(Baba Siddique Murder Case) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याच्या निर्मल नगर येथील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकीं वर गोळीबार करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र दिवसागणिक या प्रकरणातील नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या हत्येसाठी मारेकऱ्यांकडून तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Read More
पुन्हा मोदी एनडीए सरकार आल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. बँक कर्मचा ऱ्यांच्या डीएची मे, जून, जुलै महिन्यातील रक्कम घोषित झाली आहे. वेतनाच्या १५.९७ टक्के डीए आता बँक कर्मचाऱ्यांना मिळ णार आहे. तसे परिपत्रक (Circular) इंडियन बँकस असोसिएशन (IBA) ने काढलेले आहे. एनडीए प्रणित मोदी सरकार आल्या नंतर मे ते जुलै महिन्यात या तीन महिन्याच्या कालावधीसाठी हा डीए (Dearness Allowance) लागू असणार आहे.
पत्रकार राणा अय्युब यांनी केट्टो या क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे देश सोडून जायची परवानगी नसतानाही त्या बुधवारी (दि. ३० मार्च) लंडनला जाण्याच्या तयारीत असताना मुंबई विमानतळावर त्यांना रोखण्यात आले. लुकआऊट सर्क्युलरच्या आधारे त्यांना ईडीकडून रोखण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
दै.'मुंबई तरुण भारत'चा १५ ऑगस्ट २०२१ रोजी १२वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त 'बदलते माध्यमजगत' या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रसर्वप्रधम ही विचारधारा घेऊन चालणाऱ्या या दैनिकाला आता एक तप पूर्ण झाल्याबद्दल वाचकवर्ग, जाहिरातदार, हितचिंतक, लेखकांनी दै.'मुंबई तरुण भारत'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. विशेषतः 'बदलते माध्यमजगत' या वर्धापन दिनाच्या अंकात प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरुप आणि पुढील आव्हाने, नवमाध्यमे यांचा लेखाजोखा आढळतो.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनी शासकीय कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे 'आत्मनिर्भर भारत' या घोषणेचा प्रसार करण्यात यावा, असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे.
पाच महिन्यात २३ परिपत्रकांचा भडिमार!
सोशल मीडियावर व्हायरल निर्णयाचा महाराष्ट्राशी सूतराम संबंध नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारने दिले आहे.
कमीत कमी रंग, सोप्यात सोपे आकार यांच्यासह भावविभोर चेहरे म्हणजे ज्ञानेश्वरांची पेंटिंग्ज होय. या चतुरंगांची सर्क्युलर गॅलरीतील रंगजत्रा दि. ६ ते १२ ऑगस्ट पर्यंत अनुभवता येईल.