( Elphinstone Bridge closed ) शहराच्या मध्यवर्ती भागातील 125 वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर गुरुवार, दि. 24 रोजी रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Read More
गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारामध्ये सर्वत्र खरेदीसाठी लगबग बघायला मिळत आहे. अशातच यावेळी छोट्या गुढींनी सगळ्यांचे लक्ष ओढून घेतला आहे. आकाराने छोटे असलेल्या या गुढींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळाली.
( RSS official Dattatreya Hosabale in Dadar on Ram Navami ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रमांतून त्यांचे प्रेरणादायी चरित्र आणि अलौकिक योगदानाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच मालेतील एक प्रकट कार्यक्रम ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती’, मुंबई महानगराच्यावतीने दादरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
( BJP gives opportunity to Sandeep Joshi, Sanjay Kenekar, Dadarao Keche for Legislative Council maharashtra ) महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी गुरूवार, दि. २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना भाजपने विधान परिषदेसाठी संधी दिली आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला पालघर स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आता दादरहून सुटणारी भुसावळ गाडी पालघरला थांबेल. ०९०५१/०९०५२ दादर-भुसावळ या विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने ही मागणी केली होती.
दादर सांस्कृतिक मंच आणि श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दादरकरांसाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अजरामर रचनांना स्वररूप देणारी बहारदार मैफिल ‘शतदा प्रेम करावे’ हा कार्यक्रम साकारला जाणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे, मृण्मयी फाटक, श्रीरंग भावे आणि गौरी पंडित हे आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार असून, सूत्रसंचालनाची धुरा अनुया गरवारे – धारप सांभाळणार आहेत.
समूह पुनर्विकासाबाबत कृती आराखडा तयार करा ; दादर, प्रभादेवीमधील प्रस्तावित समूह पुनर्विकासासंदर्भात बैठक
शिवाजी पार्कमधील धुळीच्या समस्येवर १५ दिवसांत आराखडा तयार करा, अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिकेला दिल्या आहेत. सोमवार, ६ जानेवारी रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पाहणी दौरा केला.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून, इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
दादरमधील ( Dadar ) हनुमान मंदिर निष्कासित करण्यासंदर्भातील नोटिशीला रेल्वे मंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. तमाम हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या भावना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवला. या भावनांचा आदर करीत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित नोटिशीला स्थगिती दिली.
मुंबई : दादरमधील हनुमान मंदिर निष्कासित करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडूव तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री ( CM Fadanvis ) देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून दादरच्या हनुमान मंदिराचे नियमितीकरण करण्याची ग्वाही दिली आहे.
मुंबई : प्रभाग क्रमांक १७८ चे माजी नगरसेवक अमेय घोले यांच्या नेतृत्वाखाली दादर ( Dadar ) पारशी कॉलनीतील नागरिकांनी मंगळवार, दि. ११ डिसेंबर रोजी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबचत झालेल्या बैठकीत कॉलनीत सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या सध्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मध्य रेल्वेने अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने ( Trains ) घेतला आहे.
मुंबई : समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित कृष्णा दादाराव शिंदे निर्मित आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा.लि.तर्फे बनवण्यात आलेला ‘मिशन अयोध्या’ ( Mission Ayodhya film ) हा चित्रपट दि. २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामललाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळ
मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या दादर स्थानकावरील फलाट क्रमांक बदलण्यात आले आहे. दादर स्थानकातून मेल गाडयांनाही थांबे देण्यात येतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा गोंधळ होतो. अशातच दोन्ही मार्गांवरही समान फलाट क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मध्य रेल्वेने दादर स्थानकावर रात्री १२ वाजेपासून aलागू केला आहे.
(PM Narendra Modi) दादरच्या शिवाजी पार्क येथे गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी होणार्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी वाहतूक निर्बंध आणि वाहतूक वळवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुरुवारी, दि. १४ नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने समर्थक एकत्र येण्याच
प्रतिनिधी दादरच्या शिवाजी पार्क येथे आज होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवार दि.१२ रोजी वाहतूक निर्बंध आणि वळवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १४ नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने समर्थक जमू शकतात.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी सिंघम अगेन चित्रपटाची टीम उपस्थित होती. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण आणि अगेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता अखेर अर्जुननेच ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे.
Mumbai Railway Stations : आपण मुंबईत दररोज प्रवास करताना रेल्वे स्थानकं पाहतो, या स्थानकांची नावं ऐकतो. पण या स्थानकांना हीच नावं का देण्यात याचा आपण कधी विचार केलाय का? मुंबईतील स्थानकांच्या नावांचा इतिहास आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओतून.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नायगाव (दादर) येथील बीडीडी चाळीला शरद पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. कालिदास कोळंबकर यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी उपोषणही केले. महायुती सरकार सत्तेवर येताच, त्यांनी या चाळीच्या नामांतरासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, नायगाव बीडीडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे
उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवापूर्वी महिला उद्योजकांसाठी भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य ग्राहक पेठेचे उद्घाटन मॉरिशस प्रजासत्ताक कौन्सुल आणि मिशन कौन्सुलेटचे प्रमुख दुशांत बुक्तोवार, संयोजिका व उद्योजिका मीनल मोहाडीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सुटकेसमधून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास निघालेल्या दोन आरोपांना दादर स्थानकातून अटक केल्यानंतर आता पुन्हा धक्कादायक बातमी समोर येत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस दि. ९ ऑगस्ट रोजी दादर स्थानकात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कारण या एक्सप्रेसच्या शौचालयात एका प्रवाशाचा मृतदेह आढळला. या प्रवाशाने आत्यहत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून ही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
मुंबई महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई सुरु आहे. त्यातच रस्ते, पदपथावरील फेरीवाल्यांचे बस्तान हटवल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने दिल्लीतील कॅनॉट प्लेसप्रमाणे 'भूमिगत पालिका बाजारा'ची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन पारंपरिक नोकरीची वाट न धरता, संगीतासाठीच आपले अवघे जीवन समर्पित करणार्या संगीतकार समीर सप्तीसकर यांच्याविषयी...
'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' या मध्य रेल्वेच्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत आता दादर रेल्वेस्थानकाबाहेरील 'दादर दरबार' हे उपहारगृह रेल्वे प्रवाशांना उत्तम जेवणाचा आनंद देण्यासाठी सज्ज झाले आहे. मध्य रेल्वेने जुन्या रेल्वे डब्यांना उपहारगृहामध्ये रूपांतर करण्याची ही संकल्पना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. याच पार्श्वभूमीवर बँड वॅगनमध्ये सामील होणारे नवीनतम रेस्टॉरंट ऑन व्हील्स हे "दादर दरबार" आहे जे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर उघडण्यात आले आहे.
मुंबईनगरीत जन्मलेले, समाजघटकांसाठी काम करण्याच्या दृष्टीने उचललेलं पाऊल पर्यावरण शिक्षणाकडे वळलं. असं कोणतं वळण त्यांना या ठिकाणी घेऊन आलं? ‘सृष्टीज्ञान’चे संस्थापक प्रशांत शिंदे यांच्या प्रवासाविषयी...
मध्य रेल्वेवर घेण्यात आलेला जम्बो मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रंचड हाल होताना दिसून येत आहे. जम्बो मेगाब्लॉकमुळे बेस्ट बसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून प्रवाशांना पर्यायी मार्ग म्हणून ज्यादा बस सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, बेस्ट बस फेऱ्या वाढविल्या असल्या तरी सीएसएमटी स्थानकातून एकही लोकल सुटलेली नसल्याचे पाहायला मिळाले.
"विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे", अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २८ मे रोजी दिली.
हुप्रतीक्षित भूमिगत मुंबई मेट्रो ३ ने मंगळवार, दि.७ रोजी दुपारी मुंबईत प्रवेश केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो 3) मार्गावर दादरपर्यंत ही ट्रेनची चाचणी घेण्यात आली. इतर सर्व बांधकामाधीन कॉरिडॉर उपनगरात आणि मुंबई महानगर प्रदेशात इतरत्र आहेत. मात्र, मेट्रो ३ हा एकमेव कॉरिडॉर आहे जो दक्षिण मुंबईतील प्रवाशांची पूर्तता करेल.
छंद असलेल्या क्षेत्रातच करिअर करायचे, हा मनाशी ठाम निश्चय करून, नव्याने शिकलेल्या उर्दू भाषेवर गझल लिहिण्यापर्यंत प्रभुत्व मिळवणार्या गझलकार गौरव चव्हाण यांच्याविषयी...
गेल्या अनेक वर्षांपासून माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर (Yashwant Natyagruha) बंद होते. मात्र, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीनंतर अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमने पुढाकार घेत यशवंत नाट्य मंदिराची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला. गेले दोन महिने या वास्तुचे काम सुरु होते (Yashwant Natyagruha) आता ते पुर्ण होत आले असून शक्यतो १ मे २०२४ महाराष्ट्र दिनी यशवंत नाट्य मंदिर रसिक प्रेक्षकांसाठी खुले होणार असल्याची माहिती अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्
हिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने देखील काही दिवसांपुर्वी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘द बिग फिश एन्ड कंपनी’ हे हॉटेल खवय़्यांसाठी सुरु केले. पण मुळात स्वत: श्रेया (Shreya Bugade) किती चांगला स्वयंपाक करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येऊच शक
बाळासाहेबांचा पहिला शिवसैनिक अशी ज्यांची ओळख होती, ते म्हणजे मनोहर जोशी. शिवसेना पक्ष कायम आपल्या आक्रमक राजकारणासाठी ओळखला जायचा पण अशा आक्रमक पक्षाला मनोहर जोशींनी कधी-कधी शांततेत सुद्धा क्रांती होऊ शकते, हे शिकवलं होतं. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे २३ फ्रेब्रुवारी ला पहाटे निधन झाले. मनोहर जोशी ८६ वर्षांचे होते. आपल्या राजकिय कारकिर्दीमध्ये त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान मिळव
विभा गाइडन्स हब व पल्लवी एंटरप्राईजेस प्रस्तुत दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी दादर (पश्चिम), मुंबई मधील अमर हिंद मंडळ हॉल मध्ये पारंपारिक उत्पादन शो चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विभा गाइडन्स हब च्या फाऊंडर विभा परब यांनी मानवी सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण व तसेच छोटे उद्योजक यांची आर्थिक आणि मानसिक उन्नती व्हावी हे ध्येय बाळगून हा शो आयोजित केला आहे. ५० पेक्षा जास्त व्यवस्थापन कर्मचारी असणारी हि संस्था व्यावसायिकांच्या उन्नती व वाढीसाठी काम करत असते.
‘डिंपल पब्लिकेशन’ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. त्यानिमित्ताने ‘डिंपल’चे सर्वेसर्वा अशोक मुळे यांचा जीवनप्रवास...
ना. म. जोशी विद्या संकुल आणि दामोदर हॉल या दोन्ही वस्तूंचे नूतनीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर सुरुवातीला नाट्यगृह पाडण्यात आले. परंतु, नवी वस्तू केव्हा व कुठे उभारणार याविषयी निर्णयात पारदर्शकता नसल्याने कलाकारांनी आणि रसिकांनी आंदोलन पुकारले. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांनीही या आंदोलनाला बळ दिल्यानंतर ही चळवळ तीव्र झाली, परंतु त्यामागची कारणे, इतिहास आणि गिरणी कामगारांची नाट्य चळवळ समजून घेण्याचा प्रयत्न या लेखातून घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानविषयक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विचारांचे चिंतन आणि मनन आवर्जून केले जाते. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सैनिकीकरणासंबंधी विचार क्वचितच केंद्रस्थानी आलेले दिसतात. तेव्हा, आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या झुंजार नेतृत्वाने सैन्यासंबंधी मांडलेली भूमिका विशद करणारा हा लेख...
शोषित-वंचित समाजाला खर्या अर्थाने मानवी हक्क आणि मूलभूत मानवी मूल्यांचा अधिकार मिळवून देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांचे ऋण समाज, देश कधीच फेडू शकणार नाही. महामानवाच्या विचारकार्याचा इथे सारांश संदर्भ मांडला आहे.
नृत्यदर्पण अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स आयोजित शास्त्रीय नृत्य उत्सव ‘स्फूर्ती‘ नवोदित कलाकारांसाठी एक हक्काचा रंगमंच म्हणून ओळखला जातो. दि. २ डिसेम्बर रोजी दादर पश्चिम येथील सावरकर स्मारकात संध्याकाळी ६ वाजता संपन्न झाला. या उत्सवादरम्यान एकाच रंगमंचावर विविध शास्त्रीय नृत्यांचं सादरीकरण आणि गीतरामायण ही नृत्य नाटिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कवितेवर आधारित नृत्य सादरीकरण कलाकारांनी केले.
कलाक्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारे, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले अवलिया शिरीष पवार यांच्याविषयी...
उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) विभागातील प्रयागराज स्थानकावरील प्रमुख अपग्रेडेशन यार्ड कामांमुळे मध्य रेल्वे मार्गावरील सहा विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या असून सात गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
ज्या लोकांनी धर्मांतर केले आहे, त्यासोबतच ज्यांनी आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती सोडली आहे. त्यांना अनुसूचित जनजातीच्या आरक्षणाचा लाभ घेण्याचा कोणताच अधिकार नाही, असे प्रतिपादन लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांनी केले. रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी जनजाती सुरक्षा मंच कोकण प्रांत तर्फे मुंबईत ’ज्वाला डी लिस्टिंग महारॅली’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मी १९६४ मध्ये ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्था’ मोतीबाग येथे सहा महिने नोकरी केली. त्यावेळी येथे बापूराव दात्ये हे व्यवस्थापक होते. ते पुस्तक विक्रीचे काम संपल्यावर संघाच्या घोषाच्या रचनांचा अभ्यास करीत असत व रचना बसवित असत. त्यांनी घोषाच्या सर्व रचना भारतीय संगीत रचनेत बसविल्या. त्यांच्या ’गायनी कला’ या पुस्तकात शासनातर्फे पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या घोषाच्या भारतीय संगीत रचना लष्कराच्या घोषात बँडमध्ये बसवल्या गेल्या. दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बापूराव दात्येंच्या भारतीय रचना बँड वर वाजवण्य
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमीत्त दरवर्षी सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून कलोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीचा उदघाटन सोहळा दि. ८ नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथील कलांगणात संपन्न झाला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, पु ल देशपांडे कला अकादमीच्या प्रकल्प समन्वयक मीनल जोगळेकर आणि अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य शैलेश चव्हाण सुद्धा उपस्थित होते.
सण-उत्सवांचा राजा अशी ओळख असलेला दिव्याचा सण दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असून सर्वच बाजारापेठा ग्राहकांनी गजबजू लागल्या आहेत. व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या सवलतींच्या घोषणा करत ग्राहकांना आकर्षित करण्यावर भर दिला असून बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे कै. मधुकर आठल्ये, कै. मनमोहन आठल्ये आणि कै. एस. एम. गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘युवा महोत्सव’आयोजित केला आहे. यात प्राजक्ता काकतकर आणि शिवानी मिरजकर यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात सादर करण्यात येणार आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे 'अध्यात्मरंग महोत्सव' आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. या वर्षी या महोत्सवात 'आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली २ व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांनी या दोन्ही व्याख्यानांना उत्तम प्रतिसाद दिला.
प्रभादेवी, दादर रेल्वे स्थानक परिसरातील मीनाताई ठाकरे फुल मंडई परिसरामध्ये अनेक व्यापारी, व्यावसायिक रस्त्यावरच कचरा टाकतात, यास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खात्याने याठिकाणी कायमस्वरूपी एक कचरा संकलन व वाहतूक करणारे वाहन (कॉम्पॅक्टर) तैनात केले आहे. तसेच दिनांक ४ ऑक्टोबर रोजी मंडईतील व्यापारी, व्यावसायिकांची बैठक घेत स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई' संदर्भात जनजागृती केली.
राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक कोकणात गेले. कोकणात जाणाऱ्यांची पसंती कायमच कोकण रेल्वेला राहिली आहे. कोकणातील नियमित धावणाऱ्या ट्रेन्सची तिकिटे चार महिन्या अगोदरच आरक्षण खिडकी उघडताच काही मिनिटांमध्ये फुल झाल्यामुळे इतर प्रवाशांना गणेशोत्सवात कोकण रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांची तिकिटे मिळविण्याची चुरस लागली होती. यातच रत्नागिरी ते दादर पॅसेंजरला चाकरमान्यांची अधिक पसंती मिळाल्याचे दिसते आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे 'अध्यात्मरंग महोत्सव' आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. या वर्षी हा महोत्सव ७ ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत 'आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे.