काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या ललित कला केंद्रात रामायण विडंबन नाट्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठे ही नेमकी शिक्षणाचे माहेरघर की विद्रोहाचे अड्डे, असा प्रश्न उपस्थित झाला. वर्षभरापूर्वी ‘आयआयटी मुंबई’त दर्शन सोळंकीच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यापीठ प्रशासनाचा ‘हिंदूफोबिया’ असाच चव्हाट्यावर आला होता. तेव्हा, या घटनेतील तथ्य, तपास, कारवाई आणि न्यायाची प्रतीक्षा यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
पवई आयआयतील दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने जिथे सातव्या मजल्यावरून ऊडी घेत आत्महत्या केली. त्या घटनास्थळाचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आरपीआयतर्फे करण्यात आली आहे. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर निष्काळजीपणाबद्दल आयआयटी प्रशासनाला जबाबदार धरावे, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.
पवई 'आयआयटी'मधील विद्यार्थी दर्शन सोळंकी यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी व्हावी. तसेच पुन्हा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना पुन्हा घडू नयेत या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येणार आहे. दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पवई आयआयटीच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर शांतातपूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइं चे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, पवई विभागीय नेते बाळ गरुड, विनोद लिपचा