वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली.
Read More
पुणे शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. शहरातील कात्रज, धायरी, आंबेगाव आणि सिंहगड काही भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कपात सोमवार दि. ५ मे पासून करण्यात येणार आहे.
( holi ) होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा मुंबई पालिकेने दिला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रसज्ज सेना उभारून, ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र यांची १२८वी जयंती दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी भारत देश साजरा करतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली नवी दिल्ली येथे आदरांजली अर्पण केली. बोस यांच्या शौर्याचे स्मरण करत मोदी म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अतुलनीय होती. बोस म्हणजे जिद्द आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचं कार्य आज सुद्धा दीपस्तंभा आम्हाला प्रेरित करत अस
नागपूर : महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) विधेयकाला मुख्यमंत्री ( CM ) देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला होता. परंतू, आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी या विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केल्याने हे विधेयक तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आज फेडरल रिझर्व्ह ओपन मार्केट कमिटीची बैठक संपणार आहे या दोन दिवसीय बैठकीत अमेरिकन बाजारातील व्याजदरात कपात होईल का ? याचा अंदाज मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. व्याजदरात वाढ का कपात या एका घटनेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील तसेच व्याजदरात कपात होण्याची शक्यता का नसेल त्याबद्दल केलेले हे छोटेखानी विश्लेषण .....
फेडरल रिझर्व्ह चेअरमन जेरोम पॉवेल यांनी शनिवारी फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात करण्याचे ठरवले असले तरी आता ते शक्य होणार नाही असे प्रतिपादन जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेतील प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. 'जोपर्यंत तसे संकेत मिळत नाहीत तो पर्यंत दर कपात होणार नाही. 'अजून महागाईत वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले नसल्याने जैसे थे परिस्थिती आहे. ' असे कार्यक्रमात बोलताना निक्षून सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अंतर्गत राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा यंदाचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.
आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी केंद्र सरकारने गॅसचा सबसिडी किंमतीत अधिक २०० रूपयांनी घट केली आहे. एकप्रकारे घरगुती विनिमयासाठी हे एकप्रकारे सर्वसामान्य माणूस आणि गृहिणी यांना दिलासा मिळणार आहे. सबसिडीसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना हा फायदा मिळणार असून यामुळे देशात गॅस किंमती आटोक्यात येणार आहे. नुकतीच ५० रूपयांनी एलपीजी गॅसची किंमत वाढली होती
आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात जगभरात सर्वत्रच कामगार कपात होताना दिसून येते. याउलट भारत हा देश तरुणाईला काम देणारा देश, अशी नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण करत आहे. हे नेमके कसे साध्य झाले, ते समजून घ्यायला हवे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वन क्षेत्रात सुरू असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी रावेर वन विभागाने कारवाई केली आहे. कुसुंबा, लोहारा आणि गारबर्डी या भागात आरोपींनी अवैध वृक्ष तोड केल्याचे समोर आले होते. निर्गुळी, रायमोनिया अशी झुडपे शेतीच्या उद्देशाने साफ करण्यात आली होती. या मुळे वन क्षेत्रातील झाडांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. या क्षेत्रावर कोणतेही अतिक्रमण अद्याप उभे राहिलेले नाही. परंतु, या पुढे वृक्षतोड होऊ नये या साठी खबरदारी म्हणून वन विभागाकडून वृक्षतोडीच्या ठिकाणी जेसीबी मशिनच्या सहाय्याने सलग सम
देशातील वाढत्या महागाईवर उतारा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरांत वाढच केली आहे. सलग तिसऱ्या तिमाहीतही रिझर्व्ह बँकेकडून आपल्या धोरणात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही
पेट्रोल-डिझेलवरील करकपातीबाबत चर्चासुद्धा नाही!
मुंबईला नुकताच संयुक्त राष्ट्र संघाकडून 'जागतिक वृक्षनगरी'चा बहुमान मिळाला असला तरी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षसंवर्धन आणि संरक्षण धोरणांवर मात्र स्थानिक वृक्षप्रेमींनी टीकेची झोड उठवली आहे.
कुलाबा परिसरात नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी खाजगी कंपनीच्या 'सीएसआर'अंतर्गत एकूण २४ हजार झाडांचे वृक्षारोपन केले होते. मात्र, आता बागेचे सुशोभिकरण आणि संरक्षणाच्या कामाच्या नावाखाली पालिकेकडून बागेमध्ये लावलेली झाडे कापण्याचा प्रकार होत आहे. नगरसेविका नार्वेकरांनी याबाबत पालिकेकडे तक्रार दाखल केली आहे.
शेतकरी खतांसाठी दुकानांचे उंबरठे झिजवताना त्याला खते मिळणे जिकिरीचे झाले आहे. या सगळ्याला कारणीभूत तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते, मंत्री, मुख्यमंत्री यांना मिळणारा ‘कट मनी’ असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. इंधन, वीज, खतांच्या किंमतवाढीतून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आबादीआबाद होत असताना पश्चिम बंगालमधील शेतकरी मात्र बरबाद होत आहे.
राज्याच्या वनखात्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीत अवैध वृक्षतोडीची धक्कादायक आकडेवारी पुढे
वानरांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. तालुक्यातील वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम भागात ही तोड केली जात आहे. यामध्ये कडुलिंब, जांभूळ, करंज, निलगिरी, आंबा, वड, पिंपळ, उंबर, काटेसावर अशी देशी झाडे कापण्यात आली आहेत.
अंधेरी आणि धारावीतील काही भागात ५ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार
थकबाकीमुळे शेतकर्यांच्या कृषिपंपांसह राज्यभरातील ग्राहकांची वीजतोडणी करण्याच्या आपल्या निर्णयाला राज्य सरकारने अखेर स्थगिती दिली. वीजतोडणीच्या निर्णयाविरोधात विरोधक आक्रमक होताच, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे.
वीजपुरवठा पुन्हा सुरळीत कधीही न थांबणारी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख मिळवलेल्या मुंबई शहराने सोमवारच्या लगबगीच्या दिवशीच काहीसा ब्रेक घेतला. कधीही न झोपणारे शहर, मुंबईकरांच्या पोटापाण्यासाठी सतत धावणारे हे शहर विजकंपन्यांच्या फिडरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाले.
विजपुरवठा खंडीत झाल्याने आधीच हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यावर या वीज नसल्याने प्रभाव पडला आहे. मुंबई उपनगरातील अनेक पट्ट्यांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. सकाळी वीज बंद झाल्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. जोपर्यंत पूर्णपणे वीजपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत पाण्याची समस्या कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने उद्या दुपारपर्यंत मुदत दिली आहे. मंगळवारी दुपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात २०% कपात
उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्के कपात
लाॅकडाऊनंतरच अवैध बांधकामावर कारवाई
फेरीवाल्यांवर कारवाई केली नसल्याने एक दिवसाचा पगार कट
कारशेडमधील पुनर्रोपित होणारी ४६१ झाडे जैसे थे
भारताशी व्यापारी व आर्थिक संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. आधीच कर्जबाजारी असणाऱ्या इमरान खान सरकारने आता कॉस्ट कटिंग करत सरकारी अधिकाऱ्यांना उपाशी ठेवणारी अजब नियमावली बनवली आहे.
ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे, ज्यांनी 'कट मनी' घेतला आहे, त्यांनी तो परत करावा, असे वक्तव्य केले, ते पाहता त्यांच्या 'आशीर्वादा'नेच हे सर्व चालले होते, असे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये आपलेच शासन असल्याने आपणास कोण विचारतो, अशा गुर्मीत त्या होत्या. पण भाजपने त्या राज्यात जोरदार मुसंडी मारल्याने ममता सरकारची एकेक कृष्णकृत्ये बाहेर येऊ लागली आहेत. 'कट मनी' हे त्यातील एक म्हणावे लागेल!
पश्चिम बंगालचा गड भाजपच्या तोफेने दणाणल्यानंतर ममतादीदी सैरभैर झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भयेने ग्रासल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जनतेचा लुटलेला पैसा परत देण्याची सुबुद्धी त्यांना सुचली.
पाणी कपात न करण्याचा निर्णय
निसर्गाच्या सुंदर दृश्यांना आपल्या जादूई हाताने लहान लहान आकारात त्यांच्या चित्रकृती साकारणार्या ‘टायनी क्वीन’ महालक्ष्मी यांच्या अनोख्या कलेचा प्रवास पाहूया...
११ दिवसांत पेट्रोल २.७५ रुपयांनी घटले
दुष्काळजन्य परिस्थितीतच सध्या आणखी भर पडली आहे ती म्हणजे भारनियमनाची. ऐन सणासुदीच्या काळात राज्यात भारनियमनाचे संकट आले आहे. याचा परिणाम सामान्यांवर तर होणारच आहे. त्यातच याची झळ शेतकर्यांनाही बसणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यापैकी ११६ झाडे वाचवण्यात पर्यावरणप्रेमींना यश मिळाले आहे.
वंचितांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांचं भविष्यात आनंदाचे क्षण फुलविले पाहिजेत म्हणून आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत हा निश्चय घेऊन पुढे 'शांतीवन'च्या कार्याची सुरुवात केली.
दरकपात अर्थसंकल्पापूर्वी होत असल्याचे यावर सर्वांचे लक्ष लागून होते.