(Solid waste management) देशातील कचर्याच्या समस्याने अधिकच उग्र रुप धारण केले आहे. त्याची कारणे असंख्य आहेत. त्यामुळे वेळीच या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी शासन आणि नागरिक या दोघांनीही काटेकोरपणे केल्यास या समस्येचे समाधान मिळू शकेल. त्यासाठीच्या उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
Read More
समाजमाध्यमांवर ‘साय भाय’ बनून समाजाला वन्यजीवविषयक शास्त्रीय ज्ञानाची लस देणार्या निनाद अमोल गोसावी या अवलियाविषयी..
जगभरातील बरेचसे पक्षी एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी स्थलांतर करतात, हे आपण जाणतोच. आपल्या भोवतालाच्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी नैसर्गिकपणे घडणारी ही प्रक्रिया. जगभरातील लाखो पक्षी विविध हंगामांत स्थलांतर करतात. काही पक्षी प्रजननाच्या कालावधीत, तर काही ऋतूबदलानुसार स्थलांतराचा निर्णय घेतात. पक्षी स्थलांतराच्या या कालावधीमध्ये वातावरणात होणारे बदल आणि या बदलांचे परिसंस्थेतील इतर घटकांवर होणारे परिणाम, यांचेही सहसंबंध जोडलेले आहेत. त्यामुळे पक्षी स्थलांतरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या प्रजा
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणिगणना ही ‘सॅम्पलिंग सर्वे’ म्हणून जरी योग्य असली तरी अंदाज आणि ‘जनरलायझेशन’ हा याचा मुख्य पाया आहे. पौर्णिमेच्या दिवशी मचाणवर बसून विविध ठिकाणी पाणवठ्यावर येणारे वन्यजीव मोजताना आणि त्यावरून संपूर्ण क्षेत्रातील वन्यजीवांच्या संख्येचा अंदाज बांधताना अनेक चुका होणे सहज शक्य आहे. म्हणून नवनवीन तंत्रज्ञान, ट्रान्सेक्ट लाईन सर्वे आणि ट्रॅप कॅमेराचा अधिकाधिक वापर करून अचूकतेकडे वाटचाल करणारे अंदाज बांधणे अधिक योग्य ठरेल.