China भारताचा शेजारी देश असलेल्या चीनची कोरोनानंतरही आर्थिक स्थिती सुधारलेली नाहीच. त्यामागचे एक कारण म्हणजे चिनी उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तींनी या देशातून बाहेर पडण्याचा लावलेला धडाका. कारण, जिनपिंग यांचे सरकार चीनमधील उद्योगपती आणि श्रीमंतांवर सातत्याने आपल्या वर्चस्वाचा फास अधिकाधिक घट्ट करू पाहत आहे. हे सरकारी संकट टाळण्यासाठीच चीनमधील श्रीमंत उद्योजक सिंगापूरकडे धाव घेताना दिसतात. चीनमधील अनेक बड्या उद्योगपतींनी तर अलीकडेच आपली मालमत्ता सिंगापूरच्या बँकांमध्ये हस्तांतरित केली. हा सर्व प्रकार समोर आल
Read More