला मिळाला आहे. महोत्सवात चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सोहळा लवकरच रंगणार असून या चित्रपटसोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी गोव्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५५व्या आणि ५६व्या आवृत्तीसाठी कपूर महोत्सव प्रमुख असणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर ३ दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन टप्प्यात हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत असेल. तर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत पुन्हा हा ब्लॉक असेल. या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आणि गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहानांसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे. कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात गोवा राज्यातील दोन्ही जागांसाठी मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. आजच्या घटकेला काँग्रेस पक्षासाठी प्रत्येक जागा ही महत्त्वाची असतानाही गोव्यातील दोन जागा जिंकण्यासाठी या पक्षाने काहीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही, तर ’अबकी बार चारसो पार’चा नारा देत निवडणूक लढाईत उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र कधीही नव्हते एवढे लक्ष यावेळेस दोन्ही जागा जिंकण्यासाठी केंद्रित केले असून काँग्रेस नेतृत्वास अपेक्षित असा निकाल येथे लागला, तर त्याचे कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील एका बोगद्यामधून दुतर्फा वाहतूक सोमवारपासून (ता. १) सुरू करण्यात आली. हलक्या वाहनानांच परवानगी दिलेली असताना रात्रीच्यावेळी अवजड वाहने दुसऱ्या बाजूने बोगद्यातून ये-जा करतात. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. मात्र महाराष्ट्र दिनाच्यादिवशीच कोकणातील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला सुरूवात झाली आहे.
वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकार्यत्यांनी वनमानवाला ताब्यात घेऊन त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. (Slender loris rescue)
सूचना सेठ नामक महिलेने गोव्यातील एका हॉटेलमध्ये स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला आहे. पणजीच्या बाल न्यायालयात सुचना सेठ यांच्याविरोधात ६२४ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात सुचना सेठ यांनीच स्वतःच्या ४ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
आम आदमी पक्ष आणि त्याचे एकमेव नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेसच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभाराची अधिक भयावह आवृत्ती बनण्याच्या प्रयत्नात आहेत. केजरीवाल यांची राजकारणात उतरण्यापूर्वीची वक्तव्ये आणि एक नेता म्हणून त्यांनी केलेले वर्तन हे भारतातील कसलेल्या भ्रष्ट नेत्यांनाही लाजविणारे. तुरुंगात जाईन, पण मुख्यमंत्रिपद सोडणार नाही, हे केजरीवाल यांचे वर्तन पाहून भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादवही शरमिंदे झाले असतील; कारण त्यांनीही अटक झाल्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शुचिता दाखविली होती.
गोवा शासनाने महाप्रितबरोबर केलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने पुढील पाऊल टाकलेले असून सुमारे २०० कोटी रुपयांची सोलरविषयक कामे मंजूर करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे.
नवी मुंबईत वसलेल्या वाशी येथील फोर्च्युन एक्झोटिका हॉटेलमधील 'झोडियाक' या रेस्टाॅरंटमध्ये गोवन फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. आजूबाजूच्या आगरी-कोळी लोकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० जानेवारी ते दि. २८ जानेवारी दरम्यान या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त येथे बुफे डिनर - लाइव्ह-पिझ्झासह १००+ डिश, लाइव्ह-आईस्क्रीम आणि लाइव्ह शावर्मा, वीकेंडच्या दिवशी लाइव्ह संगीत देखील असते. रुचकर आणि चवीचे पदार्थ खाण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे 'झोडियाक'
नाशिक येथील बापू बर्वे यांनी नोकरी सांभाळून शेळीपालन, कुक्कुटपालन, श्वानपालन असे शेतीला पूरक व्यवसाय शास्त्रीय पद्धतीची जोड देत यशस्वी केले. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची यशोगाथा...
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह राज्याचे सचिवही उपस्थित होते.
गुरुवारपासून आदित्य ठाकरे सिंधूदुर्ग दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. सिंधूदुर्ग तो बहाना है, पेंग्विन को कलाकारोके साथ नाचना है, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींवरून समस्त प्रेक्षकवर्गाला धुंद करणारे ज्येष्ठ कलाकार, व्हायोलिनवादक पं. मिलिंद रायकर. मूळचे गोव्यातील. परंतु, त्यांचा गोवा ते मुंबई प्रवास त्यांच्या संगीत साधनेइतकाच खडतर, रोमहर्षक आहे. त्यांच्या या सूरसाधनेविषयी..
मुंबई : यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘ग्लोबल आडगाव’, ‘गिरकी’ आणि ‘बटरफ्लाय’, या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चौथ्या गोवा सागरी परिषदेमध्ये बीजभाषण झाले. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी हवामान बदल, चाचेगिरी, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, अनिर्बंध मासेमारी आणि सागरी वाणिज्य स्वातंत्र्य यासारख्या सामायिक सागरी आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोग चौकट स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.
पोर्तुगीज राजवटीत गोव्यात १००० हून अधिक मंदिरे पाडण्यात आली होती. अशा मंदिरांची माहिती पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञ समितीने गोळा केली आहे. अशी माहिती राज्याचे पुरातत्व मंत्री सुभाष पाल देसाई यांनी दिली आहे. या पाडलेल्या मंदिरांच्या जागी स्मारक बांधण्याची शिफारस समितीने सरकारला केली असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व मंदिरे पुन्हा बांधणे शक्य नाही, असे त्यांचे मत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झाले असून ते श्री साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. यावेळी ते शिर्डी संस्थानच्या नव्या इमारतींचे लोकार्पण करणार आहेत. शिर्डीतील दर्शन रांग संकुलाचे त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत.
'गोवा शिपयार्ड लिमिटेड'अंतर्गत रिक्त पदे भरण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'गोवा शिपयार्ड लिमिटेड'मधील विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून अधिसूचनेनुसार एकूण ११ रिक्त जागांसाठी ही भरल्या जाणार आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण झाली असून नव्या वर्षात या महामार्गावरून सुसाट प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे हा महामार्ग अखेर पूर्णत्वास जात आहे. कोकणच्या समृद्धीचा महामार्ग अशी ओळख असलेल्या या महामार्गाचा इतिहास-वर्तमान, कोकणाची भावी वाटचाल आणि कोकणच्या प्रगतीत महामार्गाची भूमिका यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला हा संवाद!
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. कोट्यवधी रुपये खर्च करुनही अद्याप मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण कसा झाला नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला होता. तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावरुन मनसैनिकांना आक्रमक होण्याचा आदेशही राज ठाकरे यांनी दिला होता. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रातुन मनसैनिकांना खडेबोल सुनावले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दमन आणि दीव मध्ये आयोजित पंचायत राज परिषदेला आभासी पद्धतीने संबोधित केले. कार्यक्रमातून पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला.
मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या ४२ किलोमीटरच्या टप्प्यापैकी २३ किलोमीटरचे सिंगल लेनचे काम पूर्ण झालेले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन मशिनरींच्या साह्याने जोमाने सुरू आहे हे सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
उत्तर गोवा जिल्ह्यातील कारसवाडा गावात सोमवारी सकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली होती. गोवा पोलिसांनी मंगळवारी राज्यातील म्हापसा शहराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिंदे गटाने ५० खोके घेतले असा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरसा दाखवला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेबाबत पनवेल येथे बुधवारी राज ठाकरेंनी एक मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना राज यांनी उबाठा गटावर निशाणा साधला असून ''इतरांवर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांकडे कंटेनर आहेत,'' असे म्हटले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडणार असून यासाठी देशभरातून अनेक लोक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी या कार्यक्रमासाठी हर घर जल योजनेच्या लाभार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दक्षिण गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर बोलमेक्स परेरा यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टीप्पणी करत आधी अकलेचे तारे तोडले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच फादरने माफी मागून सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. यानिमित्ताने वास्तविकता लपविण्याचे हिंदूविरोधी षड्यंत्र लक्षात घ्यायला हवे.
गुंड आणि ड्रग्ज तस्कर आबू खानच्या अतिक्रमणावर नागपूर महापालिकेचा बुलडोझर फिरला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आपल्या पथकासह रविवारी दुपारी ताजबाग परिसरात पोहोचून गुंडाने केलेले अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. जेणेकरून कारवाईदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देता येईल.
हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या भारतात पर्यटन स्थळांची वानवा कधीच नव्हती. मात्र, भारताच्या अद्वितीय सांस्कृतिक वारशाची आजवरच्या सरकारांनी हेतूतः उपेक्षा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक तीर्थस्थळांचा कायापालट करून त्यांना देशीच नव्हे, तर परदेशी पर्यटकांच्याही नकाशावर आणले आहे. या तीर्थस्थळांना भेट देणार्या व पर्यटकांची प्रचंड संख्या पाहता या सांस्कृतिक उत्थानातून देश कसा बदलतो आहे, ते दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जून रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. जिथे ते राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे गोवा, बिहार आणि झारखंडला प्रथमच वंदे भारत ट्रेनची जोडणी मिळणार आहे.तसेच पंतप्रधान राज्यात राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मिशनचा शुभारंभ करतील. यासोबतच ते शहडोल जिल्ह्यातील पकारिया गावाला भेट देऊन गावातील विविध संबंधितांशी संवाद साधणार आहेत.
एका दुर्दैवी अपघातात जयंतराव जबर जखमी झाले, तरीही काळाशी लढाई सुरू ठेवली. ‘कालगतीहून बलवत्तर ही पौरूषशाली मने, अमिट बलाच्या आधारावर लाख झुंजवू रणे’ ही गीतपंक्ती जणू त्यांच्यासाठीच लिहिली असावी, असे वाटत असतानाच अखेर काळाचा विजय झाला.
महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यावर्षी २ जून रोजी ३५०वे वर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात अनेक वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातून शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर जाणार आहेत. यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे.
कोकणात प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पविरोधाच्या निमित्ताने तेथील फलोत्पादन, फळ प्रक्रिया उद्योग इत्यादींचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानिमित्ताने राज्य सरकारची फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना, त्याचे फायदे आदींची तपशीलवार माहिती देणारा हा लेख...
विशेष प्रतिनिधी प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई सुरू आहे. एनआयएने सोमवारी देशभरातील पीएफआयच्या जवळपास १७ ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
मुंबई पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या खासगी बसच्या अपघातात एकूण मृत्यूंची संख्या १३ वर पोहोचली आहे. तर २९ जखमी आहेत.
कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेलं रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्यातील गोवे गाव. साधारणत: एक हजारच्या आसपास या गावची लोकसंख्या असावी. या गावामध्ये १२ बलुतेदारांपैकी कुणबी, भोय, सुतार, गोसावी, बौद्ध आणि वनवासी समाजाचे लोक एकत्र नांदतात. या गावात जाधव, पवार, शिर्के, सानप, गुजर अशा ऐतिहासिक मात्तब्बर घराण्यांची आडनावं पाहायला मिळतात. जाधव कारभारी तर सानप या गावचे खोत म्हणून ओळखले जातात. प्रस्तुत लेखात या गावामध्ये आढळणार्या शिलाहारकालीन अवशेषांचा आढावा घेतला आहे.
‘इंडिगो’ विमान सेवेने ७७ वे देशांतर्गत आणि एकूण १०३ वे गंतव्य असलेल्या नाशिकमधून डायरेक्ट फ्लाइट्सचा शुभारंभ बुधवारी केला. ‘एअरलाइन’ने नाशिक-गोवा, नाशिक-अहमदाबाद आणि नाशिक-नागपूर दरम्यान पहिली डायरेक्ट उड्डाणे सेवेत रूजू केले. या नवीन ‘हवाई सेवेने’ व्यापार, पर्यटन व गतिशीलतेला चालना देताना राज्यांतर्गत आणि आंतरराज्य सुलभता वाढणार आहे. याप्रसंगी बोलताना ‘इंडिगो’चे विनय मल्होत्रा म्हणाले, ”नाशिकमधून आमच्या सेवा शुभारंभाची घोषणा करताना आनंद होत आहे. समृद्ध आध्यात्मिक आणि पौराणिक वारसा असलेल्या नाशिककरिता सेवा
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना धनगर समाजासाठी महत्वाची घोषणा केली आहे. धनगर समाजाला एक हजार कोटींचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली जाणार आहे. तसेच शेळी-मेंढी पालनासाठी १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. धनगर समाजासाठी एक हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे.
आधी शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा प्रवास करणार्या धंगेकरांनी तरी यातून धडा घेतला तरी खूप झाले. एकूणच फुगा उडवण्याच्या नादात काँग्रेसचाच फुगा फुटू नये म्हणजे झालं!
‘उडान’ किंवा ‘उडे देश का आम नागरिक’ ही संकल्पना मोदी सरकारने अस्तित्वात आणली. तसेच मोदी सरकारच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या, सेवा वाढविण्यावरही विशेष भर दिला गेला. त्यानिमित्ताने भारताच्या हवाई वाहतूक सेवा क्षेत्राचा संक्षिप्त इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
"वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला त्यामुळे राज्यातील दीड लाख तरुणांचा रोजगार हिरावला गेला" असा आरोप करत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील तरुणांना या विरोधात पेटून उठले पाहिजे असे धक्कादायक विधान केले आहे.
गोवा मुक्ती संग्रामातील एका स्वातंत्र्यसैनिकाच्या ८७ वर्षीय पत्नीचा पेन्शनच्या लढ्याला तब्बल २० वर्षानंतर यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या संवेदनशीलतेमुळे अनुसयाबाई वैजनाथ नवले (परभणी) यांची पेन्शन सुरू झाली. लालफितशाहीच्या कारभारामुळे हे पेंशन बराच काळ प्रलंबित होती. दरमहा तब्बल २६ हजारांहून अधिक रक्कम त्यांना मिळणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला तिचा न्याय्य हक्क मिळाला आहे.
हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला.