बँकांमधील व्यवहार हे पैशांचे असल्यामुळे त्यात कधीतरी हलगर्जीपणा किंवा एखादी चूकदेखील होऊ शकते. अनेकदा बँकेतच ग्राहकांच्या अशा विविध तक्रारींचे निराकरण केले जाते. पण, जर ग्राहकाला बँकेकडून न्याय मिळाला नाही, तर तक्रार दाखल करण्याची सर्वांत अंतिम पातळी आहे ती म्हणजे ‘बँकिंग लोकपाल’ (जार्लीवीारप) योजना. लोकपालकडे तक्रार करून ग्राहक आपल्या हक्कांचे संरक्षण करू शकतात. त्याविषयी आजच्या लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊया...
Read More
59% of e-challan complaints rejected RTI reveals ‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तब्बल ₹५५६ कोटी ६४ लाख २१ हजार ९५० इतका दंड वसूल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या RTI अर्जावरून ही माहिती समोर आली आहे. सदर कालावधीत एकूण १,८१६१३ ई-चलन विरोधात ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १,०७८५० तक्रारी फेटाळण्यात आल्या आहेत. म्हणजेच, जवळपास ५९% तक्रारी अमान्य ठरल्या.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत दिली.