Strait of Hormuz : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर चवताळलेल्या इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या दहा शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला आहे. यानंतर इराण कच्चे तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता इराणच्या कायदेमंडळाने होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदी निर्णयाला मान्यत
Read More
(Iran on Trump Munir meet) इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना आता इराणने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. "इराण-इस्त्रायल संघर्ष आहे. या संघर्षात तिसऱ्या पक्षाने येऊ नये. जर तिसरा देश सहभागी झाल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील", असे नवी दिल्लीतील इराणच्या उच्चायुक्त कार्यालयातील उप मिशन प्रमुख जावेद हुसैनी यांनी म्हटले आहे.
(PM Narendra Modi) कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये ३५ मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर जी-७ शिखर परिषदेच्या वेळी त्यांची भेट होणार होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत लवकर परतल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोघांमध्ये फोनवरुन ही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल ट्रम्प यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र सचि
(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. एअर
Burkina Faso West African country that has been experiencing instability in recent years due to terrorist attacks, non-state armed groups, ethnic conflicts बुर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील देश, जो गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी हल्ले, गैरसरकारी सशस्त्र गट आणि जातीय संघर्षांमुळे अस्थिरता अनुभवतोय.
(India-Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी युद्धविराम देण्यात आला. यानंतर रविवार, दि. ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत विस्तृत
(Govt allows civil flights to operate as 32 shut airports reopen) भारत- पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील ३२ विमानतळे १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युद्धविरामानंतर आता ही बंदी आता उठवली असून लवकरच विमानतळे नियमित नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
(India - Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हा तणाव दिवसागणीक वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी कराराला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी पुन्हा 'जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल', अशी पोकळ धमकी दिली आहे.
(Ban On Pakistani Ships) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करणे, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना हद्दपारीचे आदेश देणे, याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि एक्स हँडल्सवर बंदी घालण्याची कारवाई सुरू केली. अशात पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आय
(Pakistan Installed Sirens In 29 Districts Of Khyber Pakhtunkhwa) युद्धाच्या भीतीने भेदरलेल्या पाकिस्तानात नागरिकांना सावध करण्यासाठी भोंगे बसवण्यात आल्याची माहिती आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी मंत्र्यांकडून सातत्याने 'भारत कधीही हल्ला करू शकतो' अश्या आशयाची विधानं केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेपासून (LoC) अनेक किलोमीटर दूर असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील २९ जिल्ह्यांमध्ये सायरन प्रणाल
(Shashi Tharoor admits) गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War)सुरु आहे. या युद्धात प्रचंड विध्वंस झाला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अद्याप या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा या युद्धाला तोंड फुटले होते, तेव्हा काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. मात्र आता थरूर यांनी रशिया आणि
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात सध्या नवे वादळ उठले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सूचित केले की, “जर सौदी अरेबियामध्ये पुरेशी जमीन आहे, तर तिथे पॅलेस्टिनी राष्ट्र का स्थापित होऊ शकत नाही?” त्यांच्या या वक्तव्यानेच मुस्लीम देशांमध्ये खळबळ उडाली. सौदी अरेबियाने इस्रायलशी संबंध सुधारण्याची शक्यता फेटाळून लावत सांगितले की, जोपर्यंत पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळत नाही, तोपर्यंत इस्रायलशी सौहार्दपूर्ण संबंध शक्य नाहीत. युएई आणि इस्लामिक सहकार्य संघटना अर्थात ‘ओआयसी’ यांनीही सौद
इस्रायल-‘हमास’ रक्तरंजित संघर्षाला युद्धविराम लाभला आहे. १५ महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर हा युद्धविराम प्रत्यक्षात आला. मध्य-पूर्वेतील ( Middle East ) शांतता ही संपूर्ण जगाच्या हिताची असली, तरी भारतासाठी ती विशेष महत्त्वाची आहे. भारताचा ऊर्जापुरवठा हा तेथूनच होतो.
इराण-इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावानंतर जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ होणार असून इराणच्या हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तेल विपणन, पेंट्स, एव्हिएशन आणि टायर यासारख्या प्रमुख तेल संबंधित क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली.
इस्रायलवर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा निषेध करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल इस्रायलने नुकतीच संयुक्त राष्ट्राचे प्रमुख, सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना इस्रायलमध्ये प्रवेशासाठी चक्क बंदी घोषित केली आहे. याबाबत बोलताना इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी जाहीर केले की, “इस्रायलने संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना ‘नॉन ग्राटा व्यक्ती’ घोषित केले असून, त्यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.”
आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली होती की, इस्रायल आणि ‘हिजबुल्ला’मधील युद्ध अनेक महिने चालेल आणि इस्रायलला त्याची जबरदस्त किंमत चुकवावी लागेल. पण, इस्रायलने आपल्या वेगवान कारवायांनी ‘हिजबुल्ला’चे कंबरडे मोडून ठेवले आहे. ‘हिजबुल्ला’चा संपूर्ण पराभव करणे शक्य नसले, तरी लष्करीदृष्ट्या त्याला दहा वर्ष पाठी नेण्यात इस्रायलला यश आले आहे.
इस्लामिक दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचे पेजर फोडल्यानंतर इस्रायलने आता थेट हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या स्थानांना लक्ष्य केले असून त्यांची शस्त्रे नष्ट केली आहेत.
इस्रायल-हमासमधील युद्धसंघर्ष अद्यापही शांत झालेला नाही. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हमासचा खात्मा केल्यानंतरच युद्ध थांबेल, असे म्हटले. मागील वर्षी 7 ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धात, अनेक देशांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी पाकिस्तानच्या तीन दिवसीय दौर्यावर इस्लामाबादला पोहोचले. या वर्षाच्या सुरूवातीलाच, दोन्ही देशांनी एकमेकांच्या भूमीवर ‘एअर स्ट्राईक’ केले होते. या दोन मुस्लीमबहुल देशांमध्ये युद्धाचा भडका उडतो की काय, अशी परिस्थिती काही काळासाठी निर्माण झाली होती. पण, दोन्ही देशातील तणाव निवळला. आता इराण-इस्रायल संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना इब्राहिम रईसींच्या पाकिस्तान दौर्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेे होते.
इस्रायलला युद्धाच्या रणांगणात उतरून, सहा महिने झाले. दि. 7 ऑक्टोबर रोजी ’हमास’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून आक्रमण केले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या आक्रमणात जवळपास इस्रायलच्या 1 हजार, 200 नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर पुढची 50 वर्षे गाझाला लक्षात राहील, अशी अद्दल घडवण्याच्या इर्शेने इस्रायलने देखील आक्रमण केले. इस्रायलच्या या हल्ल्यात आतापर्यंत 33 हजारांच्या आसपास पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. त्यामुळे हा वाढता संघर्ष थांबवण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत उपायाची तातडीची गरज निर्मा
युक्रेनमधील युद्धाला दोन वर्ष नुकतीच पूर्ण झाली असून रशियाचे पारडे पुन्हा एकदा जड होताना दिसते. युरोप आणि अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असला तरी त्यांच्याकडून होणारा शस्त्रास्त्रं आणि आर्थिक पुरवठ्याचा ओघ आटला आहे. त्यातच या वर्षी अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये निवडणुका होणार असून, जर युरोप आणि अमेरिकेत युद्धविरोधी नेते आणि पक्षांचा विजय झाला, तर २०२५ साली लढणार कसे, हा प्रश्न युक्रेनला भेडसावू लागला आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेला इराण-पाकिस्तान संघर्ष अखेर थंड पडला आहे. दोन्ही देशांनी हवाई हल्ल्यानंतर पुन्हा एकदा हवाई वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी आपल्यातील कटुता मिटवून, पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला आहे. नुकतेच इराणचे परराष्ट्र मंत्री डॉ. हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन पाकिस्तान दौर्यावर आले, यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
'इस्रायल-‘हमास’ युद्धात हुती बंडखोरांनी ’हमास’ला समर्थन देत, लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी या हल्ल्याचा प्रतिकार आक्रमक पद्धतीने केला.
दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात नुकतीच तक्रार दाखल केली. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील २२ हजार नागरिक मारले गेले आहेत. हा गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांचा नरसंहार आहे. इस्रायल १९४८ सालच्या नरसंहारविरोधी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत आहे.
जवळपास सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींचे पुनरागमन झाले आहे (human-elephant conflict in sindhudurg). कोल्हापूरात काही काळ व्यस्थित केल्यानंतर हत्तींचा कळप पुन्हा कोकणात उतरला असून फळबागांमध्ये त्यांनी ठाण मांडले आहे. (human-elephant conflict in sindhudurg)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यादरम्यान, एक व्यक्ती फ्री पॅलेस्टाईन या नावाची टी-शर्ट परिधान करून थेट मैदानात विराट कोहलीजवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते.
एकोणाविसाव्या शतकातील दुसर्या दशकात म्हणजेच १९१० नंतरचा काळ साम्राज्यशाहीचा होता. इंग्लंड, जर्मनीसह युरोपातील अनेक वसाहतवाद्यांनी आशियाई, आफ्रिकन देशांमध्ये घुसखोरी करुन आपला साम्राज्यविस्तार केला. त्यातूनच देशादेशांत स्पर्धा आणि तणावही निर्माण झाला.
मध्य-पूर्वेतील येमेनमधील अंतर्गत संघर्ष नेहमीच, या ना त्या कारणाने उफाळून येत असतो. या वादाची सुरुवात २०१४ साली झाली होती, जो अजूनही संपण्याची शक्यता नाही. आता या वादाचे नवे रूप इस्रायल आणि ’हमास’ युद्धामुळे समोर आले आहे.
इस्रायल तसेच तैवान यांनी त्यांच्या देशात भासणार्या मनुष्यबळाच्या समस्येला तोंड देण्यासाठी भारताबरोबर करार केला आहे. तैवानसोबत करार केल्यामुळे चीन अस्वस्थ झाला आहे, तर इस्रायल पॅलेस्टिनींना पर्याय म्हणून भारतीयांना प्राधान्य देत आहे. या दोन्ही देशांनी भारतीय कर्मचार्यांवर दाखवलेला विश्वासच यातून अधोरेखित होतो.
सजीव आणि संघर्ष हे समीकरण तसे सर्वश्रुतच. त्यातही मानवाच्या रक्तातच संघर्षाची बीजे रुजली आहेत की काय; त्यामुळे तो नेहमीच युद्धाच्या पवित्र्यात असतो. त्यातूनच युद्धाची नवनवीन साधने विकसित होत गेली. कधीकाळी जमिनीवर होणारे युद्ध, पाण्यात, त्यानंतर हवेतही होऊ लागले.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात आजही अनेक पॅलेस्टिनी अरबांना इस्रायलसोबत सहअस्तित्त्व मान्य नाही. शांतता प्रस्ताव धुडकावून जेव्हा तुम्ही युद्ध लढता तेव्हा तुम्ही तहातही हरता, हे त्यांना समजले नाही. राष्ट्र उभारणीसाठी स्वतःच्या लोकांची जबाबदारी घ्यायची असते. त्यांच्या हिताचा आणि कल्याणाचा विचार करायचा असतो. प्रसंगी कडू निर्णयही त्यांच्या गळी उतरवायचे असतात.
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट असल्यानेच कॅनडाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत जॉर्डनने मांडलेल्या ठरावात दुरूस्ती सुचवली. तेव्हा, भारताने कॅनडासोबतच्या बिघडलेल्या राजनैतिक संबंधांचा विचार न करता, तिला पाठिंबा दिला. कारण ही दुरूस्ती ‘हमास’च्या दहशतवादी कारवाईविरोधात होती. मानवतावादाचे कारण पुढे करत खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाई न करणारा कॅनडा ‘हमास’विरोधात दुरूस्ती आणतो, तेव्हा तो म्हणूनच दुटप्पीपणा ठरतो.
गाझा पट्टीत मानवतावादी युद्धविरामाची मागणी करणार्या ‘संयुक्त राष्ट्रसंघा’च्या ठरावावर भारताने तटस्थ भूमिका घेतली. तसेच या ठरावात ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला नव्हता. केवळ भारतानेच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान या प्रगत देशांनीही स्वतःला या ठरावापासून दूर का ठेवले आणि त्यामागील जागतिक राजकारण समजून घ्यायला हवे.
इस्रायल आणि गाझा पट्टीतील ‘हमास’ दहशतवादी संघटना यांच्यात सध्या युद्ध चालू आहे. त्याच्या अनेक बातम्या प्रतिदिन येत आहेत आणि या सर्व परिस्थितीत भारताने इस्रायलकडून काय शिकावे, याविषयी केलेले विश्लेषण.
मार्सेली लास्ट या एका सर्वसामान्य ज्यू महिलेचं हे मनोगत आपल्याला इतिहास आणि भविष्य दोन्ही दाखवतं. कल्पना करा की, आपले ऐतिहासिक वीर जेव्हा मोहिमेसाठी बाहेर पडत, तेव्हा यांच्या घरच्यांची मनःस्थिती कशी होत असेल?
रशिया-युक्रेननंतर आता इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यात युद्धाची ठिणगी पडली आहे. इस्रायलला डिवचल्यानंतर नेमके कोणते परिणाम होऊ शकतात, याची पुरेपूर कल्पना असतानाही ‘हमास’ने दहशतवादाचा मार्ग पत्करला आणि आपला संहार स्वतःच्या हातानेओढवून घेतला.
सध्या इस्रायल-‘हमास’मध्ये युद्ध पेटले असून, युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच अमेरिका इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू यांची भेट घेत इस्रायलला शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही दिले.
"भारतीय संस्कृतीने कधीही कुणावर आक्रमणे केली नाहीत उलट ज्या शरणार्थींना आश्रयाची गरज होती त्यांची मदत केली. पारसी, ज्यू किंवा अन्य कुठल्याही समाजाला त्यांच्या देशातून हुसकावण्यात आले त्यांना भारतीय संस्कृतीने आपल्यात सामावून घेतले. हा भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा मोठेपणा आहे. शिवाय आपल्या संतपरंपरेने दुबळ्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना अध्यात्मिक शक्ती देण्याचे काम केले. म्हणूनच आपली संस्कृती हजारो वर्षे टीकू शकली.", असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून ‘हमास’ वापरत असलेली गाझातील भुयारे लक्ष्य केली जात आहेत. गाझाच्या पहिल्या थरावर भूपृष्ठावर सामान्य नागरिक राहतात. त्याच्या खाली दुसरा थर भूमिगत आहे, जो ‘हमास’ वापरतो. सध्या इस्रायली लष्कराच्या गाझामधील जमिनीखालच्या थराला लक्ष्य करत आहे. ही सामान्य लोकांसाठी बांधलेले बंकर किंवा भुयारे नाहीत. ती फक्त ‘हमास’ आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी आहेत, जेणेकरून ते इस्रायली रॉकेटपासून वाचू शकतील व इस्रायलवर हल्ले सुरू ठेवतील.
सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन, इस्रायल-‘हमास’ आणि अझरबैजान-आर्मेनिया हे तीनही संघर्ष मध्य आशिया प्रांताच्या अवतीभवतीच घडत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन आणि अझरबैजान-आर्मेनिया हे संघर्ष तर सोव्हिएतोत्तर देशांमध्येच सुरू आहेत. यामागे सोव्हिएत काळातील सदोष सीमा-आखणी आणि विविध वांशिक-धार्मिक गटांविषयीची चुकीची धोरणे, ही पार्श्वभूमी आहे. तसेच सीमा-वाद आणि भाषिक-वांशिक संघर्ष मध्य आशियातही आहेत. अशाप्रकारे लष्करी बळाच्या जोरावर प्रस्थापित सीमांमध्ये केलेले बदल संपूर्ण युरेशियन प्रांतालाच हादरवून टाकणारे आहेत.
"हजारो वर्षांपासून भारत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत आहे. त्यामुळे इस्रायली नागरिकांची वेदना आपण एक देश म्हणून समजू शकतो. म्हणून केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला पाहिजे"; असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी केले. इस्रायलच्या समर्थनात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून शनिवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ते बोलत होते.
चीन स्वतःच्या घरात उघूर मुस्लिमांवर अत्याचार करतो. मात्र, पॅलेस्टाईन आणि अल अक्सा मशिदीबद्दल चीन मात्र मुसलमानांच्या सोबत. जून महिन्यात यासंदर्भात चीनने तशी भूमिकाही मांडली. चीन आणि उघूर मुसलमान हा मुद्दा तसा वर्षानुवर्षे चर्चेत आहे.
जिथे ‘इस्लाम खतरे मे हैं’ किंवा ‘इस्लाम के शान मे’ असे शब्द आले, तिथे जगभरातले मुस्लीम एकत्र येतात, हा अनुभव आहेच. इस्रायल-पॅलेस्टाईन संदर्भातही तेच. ‘हमास’सारख्या दहशतवाद्यांना कोणता आला आहे धर्म? असे म्हणावे तर ते ‘हमास’चे दहशतवादी ज्या पॅलेस्टाईनचे नाव घेत आले, त्या पॅलेस्टाईनसाठी जगभरातले त्यांचे कौमवाले ‘तेरा मेरा क्या रिश्ता ला इलाहा इल्लल्लाह’ म्हणत त्यांच्या-त्यांच्या देशात आंदोलन करत आहेत.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने डाव साधत इस्रायलवर नृशंस हल्ला चढवला. त्यात हजारांच्या वर निरपराध नागरिक मारले गेले, तर तब्बल २०० जणांना ‘हमास’ने ओलीस ठेवले. ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी निरपराधांवर केलेले अमानुष अत्याचार अवघ्या जगाने बघितले.
जीओपोलिटीकल तणाव असतानाचा प्रभाव आज शेअर बाजारात पण जाणवला आहे. इस्त्रायल हमास युद्धाच्या काळात होत असलेली हानी पाहता यांचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. इंधन, एनर्जी, व्यापारी आयात निर्यात यामध्ये परिणाम होऊन डॉलर रूपया सेंटलमेंट मध्ये देखील त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. आज क्लोजिंग बेलनंतर एनएससी १९ गुणांनी घसरत १९७३१.७५ वर आला आहे. बीएसी सेन्सेक्स इंडेक्स ११६ गुणांनी घटत ६६१६६.९३ वर येऊन ठेपला आहे.
‘हमास’ पूर्णपणे संपेल असे वाटत नाही. दहशतवादी संघटना नवीन नावे धारण करत पुनःपुन्हा निर्माण होत जातात. ‘हमास’ची एक फळी कदाचित यात नष्ट होऊ शकली, तरी पूर्णपणे हा विचार संपवणे शक्य नाही. मात्र, गाझा पट्टीचा नकाशा बदलू शकतो.
इस्रायल-‘हमास’ संघर्षाची ठिणगी पडल्याच्या घटनेला आठवडा पूर्ण झाला. गेल्या आठवड्याभरात इस्रायल आणि गाझा पट्टीतील जीवितहानी आणि वित्तहानी ही तितकीच मन विषण्ण करणारी. त्यामुळे इस्रायल-‘हमास’मधील हा युद्धजन्य संघर्ष पुढे आणखीन किती भीषण रुप धारण करेल, ते पाहावे लागेलच. त्यानिमित्ताने इस्रायल, ज्यूंचा संक्षिप्त इतिहास, पॅॅलेस्टाईनचा प्रश्न, अरब देशांची भूमिका यांसारख्या या विषयाशी निगडित विविध कंगोर्यांचा सविस्तर उहापोह करणारा हा लेख...
लढाईदरम्यान भारताकडे असलेली विविध साधने वापरून चिनी सैन्याबद्दल अचूक गुप्तहेर माहिती जर पुरवता आली, तर त्याचा तैवानला आणि अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्रांना खूप फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने आपले सॅटेलाईट्स, टेहाळणी करणारी विमाने, ड्रोन्स आणि इतर साधनांचा वापर केला जावा.
इस्रायलवर ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर उफाळलेल्या संघर्षात तेलाचे दर कडाडले आहेत. इस्रायलने हे युद्धच असल्याचे जाहीर करत ‘हमास’चा नायनाट करण्यासाठी गाझा पट्टी अक्षरशः नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला आहे. ‘हमास’ला मदत करणार्या इराणपर्यंत या संघर्षाची व्याप्ती वाढली, तर मात्र पुरवठ्याअभावी संपूर्ण जगाला इंधनाची कमतरता जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.
इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरात धिक्कार होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रायलला पाठींबा दर्शविल्याने ठाण्यातील बेने इस्रायली समाज आनंदित झाला आहे.इस्रायल ही आमची पितृभूमी असली तरी,भारत हीच आमची मातृभूमी आहे.इथल्या सारखी संस्कृती जगात कुठेही आढळणार नाही. अशा भावना या समाजाकडुन व्यक्त होत आहेत.