इराणने कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे विकसित करणे हे अमेरिकेसह इस्रायल आणि आखाती देशांसाठीही धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे आण्विक शक्तीपासून इराणला परावृत्त करण्यासाठी एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे धमक्या अशी सध्या ट्रम्प सरकारची तारेवरची कसरत सुरूच आहे. त्यात इराणच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केल्यानंतर दोन्ही देशांमधील चर्चा फिस्कटण्याचीच चिन्हे अधिक. त्यानिमित्ताने अमेरिका आणि इराण यांच्यातील वितुष्ट आणि राजवटबदलाची रंगलेली चर्चा, याचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
विशेष प्रतिनिधी संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात नियोजित आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीचा केंद्र सरकार विचार करत नसल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांची भेट घेतली.
( CM devendra fadnavis on the discussion of final budget week proposal ) कुठलीही घटना झाली आणि कुणीही केली तरी काही लोक त्याला थेट माझा सगा सोयराच करून टाकतात. पण भारताचे संविधान माझा सगा आणि महाराष्ट्राची १३ कोटी जनता माझे सोयरे आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंगळवार, २५ मार्च रोजी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
मुंबई : “सावरकरांचे हिंदुत्व हे व्यापक राष्ट्रहितासाठी दिशादर्शक होते. आजच्या पिढीला ते आजच्या भाषेत समजावून सांगितले पाहिजे,” असे प्रतिपादन संशोधक, अभ्यासक, वक्ते अक्षय जोग ( Akshay Jog ) यांनी केले. नवी मुंबईतील वाशी येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिभवन येथे ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि.11 जुलै रोजी अर्थतज्ज्ञांच्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केले. यावेळी मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पातील अपेक्षांविषयी चर्चा झाली. बैठकीत 10 भागधारक गटांमधील 120 हून अधिक निमंत्रित, तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ, कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्य, एमएसएमई, व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थशास्त्रज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि शहरी क्षेत्र या बैठकीत स
"भारतातील लोक विविध गॅझेट्सच्या वापरावर (स्क्रीन टाईम) सरासरी सहा तास घालवतात. ही चिंतेची बाब आहे. देवाने आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि अफाट क्षमता असलेले व्यक्तिमत्व दिले असताना गॅझेटचे गुलाम का व्हावे?", असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या सहाव्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी बोलताना केला.
पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे; या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
“जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात, ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे दि. ११ ते १४ ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार आहे,” अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दि.२४ रोजी टोकियोमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष 'जो बिडेन' यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान भारत आणि अमेरिकेतील भागीदारी ही विश्वासाची भागीदारी असल्याचे सांगितले.
पेट्रोल-डिझेलवरील करकपातीबाबत चर्चासुद्धा नाही!
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाच्या पाचव्या दिवशी म्हणजे सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध थांबविण्याबाबत चर्चेस सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये बेलारूस येथे अनेक तासांपर्यंत चर्चा करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेतूनही युद्ध थांबविण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा बैठक होणार असल्याचीही माहिती आहे.
7 एप्रिल 2021 रोजी संवाद साधणार
याच फादर दिब्रिटोंना उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात देशात कसलेसे भयाचे वातावरण असल्याचा साक्षात्कार झाला होता. आज देशात खरोखरच कोरोनाच्या भयाचे वातावरण असताना फादरना आपल्या माणुसकीपेक्षा आपल्या धर्माची अधिक चिंता वाटते.
सार्वजनिक संपत्तीच्या अशा प्रकारच्या नुकसानीबाबत कडक कायदे असूनही बरेचदा आंदोलनकर्त्यांना अटक झाली तरी नुकसानीच्या वसुलीच्या नावाने बोंबाबोंबच दिसते. या पार्श्वभूमीवर योगी सरकारने दाखवलेल्या कडक पवित्र्याचं स्वागत तर करायला हवंच, पण आंदोलनकर्त्यांची सार्वजनिक तसेच खाजगी संपत्तीला हातही लावायची हिंमत होणार नाही, इतकी कायद्याची भीती निर्माण करायला हवीच.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, अशी भाकिते करणार्या मणिशंकर अय्यरसारख्यांची यामुळे जशी गोची झाली, तसेच त्यांचे मानसिक संतुलनही ढळत गेले. गेल्या पाच वर्षांतील मणिशंकर अय्यर वा तशा विचारांच्या लोकांची वक्तव्ये तपासून पाहिली की त्याची खात्री पटते.
नियुक्तीच्या प्रक्रियेत दोन भाग असतात. मावळते सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करीत असतात आणि केंद्र सरकार त्याला मंजुरी देत असते. न्या. दीपक मिश्रा यांनी न्या. रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस न करता, दुसरेच नाव सुचविले तर? या प्रश्नाचे उत्तर कुणाजवळही नसल्याने, नव्या सरन्यायाधीशांच्या नावाबद्दल उत्कंठा व उत्सुकता तयार झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान खडगा प्रसाद ओली यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. आज नवी दिल्ली येथील हैदराबाद हाउस येथे ही द्विपक्षीय चर्चा झाली.