( Navi Mumbai Airport connectivity ) ‘सिडको’ आणि ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ (एनएचएआय) यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पश्चिमेकडून जाण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे (वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंज) काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदलामुळे आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
Read More
( Metro 3 & mumbai BEST connectivity ) मुंबई मेट्रो-३ कुलाबा-बीकेसी-आरेच्या दुसऱ्या टप्प्याची सेवा लवकरच सुरू होणार असून, या मार्गाला अंतिम टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट(बेस्ट)ने ३२ बस मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
Independent authority in Mumbai for Last Mile Connectivity “मुंबईत नागरिकांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे,” असे स्पष्ट करत “यासाठी ‘एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण’ (युनिफाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी) स्थापन करावे,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबईत नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनि फाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.या प्राधिकरणाच्या कायद्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी (UMTA) बिल, २०२५'च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यानिमित्ताने जम्मू-काश्मीरला वेगवान वाहतूक, सार्वकालिक कनेक्टिव्हिटी, सीमा सुरक्षा आणि पर्यटनाला चालना देणार्या महामार्ग, बोगदेनिर्मितीच्या विकासकामांचा आढावा घेणारा हा लेख...
आजपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या तीन दिवसीय श्रीलंका दौरा करणार आहेत असे अर्थमंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तामिळनाडू मूळ असलेल्या तमिळ भाषिक लोकांनी श्रीलंकेत २०० वर्षांपूर्वी स्थलांतर केले होते. या घटनेला २०० वर्ष झाल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सितारामन कोलंबो येथील श्रीलंका येथे आज उपस्थितांना भाषण करून संबोधित करतील.
भारत मालदीवमध्ये अनेक प्रकल्प विकसित करत आहे. ज्यामध्ये ‘ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी’ प्रकल्प आणि ‘हनीमधु’ आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्रमुख आहेत. सत्तेवर आल्यापासून म्हणजे २०१८ सालापासून राष्ट्रपती सोलिह यांनी ’इंडिया फर्स्ट’ मिशनच्या अनुषंगाने देशाच्या परराष्ट्र धोरणात भारताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तथापि, ते चीनशी काळजीपूर्वक संतुलित संबंध राखत आहेत.
कोणत्याही देशाच्या विकासासाठी पायाभूत सोईसुविधांची निर्मिती ही महत्त्वाची. म्हणूनच भारताच्या आर्थिक परिवर्तनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गतिशक्ती’च्या माध्यमातून एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याअंतर्गत विविध मंत्रालयांना एकत्र आणण्यात आले. एका वर्षांत पाच लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक प्रकल्पांचे मूल्यमापन या अंतर्गत नोंद झाले आहे.
तंत्रसाक्षरतेवरुन देशाला हिणवणारे पी. चिदंबरम यांच्यासारखे तत्कालीन अर्थमंत्री देशवासीयांनी पाहिलेच. पण, त्याच भारतीयांवर विश्वास दाखवला तो नरेंद्र मोदी सरकारने. आजघडीला भाजी विकणारी आजीसुद्धा ‘युपीआय’वरुन रक्कम स्वीकारते, तेव्हा स्वतःला अर्थतज्ज्ञ आणि सुजाण राजकारणी म्हणून घेणारे निव्वळ शोभीवंत मनोर्यातूनच गोरगरीब भारतीयांकडे पाहत होते, हे स्पष्ट होते.
भारतात संगणक क्रांतीनंतर, मोबाईलच्या वापरात वाढ झाल्यानंतर व ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळाले. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करणार्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक उद्योगात समाविष्ट होतात. विसाव्या शतकात अस्तित्वात आलेला हा उद्योग जागतिक पातळीवर मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. या उद्योगाचा एक तोटा म्हणजे, हा उद्योग पर्यावरणाची हानी करणारा इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण करतो. या कचर्याची विल्हेवाट कशी लावायची, यावर जगभर विचारविन