मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या घराघरांत अनेक मराठी कलाकार पोहोचले. त्यातीलच एक चेहरा म्हणजे राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी. झी मराठी वाहिनीवरील जाऊ बाई गावात या कथाबाह्य कार्यक्रमात नुकताच तो सुत्रसंचलन करताना दिसला होता. आता मोठ्या पडद्याव हार्दिक जोशी दिसणार आहे. सुमित संघमित्र दिग्दर्शित 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात हार्दिक आणि अभिनेते सुनील अभ्यंकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणि या चित्रपटात पुतण्याच्या भूमिकेत असलेला हार्दिक काका मला वाचवा असे काकांना अर्थात सुनील अभ्यंकर यांना बोलताना दिसत आहे.
Read More
राज्यातील कोरोनाचा फैलाव वाढत असून सध्या राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. याचविषयी आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे व या बैठकीमध्ये महाराष्ट्रात ३ आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो
सगळे मुंबईकर मिनी लॉकडाऊन होणार का, या संभ्रमावस्थेत असताना "मुंबईत आता कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयातील खाटा भरून जात आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे. लॉकडाऊन कोणालाच नकोय. पण काही कठोर नियम करावेच लागणार आहे. शेवटी बचेंगे तो और भी लढेंगे. जिवंत राहिलो तर या पृथ्वीतलावर आपण काही तरी करू शकतो," असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
हिंगोलीत ७ सात दिवसांचा कडक लॉकडाऊन तर बीडमध्ये ८० वर्षांत पहिल्यादांचा ’गाढवाची मिरवणूक’ रद्द
भारतात कोरोना विषाणू संक्रमणाचे आकडे कमी होण्याच्या मार्गावर असताना आता एक चिंतेची बाब पुढे येत आहे. युरोपात कोरोना परिस्थिती पुन्हा बिघडण्याच्या स्थिती आहे. या खंडातील एक महत्वाचा देश मानला जाणाऱ्या फ्रान्सने येथे पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे जास्त धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तुमच्याकडे पदवी नसेल तर कुठलीही कंपनी नोकरी देणार नाही, असा एक नियमच सर्व क्षेत्रात लागू होता. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी मानल्या जाणार्या ’गुगल’नेच पदवी शिक्षणाची गरज नसल्याचे म्हटल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
‘लॉकडाऊन ५’ची नवीन नियमावली राज्य सरकारकडून जारी!
पीसीएनटीडी'तर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे त्यांचे हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ९१ हजार २६० इतकी झाली आहे. रविवारी दिल्लीत ४२२, ओदीशामध्ये ९१, राजस्थानात ७०, आंध्रप्रदेशात २५ आसाममध्ये तीन रुग्ण आढळले होते. देशात ३१ जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. ७४ दिवसांनी कोरोना रुग्णांचा आकडा १० हजारांवर पोहोचला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांतच १० हजार नवे रुग्ण आढळण्याचा विक्रम तयार झाला आहे. १६ मे रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येने ९० हजारांचा पल्ला ओलांडला.
सरकारी मदतीच्या घोषणांचे राजकारण करू नका, हात जोडून विनंती आहे, असा टोला अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लगावला आहे. केवळ रस्त्यावर मजूरांशेजारी बसून काही होत नाही, असे म्हणत त्यांनी खासदार राहुल गांधींवर टीकाही केली आहे.
कृषीक्षेत्राशी संबंधित अनेक घोषणांपैकी जीवनावश्यक वस्तू कायद्यातील बदल व शेतमालासाठी देशव्यापी एकच बाजारपेठ हा मुद्दा दूरगामी परिणाम करणारा ठरेल. केवळ कोरोनाकाळ व ‘लॉकडाऊन’ची परिस्थितीच नव्हे तर या कायदेबदलामुळे शेतकर्यांच्या जीवनात, उत्पन्नात, रोजगारात चिरंतन आमुलाग्र परिवर्तन घडेल.
अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. देशाच्या जीडीपीच्या एकूण १० टक्के म्हणजेच २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले.
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही १६ हजार ७१ वर पोहोचली आहे. रविवारी महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या ही ३६४८ इतकी होती. शनिवारी देशात सर्वात जास्त १३७१ संक्रमित रुग्ण आढळले. तसेच एका दिवसांत ४२६ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली आहे.
संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
: मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. शासकीय कार्यालयात कामानिमित्त अनेक जण येत असतात. त्यामुळे शासन शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.