कल्याण डोंबिवली महापालिकेची मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी येणारी थकबाकी वसूल करण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत महापालिकेस मालमत्ता आणि पाणी पट्टीच्या करापोटी १८०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. या अभय योजनेतंर्गत दिलेल्या मुदतीत थकबाकीदार थकबाकीची रक्कम भरु शकतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या थकबाकीदाऱ्याच्या थकबाकीवर लावण्यात आलेल्या व्याजाच्या रक्कमेत ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे, अशी माहिती कडोंमपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दा
Read More
कल्याण-तळोजा मेट्रो मार्गातील १७ उन्नत स्थानकांच्या बांधकामांसाठी ‘एमएमआरडीए’कडून नुकत्याच १ हजार, ५२१ कोटींच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. मेट्रोचे काम येत्या अडीच वर्षांत पूर्णत्वास येण्याचा अंदाज असून या मेट्रोमुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होणार आहे. तसेच, डोंबिवली ग्रामीण परिसरातून अनेक प्रवासी डोंबिवली रेल्वेस्थानकात येत असतात. परंतु, हे प्रवासी मेट्रोकडे विभागले गेल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकावरील भार कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत प्रवासी व नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
“अखेर हा सत्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, खर्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे,” अशी मार्मिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र शिंदे गटाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने ’शिवसेना’ नाव आणि ’धनुष्यबाण‘ चिन्ह मिळाल्याबद्दल टेंभी नाक्यावरील आनंद मठात भगवा फडकवत जल्लोष साजरा केला. टेंभीनाक्यावर शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला. टेंभीनाका येथील जल्लोषा