फारुख अब्दुल्ला आणि त्यांच्या साथीदारांच्या हातातील सत्ता गेल्याने ते सर्व अस्वस्थ झाले आहेत आणि त्या अस्वस्थतेतून ‘गुपकर डिक्लरेशन’ प्रसृत केली जात आहेत, हा या सर्व घटनांचा अर्थ. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारतापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, हे या फारुख अब्दुल्ला यांच्यासारख्या, देशाशी गद्दारी करण्याच्या भूमिकेत असणार्या नेत्यांना कोणी तरी समजावून सांगायला हवे!
Read More