Lord Gautam Buddha Principles Sanatana Dharma and Islamic Invasion तथागत बुद्धांच्या विचारांची मोहिनी संपूर्ण जगावर आहे. अनेक देश तर त्यांच्या विचारांमुळेच आज प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. मात्र, याच बुद्धविचारांनाही इस्लामी आक्रमणाच्या जाचातून जावे लागले. त्यामुळे तथागत बुद्धांच्या विचारांचे महत्त्व आणि त्यांची आजच्या काळात असलेली गरज यांचा बुद्धपौर्णिमेनिमित्त घेतलेला आढावा...
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र आळंदी, पुणे येथे आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जमलेल्या वारकरी भाविकांशी संवाद साधला.
Chhatrapati Shivaji Maharaj आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राज्यातील सर्व गडकोट किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्रधान्य देण्यात येईल. तसेच गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज लागेल तेव्हा संरक्षण दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पुण्यातील वढू येथे आले असता ते बोलत होते.
या देशात अनेक आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणाचा उद्देश फक्त साम्राज्य विस्तारच नव्ह्ता, तर त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म नासवण्याचे कार्यही या आक्रमकांनी केले. मात्र, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमामुळेच परिस्थिती आमूलाग्र बदलली हे खरेच. शिवरायांच्या जयंती(तिथीप्रमाणे)निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा मागोवा...
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. योगी आदित्यनाथांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी या लांगूलचालनवादी ‘नॅरेटिव्ह’ला तितक्याच आक्रमकपणे छेद दिला आहे.
जगातील अनेक देशांच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षाही, अधिक लोकांनी सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात स्नान केले आहे. भारत सरकार इतक्या प्रचंड जनसंख्येचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करू शकते, हे जगाने पाहिले. अनेक देशांतील लोकही यात सहभागी झाल्यामुळे, जगालाही सनातन धर्माचे विश्वरूपदर्शन झाले आहे.
‘करून करून भागला, देवपूजेला लागला’ ही म्हण, जणू रोहित पवारांसाठीच ( Rohit Pawar At Mah Kumbh ) तयार झाली असावी. काल-परवा त्याचे प्रत्यंतर आले. सनातन धर्माच्या रुढी, परंपरांवर अत्यंत खालच्या पातळीत विधाने करून झाल्यानंतर, हे महाशय थेट दिसले ते कुंभमेळ्यात! ब्रिगेडींचे शिरोमणी, थोरल्या पवारांच्या नातवाला या पवित्रस्थळी पाहून, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आयुष्यभर पवारांनी हिंदूंना ‘अंधश्रद्धाळू’ म्हणून हिणवले आणि पुरोगामित्वाची ‘हिरवी’ शाल पांघरली. पुढे त्यांच्या राजकीय वारसदारांनीही तीच री ओढली. विशिष्ट
‘सेवा हाच धर्म’ या विचाराने, ग्रामीणवासीयांसाठी रुग्णसेवेतून विशेष सेवा पूरवणार्या दीपीशा कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉ. दीपाली गोडघाटे यांच्याविषयी..
सर्वोच्च न्यायलयाने प्रशांत भूषण यांनी न्यायलयात दाखल केलेल्या धर्म संसदेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. त्याच बरोबर न्यायालयाने उत्तर प्रदेश इथल्या अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवर विचार करण्यास सुद्धा नकार दिला. यती नरसिंहानंद फाउंडेशनने १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर डासना येथील शिव शक्ती मंदिरात धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील ४५ मुस्लिम परिवारांनी सनातन धर्मात घरवापसी केली आहे. घरातील दिवंगत व्यक्तिचे ११ डिसेंबर २०२४ रोजी हिंदू विधींमध्ये अंतिम संस्कार केले. अंतिम संस्कारानंतर गंगा स्नान करुन १५० लोकांनी हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला आहे. सनातन धर्मात परतल्यावर सलमान खान ( Salman ) नाव बदलुन संसार सिंह ठेवले गेले. मुघलांच्या अत्याचाराने त्यांचे पुर्वज हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्मात धर्मांतरित झाले होते, हे कबुल करुन त्यांनी गौरीशंकर गोत्र स्वीकारले आहे.
ठाणे : “ज्ञानसाधना हीच खरी आनंदसाधना ( Anandasadhana ) असून वाचन हा आपला श्वास असला पाहिजे,” असे प्रतिपादन ‘चाणक्य मंडळा’चे संस्थापक, माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
नाशिक : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात २१व्या पशूगणनेस सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजीपासून प्रारंभ झाला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही पशूगणना ( Animal Census ) सुरू झाली आहे. जिल्ह्यात शहरासाठी १६५ व ग्रामीण भागात ३८४ प्रगणक मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण करणार आहेत. पशुपालक व नागरिक यांनी आपल्याकडे आलेल्या प्रगणकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी केले आहे. पशूगणनेचे काम करणार्या प्रगणकांवर पर्यवेक्षणासाठी शहरी भागात २५ व ग्रामीण भा
ठाणे : “भारताशिवाय महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राशिवाय भारत नाही. असे असताना आज काही शक्ती महाराष्ट्र फोडायला निघाले आहेत. अशावेळी महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी आवर्जून मतदान करा,” असे आवाहन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ( Avinash Dharmadhikari ) यांनी केले.
अभिनेते आणि निर्माते मंगशे देसाई ( Mangesh Desai ) यांनी आजवर विविध चित्रपट, नाटकांतून उत्तम भूमिक साकारल्या. नुकत्याच त्यांची निर्मिती केलेला धर्मवीर २ हा चित्रपट चांगलाच हिट ठरला असून याच निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्या जुन्या आठवणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ( Avinash Dharmadhikari ) यांनी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्या नेतृत्वातील सेरेन एंटरटेनमेंटने धर्मा प्रोडक्शनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्रसिध्द चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंटमध्ये अदर पूनावाला यांनी १ हजार कोटी रुपये किमतीचे ५० टक्के भागभांडवल विकत घेतले आहे. त्यामुळे ना रिलायन्स, ना सारेगामा तर पूनावाला यांनी ५० टक्के भागीदारी मिळाली आहे.
करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्युटचे अदर पुनावाला यांनी आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. हिंदीतील लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माते करण जोहरच्या कंपनीमध्ये अर्थात धर्मा प्रोडक्शनमध्ये अदर पुनावाला यांनी ५० टक्के भागीदारी विकत घेतली आहे. अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील १००० कोटी रुपयांना केल्याची माहिती मिळत आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करतायेत हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा 'दि एआय धर्मा स्टोरी' २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच ही तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून चित्रपटाचे नवीन पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात पुष्कर जोगबरोबर स्मिता गोंदकर आणि दीप्ती लेले दिसत आहेत. पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहे
प्रविण तरडे दिग्दर्शित-लिखित, मंगेश देसाई निर्मित आणि प्रसाद ओक अभिनित धर्मवीर २ हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी देशभरात मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
प्रविण तरडे लिखित-दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज व मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात दिघे साहेब आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय होती हे अधोरेखित करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे नगरविकास मंत्री असताना शिवसेनेत नेमकं काय घडलं? ज्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठं पाऊस उचललं आणि थेट गुवाहाटी गाठली? महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ ला घडलेल्या राजकारणातील नाटकाचा पडदा लवकरच धर्मवीर चित्रपटाच्
धर्मवीर चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातल्यानंतर शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याआधी गुरुवारी या चित्रपटाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी 'धर्मवीर ३' ची पटकथा मी लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण होणार असल्याची घोषणा केली.
(Aheri Vidhansabha) अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अहेरीत यंदा बापलेकीत सामना रंगणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, अहेरी विधानसभेचं राजकीय समीकरण काय आहे? ते या व्हिडीओतून जाणून घेऊया.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी गडचिरोलीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
प्रभू रामचंद्रांचे सद्गुरु म्हणून नाम, वर्णन, भक्ती, उपासना आणि चरित्र या गोष्टींचे समर्थ रामदास स्वामी अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी स्तवन करतात. त्यांनी अनेक नाममुद्रा घेऊन भक्तिरचना केलेल्या आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये रामदर्शनाचे विलोभनीय इंद्रधनुष्य आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणातील रामापेक्षा वेगळा, ‘देवबंधमुक्ती’ करणार्या योद्ध्या रामाचा, संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातून स्वीकार केला. ‘धर्म जागो राघवाचा।’ म्हणत समर्थांनी समाजात स्वत्वाचे, सामर्थ्याचे जनजागरण केले.
प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘धर्मवीर १ : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या यशानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचं जीवन, त्यांचे नातसंबंध आणि त्यांचं हिंदुत्वाशी असलेलं नात दाखवणारा ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपट ९ ऑगस्ट रोजी देशभरात मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार आणि आनंद दिघे यांचं नातं कसं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘महाएमटीबी’ने केला असता अनेक कलाकारांचे आनंद दिघे यांच्यासोबत ऋणानुबंध कसे होते हे समजले. त्यापैकी अभिनेते आणि व्हॉईस ऑव्हर
आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा अफलातून ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले असून कथा निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकरांनी मिळून लिहिली आहे.
समाजाचा आरसा, लोकांचे आचार-विचार, आजूबाजूला घडणार्या घटना, लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे आणि मोठे माध्यम म्हणजे चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज. गेल्या काही काळात वास्तवदर्शी आणि चरित्रपटांची सर्रास लाट ही मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही दिसून आली. भयपट, रहस्यपट, विनोदी किंवा विनोदी-भयपट याच बाजातील अनेक कलाकृती प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरल्या. आपण म्हणतो की, अमुक एक कलाकार केवळ विनोदी भूमिकाच साकारु शकतो किंवा एखादा कलाकार केवळ खलनायकाचीच भूमिका उत्तम सादर करू शकतो. पण, मराठी कलाकारां
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका मुलीने घरवापसी करून सनातन धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्कान सैफी असे या मुलीचे नाव असून ती आता खुशी या नावाने ओळखली जाणार आहे. खुशीने मंदिरात राजेश कुमार नावाच्या तरुणाशी लग्नही केले आहे. यावेळी त्यांनी वैदिक विधींनुसार हवन केले आणि गायत्री मंत्राचा जप केला. हा विवाह रविवार, दि. ३० जून २०२४ अगत्स्य मुनी आश्रमात झाला. यावेळी आचार्य पंडित के.के.शंखधर यांच्यासह हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 30 जणांनी इस्लाम धर्म सोडून सनातनमध्ये घरवापसी केली आहे. यासोबतच त्यांनी आपली इस्लामिक नावे सोडून हिंदू नावे धारण केली आहेत. हिंदू धर्मात घरवापसी करण्यासाठी विशेष विधी आयोजित करण्यात आला होता. या सर्वांनी धर्म सोडण्यासाठी कायदेशीर अर्जही केला आहे.
बाईपण भारी देवा आणि झिम्मा २ च्या भव्य प्रतिसादानंतर जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवी कोरा, धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला ‘एक दोन तीन चार' हा नवा चित्रपट येत्या १९ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
ज्याप्रमाणे सुपीक शेतजमिनीतून धान्याचे मोती पिकवण्यासाठी मशागत आवश्यक असते, त्याचप्रमाणे बालपणीचे संस्कार आणि शिक्षण उत्तर आयुष्याची पायाभरणी करते. चौंडीमध्ये माणकोजी पाटील शिंदे आणि सुशीलाबाईंच्या पोटी जन्मललेल्या अहिल्येचीही जडणघडण अशीच विलक्षण होती. म्हणूनच वयाच्या आठव्या वर्षापर्यंत आई-वडिलांकडून अहिल्याबाईंना भविष्यातील जीवनाची दिशा मिळाली. अशा या ‘अहिल्या’ ते ‘अहिल्यादेवी’ जीवनप्रवास उलगडणारी ही कथा...
व्यक्तिगत दु:खाला बाजूला सारून राष्ट्रहिताला प्राधान्य देत, अहिल्याबाईंना होळकर राज्याची धुरा हाती घेतली. पण, नुसतीच ती जबाबदारी न घेता, त्या जबाबदारीचे आयुष्यभर समर्थपणे निर्वहनदेखील केले. या कार्यात भारतात परकीय आक्रांतांच्या धार्मिक उन्मादाने धास्तावलेल्या संस्कृतीला आपल्या क्षात्रतेजाने पुन्हा तेजोवलय प्राप्त करून दिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात देशभरात केलेल्या व्यापक कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
पुष्कर जोग दिग्दर्शित 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये कामिल नावाच्या तरुणाने आपले नाव आणि धर्म लपवून इंस्टाग्रामवर एका मुलीशी मैत्री केली. त्यानंतर त्याने मुलीला ब्लॅकमेल करून वर्षभर तिचे लैंगिक शोषण केले. या काळात कामिल आणि त्याच्या कुटुबियांनी मुलीवर धर्मांतर करण्यास, नमाज अदा करण्यास आणि गोमांस खाण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दि. १८ मे रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबद्दल दाखवलेलं सगळं खोटं आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सगळं खरं समोर येईल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. सोमवारी ठाण्यातील महायूतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न केले आणि वारंवार तीन जणांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी ताहेर तय्यब पठाण,तय्यब शब्बीर पठाण आणि आयेशा ताहेर पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ताहेरने स्वत:ची ओळख लपवून एका तरुणीला जाळ्यात ओढले. तसेच तिला ३ मौलांनाकडे नेत दि. ११ फेब्रुवारीला जबरदस्तीने तिचे धर्मांतर आणि निकाह केला. मांस खाऊ घातले, बुरखा घालण्याची सक्ती केली, अत्याचार केला. फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेचा छळ केला.
आजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर अवलंबून असते त्याहूनही जास्त ती जबाबदारी ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारावरही असते. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer 2) यांचा जीवनपट मांडणारा ‘धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटानंतर ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ (Dharmaveer 2) चित्रपटाची घोषणा करण्य
दिल्लीत इस्लाम धर्माचा त्याग करत उज्माने दलित तरुण अनिल वाल्मिकीशी विवाह केला आहे. सनातन धर्मात प्रवेश करत आता ती मीरा म्हणून ओळखली जाणार आहे. मीरा आणि अनिल वाल्मिकी यांचे गेल्या ६ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. उज्मा(मीरा)च्या लग्नाकरिता कुटुंबीयांकडून आधीच एका मुस्लिम मुलाचा शोध सुरू होता.
पुष्कर ओझा दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ (Yodha) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाईला सुरुवात केली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Yodha) आणि दिशा पटनी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘योद्धा’ (Yodha) १५ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात या चित्रपटाने किती कमाई केली.
तामिळनाडूच्या राजकारणात पहिल्यापासूनच एक सशक्त ब्राह्मणविरोधी प्रवाह आहे. अलीकडच्या काळात ब्राह्मणविरोधाने हिंदू म्हणजे सनातन धर्मविरोधी रूप घेतले. भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून, देशात हिंदू परंपरांना नव्याने आदर मिळायला लागला असताना, तामिळनाडूत हिंदूविरोधी राजकारणानेही उसळी मारली. तामिळनाडूत भाजपच्या वाढत्या जनपाठिंब्याचा हा परिणाम. पण, सनातन धर्माचा आंधळा विरोध हा घटनाद्रोह आहे, याची जाणीव आता तेथील नेत्यांना न्यायालयानेच करून दिली, हे स्वागतार्ह.
"धर्माला रिलीजन म्हणणे योग्य नाही. रिलीजन ही उपासनेची पद्धत आहे. त्यामुळे धर्माला इंग्रजीतही धर्मच म्हटले पाहिजे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मालवा येथील 'नर्मदा साहित्य मंथन' या वार्षिक साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अहिल्यादेवी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रेणू जैन यादेखील उपस्थित होत्या. (Manmohan Vaidya on Dharma)
अयोध्येत २२ जानेवारीला राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. २४ जानेवारीपासुन राममंदिर सर्व भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यानंतर अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानिमित्ताने भाविकांसाठी सोयीसुविधा करण्याच काम सरकारकडून केले जात आहे.
येत्या २२ जानेवारीला राममंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्या सोहळ्याची भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येत राम मंदिरावर १६१ फूट उंचीवर धर्मध्वज फडकवला जाणार आहे. मंदिराची उंची १६१ फूट इतकी आहे. त्यावर ४४ फूट उंच ध्वज फडकवला जाणार आहे.
राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे. परंतु, तरीही असे प्रकार निदर्शनास येत असल्यामुळे शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके तैनात करण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बुधवार, दि. १२ डिसेंबर रोजी विधानपरिषदेत केली.
‘कोण भारतमाता? तिचा शोध घ्यावा लागेल’ यांसारखी बेजबाबदार आणि उद्दाम विधाने पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान करणार्या राहुल गांधींना मतदारांनी या निकालातून सणसणीत चपराक लगावली. मात्र, या निकालातून कोणताही धडा न घेता, द्रमुकच्या खासदाराने ‘गोमूत्रवाल्या राज्यांत भाजपचा विजय झाला,’ असे म्हणत हिंदू धर्म, सनातन संस्कृतीला अपमानित करण्याचा पुन्हा एकदा केविलवाणा प्रयत्न केला. तेव्हा विधानसभा निवडणूक निकालाप्रमाणेच आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी अशा सनातनविरोधी नेत्यांना मतपेटीतून त्यांची जागा दाखवून दिल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी ‘महाएमटीबीशी’ संवाद साधताना अभिनेता प्रसाद ओक याचे दिग्दर्शकाला प्रश्न विचारणारा नट अशा शब्दांत कौतुक केले.
“हिंदुत्व हा माझा प्राण आहे”, असे अभिनेता प्रसाद ओक याने म्हणत त्याच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या त्याने मांडली आहे. ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. यावेळी ‘महाएमटीबी’शी बोलताना प्रसाद ओक याने त्याच्यासाठी हिंदुत्व काय आहे? हे व्यक्त केले. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.