मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. त्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला.
Read More
( Dharmendra Pradhan ) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी प्राकृत, पाली, मराठी, बंगाली आणि आसामी या पाच नवीन वर्गीकृत अभिजात भाषांच्या अभ्यासकांशी संवाद साधला. यावेळी भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चमू कृष्ण शास्त्री, युजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.
पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. नुकतेच त्यांनी हे युग युद्धाचे नाही तर बुद्धाचे आहे, असे पुन्हा एकदा भाषणात अधोरेखितही केले. गौतम बुद्ध यांचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी वारंवार मांडले आहेत. म्हणूनच, उपेक्षित घटकांना, भाषांना न्याय देणारे हे मोदी सरकार आहे, असे म्हणता येते.
( Marathi language )राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या दोन्ही संस्थांच्या मंडळांची पुनर्रचना १५ ऑक्टोबर रोजी झाली. या दोन संस्था काय काम करतात, त्या का अस्तित्वात आल्या, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या या संस्थांची गरज सद्यस्थितीत काय? नव्याने झालेल्या संस्थांच्या मंडळांचा उद्देश्य आणि काम नेमकं काय असणर आहे याचा आढावा घेऊयात या व्हिडिओतून.
3 ऑक्टोबर रोजी ( Pali Language ) पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानिमित्ताने सिद्धार्थ महाविद्यालयातील पाली भाषेचे प्राध्यापक विजय मोहिते यांची घेतलेली ही मुलाखत
3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. २०१२ पासून यासाठी प्रयत्न सुरू होते पण एका कारणामुळे मराठी भाषेला तो दर्जा मिळत नव्हता. काय आहे ते कारण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये..
3 ऑक्टोबर रोजी 'पाली भाषेला' अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याच विषयावर मुंबई विद्यापीठातील पाली भाषेचे प्राध्यापक लक्ष्मण सोनावणे यांची घेतलेली ही मुलाखत. | Pali Language | Classical Language
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाला. माझी मराठी अमृताशी पैजा जिंके अशीच आहे. आणि याच आनंदाप्रित्यर्थ माय मराठीला ही शब्दांजली!
(Devendra fadnavis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समस्त मराठी जनांना सुखावणारा असून खऱ्या अर्थानं अभिजात साहित्याचा ठेवा ज्यांनी तयार केला, अशा सगळ्यांचं हे श्रेय आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी शुक्रवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद
३ ऑक्टोबर हा दिवस 'मराठी अभिजात भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्य सरकारने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीला उर्जितावस्था येणार नाही. त्यासाठी मराठी माणसाने या भाषेला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनविला पाहिजे. महाराष्ट्रात, अगदी मुंबईतही समोरची व्यक्ती रिक्षावाला आहे, टॅक्सीवाला आहे की इस्त्रीवाला, हे न पाहता त्याच्याशी जेव्हा फक्त मराठीतूनच संवाद साधला जाईल, तेव्हाच मराठी ही सामान्यजनांची भाषा होईल. सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून आता तरी मराठी माणूस सर्वार्थाने मराठीत बोलेल का?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मराठी मने आनंदाने न्हाऊन निघाली. मराठीचे माहेरघर असलेल्या पुण्यात साहित्यपंढरी असलेल्या या पुण्यनगरीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होत आहे. जाहीररित्या तो साजरा होत असताना तो मनामनांत साजरा होत आहे, ते शब्दातीत.