भारताचं बदलतं स्वरूप, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राष्ट्राचे वाढणारे महत्त्व, देशांतर्गत विकासाची आलेली लाट या सर्वांमुळेच १४२ कोटी भारतीयांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो. आज संपूर्ण जगाचा विश्वास संपादन करून भारत ‘विश्वगुरू’ म्हणून उदयास येतोय आणि या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एकच सांगावेसे वाटते की, विश्वगुरू भारताचे नायक म्हटलं की, डोळ्यासमोर आपलं नाव येतं.
Read More
‘सब का साथ, सब का विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन प्रारंभ झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दमदार वाटचाल ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या वैश्विक सूत्रापर्यंत पोचली. याचसोबत ’चांद्रयान’ या भारताच्या चंद्रविषयक मोहिमेपर्यंतची यशकथा म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मनाला मिळवून दिलेला जबर आत्मविश्वास आहे.
जगभरात गेल्या वर्षभरात युक्रेनमधील युद्धाबरोबरच सर्वाधिक चर्चा भारतातर्फे आयोजन होत असलेल्या ‘जी २०’ परिषदेची झाली. भारतातील ६० शहरांमध्ये पर्यावरण, हवामान बदल, ऊर्जा, शाश्वत विकास, शिक्षण, पर्यटनासह ३२ विषयांवरील चर्चा आणि २०० बैठका अशी विस्तृत व खोलवर चर्चा झाली. ‘जी २०’च्या इतिहासात यजमान राष्ट्राने देशाच्या विविध भागांत बैठका घेतल्याचे हे १८ वर्षांतील पहिलेच उदाहरण आहे. या परिषदेचे सर्व श्रेय विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. या यशस्वी परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारताच्या शिरपेचात
'जी २०’ परिषदेत उपस्थित प्रत्येक मुद्दा सर्वानुमते मान्य झाला, हे भारताचे मोठे यशच. त्यातच ‘जी २०’चे यजमानपद सांभाळणार्या भारताच्या पंतप्रधानांनी उपस्थित सगळ्यांचेच आदरातिथ्य अगदी भरभरून केले. सक्षम भारत, सजग भारताचे समर्थ रूप मोदींनी त्यावेळी सर्व जगासमोर मांडले. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आदरातिथ्यही अगदी भारतीय परंपरेने उदार स्वरुपात केले.
पर्शियन आखातातील युद्धजन्य परिस्थिती आणि ५-जी तंत्रज्ञानातील चीनची आघाडी हे विषय दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहेत. या सर्व विषयांवर भारत आणि अमेरिकेतील सहकार्याचा पाया माइक पॉम्पिओ यांच्या भारत भेटीत रचला गेला. ट्रम्प आणि मोदी यांच्यातील द्विपक्षीय आणि ट्रम्प-मोदी-आबे यांच्यातील त्रिपक्षीय बैठकांत त्याला निश्चित दिशा मिळाली.