एअर इंडियाच्या सर्व बोईंग विमानांचे संपूर्ण सूरक्षा ऑडिट होईपर्यंत सर्व विमानांची विमानसेवा रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात वकील अजय बन्सल यांनी दाखल केली आहे. देशातील विमान सेवेच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ही याचिका दाखल करण्यात आली असून यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Read More
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्च २०२३च्या वाहतूक अहवालात असे नमूद केले आहे की, जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत देशांतर्गत विमानसेवेचा लाभ ३७५.०४ लाख लोकांनी घेतला. याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान प्रवासी संख्या २४७.२३ लाख होती. हवाई प्रवाशांमध्ये वार्षिक वाढ ५१.७० टक्के आणि मासिक वाढ २१.४१ टक्के नोंदवली गेली आहे.