: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर
Read More
वक्फ कायद्याविरोधात नव्याने याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी याबद्दल झालेल्या सुनावणीत वक्फ सुधारणा कायद्याविरुद्धात कॉपी-पेस्ट याचिका नको, अशा शब्दांत कानउघडणी केली आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला आव्हान देणारी कोणतीही नवीन रीट याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
‘नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला की, तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. उद्धव ठाकरे ते कधी करणार आहेत, देव जाणो! भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्याचे गाजर काय दाखवले, ते इतके हवेत गेले की, विचारायची सोय नाही. विधिमंडळाचे कामकाज आपल्याइतके कोणालाच समजत नाही, याच अविर्भावात ते वावरताना दिसतात. कालचीच गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी गोवंडी ‘आयटीआय’च्या नामांतर सोहळ्यात केलेल्या भाषणाची चर्चा विधानसभेत झाली. त्यांच्या भाषणाविषय
दिल्ली : राजधानी दिल्लीमधील ( Delhi ) तालकटोरा स्टेडियम येथे दि. २१ फेब्रुवारी ते दि. २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार्या ‘98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ परिसरास ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी’ नाव देण्याचे ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’ने, तसेच ‘सरहद’ या आयोजक संस्थेने ठरविले आहे.
sambhal violence : उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराने सर्वांनाच हैराण करून सोडलंय. अशातच आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला एका पत्राद्वारे चेतावणी दिल्याचे पाहायला मिळतंय. नेमकं प्रकरण काय? पाहा संपूर्ण व्हिडिओ... #jamamasjid #sambhal #sambhalviolence #uttarpradesh #vishnushankarjain #jamamosque #AllIndiaMuslimPersonalBoardLaw #asisurvey #news #mahamtb
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि मराठी विश्वकोश ( Marathi Encyclopedia ) मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्याशी साधलेला हा संवाद
महाविकास आघाडीचे नेते सत्तांध झाले आहेत. मविआ औरंग्याच्या मार्गावर चालणार, हे स्पष्ट होत आहे, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. ऑल इंडिया उलेमा बोर्डने महाविकास आघाडीकडे केलेल्या मागण्या काँग्रेसने मान्य केल्या. यावरून चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका केली.
‘ऑल इंडिया उलेमा बोर्ड’ने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना नुकतेच १७ मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर सत्तेत आल्यावर या मागण्या पूर्ण करू, असे लेखी पत्र नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या लेटरहेडवर ‘उलेमा बोर्डा’ला दिले, तर महाविकास आघाडी जिंकण्यासाठी आम्ही काम करू, असे ‘उलेमा बोर्डा’ने म्हटले. महाविकास आघाडी सत्तेत आली तर काय होईल, त्याचे हे फक्त छोटेसे ‘ट्रेलर!’ ‘उलेमा बोर्डा’च्या या निवेदन पत्राच्या निमित्ताने हिंदूंच्या डोळ्यांत अंजन घालणारा हा लेख...
दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दि. २१ दि. २२ आणि दि. २३फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीत हे संमेलन होणार आहे.
"मी २५ देशांत जाऊन आले पण त्या देशांतील त्यांच्या सगळ्या संस्कृती मृत बनल्या आहेत. त्यांना त्यांच्या संस्कृतीविषयी अजिबात जिव्हाळा उरलेला नाही. याउलट आपल्याकडे इतकी आक्रमणं झालेली असतानाही आपण आपल्या संस्कृतीला घट्ट चिकटून आहोत आणि ती संस्कृती आपण जिवंत ठेवली आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी त्याग केला असून तो जिवंत ठेवण्यासाठी मी हा यज्ञ पुढे नेत आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य यांनी केले आहे. शनिवार, २९ जून रोजी ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन सप्तरंग आयोजित 'सरस्वती पुरस्कार
कर्नाटकातील हुबळी येथे नेहा हिरेमठ या २४ वर्षीय तरुणीची फयाझ नावाच्या मुलाने चाकू भोसकून हत्या केली. नेहा हिरेमठ या काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती. फयाझने महाविद्यालयाच्या आवारात तरुणीवर वार केले.ही घटना बी व्ही भूमराद्दी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात घडली. नेहा तिथे MCA च्या प्रथम वर्षात शिकत होती. बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथील फयाझ हा याच महाविद्यालयातून बीसीएचे शिक्षण घेत होता आणि तो नेहाचा वर्गमित्रही होता.
निवडणुकांचे वारे वाहू लागले की कार्यकर्त्यांना उमेदवारीचे वेध लागतात. मोठ्या पक्षांकडून प्रत्येकाला संधी मिळतेच असे नाही. अशावेळी नाराज झालेले काहीजण स्वतःचा पक्ष काढून राजकीय नशीब आजमावतात. पण, निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यानंतर पुढचे सोपस्कार पूर्ण करण्यात अनेकजण दिरंगाई करतात. अशा तब्बल २१९ राजकीय पक्षांवर गेल्या ७ वर्षांत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वार्षिक लेखा परीक्षण अहवाल, आयकर विवरण सादर करण्यात कुचराई केल्यामुळे या पक्षांची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती 'मुंबई तरुण भारत'च्या हाती लागली
भारतात ‘सीएए’ कायदा लागू होणार म्हटल्यावर अपेक्षेप्रमाणे येथील अल्पसंख्याकांची माथी भडकावण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले. ‘इंडियन मुस्लीम लीग’ने ‘सीएए’ कायदा रद्द करावा म्हणून न्यायालयात याचिकाही दाखल केली, तर दुसरीकडे ‘ऑल इंडिया मुस्लीम जमात’ या संघटनेने ‘सीएए’ कायद्याचे समर्थन केले. तरीही ‘सीएए’ विरोधात अपप्रचार थांबलेला दिसत नाही. परंतु, ‘सीएए’ला विरोध करणार्यांचा आक्षेप मुसलमानांची नागरिकता हिरावून घेतली जाईल, एवढ्यापुरता नक्कीच मर्यादित नाही, हे समजून घ्यायला हवे.
अविष्कार जगताप आणि निवृत्ती बागुल या दोन तरूणांसाठी ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन ने पूढाकार घेतला होता. हे दोन तरूण ११ डिसेंबर २०२३ या दिवशी ईराण येथे शिपवर गेले होते. अशा नविन तरूणांना शिपवर पाठवतो असे सांगून त्यांना सेल्फ ईमायग्रेशन (पीओई)च्या माध्यमातून ईराण येथे पाठवण्यात आले होते.
गणेशोत्सवातील स्पर्धांपासून रेडिओ जॉकीपर्यंतचा गणेश आचवल यांचा कलाप्रवास हा सर्वार्थाने थक्क करणारा आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाश...
मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली 'अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का?' याविषयावर आगळेवेगळे अभिरूप न्यायालय पार पडले. अभिरूप न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांनी का
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साने गुरूजी साहित्य नगरी सज्ज झाली आहे. साहित्यिक रविंद्र शोभणे अध्यक्ष आणि ना. गिरीश महाजन स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत सुमित्राताई महाजन यांनी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषाताई तांबे यांना आपली स्विकृती कळवली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक व म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.
२२ जानेवारीला अयोध्येत राममंदीराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतभर त्यानिमीत्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स च्या अहवालानुसार राममंदीर उद्घाटन सोहळ्यामुळे देशभरात २२ जानेवारीला ५०,००० कोटी रुपयांचा अतिरीक्त व्यापार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यातील जामा मस्जिद शमसी आणि नीलकंठ मंदिर वादावर आता ६ जानेवारी २०२३ रोजी न्यायालय सुनावणी करणार आहे. जामा मशीद शमसीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाशी संबंधित वाद आणि तेथे पूजा करण्यास परवानगी देण्याच्या मागणीवर न्यायालयात सुनावणी झाली.
ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनच्या (एआयआरएफ) वार्षिक सर्वसाधारण सभेचे बुधवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी परळ येथील कामगार मैदानात आयोजित करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागीय अधिकारक्षेत्रातील दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी आणि अभ्यागत उपस्थित राहण्याची अपेक्षा अजोजक मान्यताप्राप्त युनियन राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) (CR/KR) केली आहे. याबाबत एआयआरएफचे सरचिटणीस कॉ. शिवगोपाल मिश्रा आणि अध्यक्ष कॉ. कन्निया, एनआरएमयूचे सरचिटणीस वेणू नायर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यात विशेषतः रेल्वे
पंजाबमधील पटियाला येथे नुकतेच संपन्न झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.
उद्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी असल्याकारणाने राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी २८ सप्टेंबरऐवजी दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स, गोरखपूर अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध मिळणार आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून येथील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
नव्या शिक्षण धोरणामुळे विद्यार्थी देशाच्या विकासात अधिकाधिक योगदान देण्यास प्रेरित होत आहेत. त्यामुळे नव्या शिक्षण धोरणामध्ये देशाचे नशीब बदलण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पुढील वर्षी फेब्रुवारीत अमळनेर येथे होणार्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने संमेलनासंबंधी वाद, साहित्याचे नवे प्रवाह आणि मराठी भाषा अशा विविध मुद्द्यांवर डॉ. शोभणे यांच्याशी साधलेला हा साहित्यसंवाद...
मुंबई : गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली. दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आलेले उच्चशिक्षित डॉक्टरेट इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, ईशान्य मुंबई दैवज्ञ ट्रस्टचे सर्वेसर्वा आणि दैवज्ञ चषक समन्वयक समितीचे संस्थापक विशाल कडणे हे विविध माध्यमातून सुप्रसिद्ध उद्योजक आनंद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्षे दैवज्ञ चषक, दैवज्ञ गरबा, मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, मोफत
सवलती घेताना धर्माचा आधार घ्यायचा आणि कायदे पाळताना मात्र, भारतीय दंड संहितेचा अवलंब करायचा, ही दुटप्पी भूमिका थांबवणे गरजेचे आहे. अपेक्षेप्रमाणेच केंद्र सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरू करताच, मुस्लीम समाजाकडून टोकाच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. हिंदू-मुस्लीम तेढ वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. तथापि, जगभरातील सर्वच देशात समान नागरी कायदा लागू असताना, भारतातच त्याला विरोध का, याचाही विचार व्हायला हवा.
“केवळ महार, चांभार किंवा अस्पृश्य समाजच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजच परकीय जोखडामुळे पतित झाला आहे आणि या हिंदूराष्ट्राला पावन करणारं हे मंदिर आहे,”असे प्रतिपादन तात्यांनी ‘पतितपावन’ या नावाचं मर्म उलगडताना केलं होतं. तेव्हा, या पतितपावन मंदिर उभारणीमागची स्वा. सावरकरांची प्रेरणा आणि चिंतन यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
आज आपण ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100व्या भागाच्या प्रसंगी दोन खास गोष्टी शिकल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी आहे की, जर आपल्याला सत्ता आणि राजकीय यश मिळवायचे असेल, तर आपल्याला लोकांच्या भावना समजल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे संवादाचे माध्यम. जुन्या रेडिओसारख्या माध्यमाचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झाले आहेत.
मुंबई-: अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्हा पदाधिकारी मेळावा आणि मार्गदर्शन शिबीर पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रविवारी संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. दरेकर यांनी मराठा समाजाच्या तरुण-तरुणींनी आधी स्वतःचा पाया भक्कम करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे मी नेहमी सोबत असेन, असे वचनही दरेकर यांनी यावेळी दिले.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या ५८ व्या वर्षी मिळणारी निवृत्ती आता वयाच्या ६० व्या वर्षी घेता येणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय ६० वर्षे होणार आहे. वेतनश्रेणी आणि डीए केंद्र कर्मचार्यांसह शिक्षकांना दरमहा सुमारे ४००० रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळेल. शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक पद असेल. सेवाज्येष्ठतेच्या आधारे नियुक्ती होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मिळणार आहे. इयत्ता १२ पर्यंतच्या दोन मुलांच्या पालकांना शिक्षण भत्त
‘हे विश्वची माझे घर’ अशी मंगलकामना करणारे आणि जगणारे शरद चव्हाण. त्यांच्या आयुष्याचा, कार्याचा आणि विचारांचा परिचय करुन देणारा हा लेख...
दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील ‘यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था’ संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संकेत ज्ञानेश्वर गालट असे विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्यास दोन दिवसांपासून खोकला असल्याचे शाळा प्रशासनांकडून सांगण्यात आले.
दि. ३ फेब्रुवारी ते ५ फेबृवारीदार्म्यान वर्ध्यात ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष साहित्यिक व लेखक भारत सासणे यांच्या हस्ते संमेलनाच्या पूर्व संमेलनाला ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग. त्र. माडखोलकर प्रकाशन मंचाचेही उद्घाटन करण्यात आले. संध्याकाळी ठीक ५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. मंचावर भारत सासणे यांच्यासोबत डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते.
उद्या दि. ३ फेब्रुवारीपासून ते दि. ५ फेब्रुवारीपर्यंत वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या पटांगणात ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संपन्न होईल. यंदा साहित्य संमेलनाला न्या. नरेंद्र चपळगावकर हे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तेव्हा, साहित्य संमेलनाचे औचित्य साधून साहित्यनिर्मिती आणि एकूणच साहित्य क्षेत्राबाबत न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्याशी केलेली ही खास बातचित..
राज्यात मी ट्रेलर म्हणुन काम करतोय, तर पिक्चर मुख्यमंत्री दाखवणार आहेत. अशी मार्मिक टोलेबाजी करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडुन उठवल्या जाणाऱ्या वावड्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडुन निर्णयांचा धडाका सुरु आहे.या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जाहिरपणे मुख्यमंत्र्यांची भलामण करून एकप्रकारे राज्यात सुशासन सुरु असल्याचे स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरला आता काही विशेषाधिकार राहिले नाहीत, हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. देशातील बदलते वारे लक्षात घेऊन गुलाम नबी आझाद यांनी, ‘कलम ३७०’ आता पुन्हा येऊ शकत नाही, असे जे वक्तव्य केले त्यापासून काही बोध घेण्याची अब्दुल्ला आणि ‘गुपकार गँग’ची तयारी दिसत नाही. फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच असल्याचे दिसून येत आहे.
संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. कला आचार्या यांचे संस्कृत विषय क्षेत्रातील विशेष योगदान पाहता, त्यांना श्रीमती शीला दीक्षित 'संस्कृत श्री' या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १९ जुलै) अखिल भारतीय संस्कृत साहित्य संमेलनाद्वारे घेण्यात आला. शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीतील संस्कृत भवन सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
“ ‘उद्’ म्हणजे ‘आनंद’ व ‘योजक’ म्हणजे मिळवणे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती जो घडवून आणतो तो खरा उद्योजक होय ! असे परात्पर गुरु परशुराम पांडे महाराज यांनी सांगितले आहे.
उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिंतन शिबिरातील धोरणांची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा होत आहे. दोन पदांवर असलेले विविध पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देणार असून एक व्यक्ती एक पद यांसह काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
“शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण माझ्या मनात शंका आहे की, अशा अनेक योजना आखल्या जातात. परंतु, त्यांची अंमलबजावणी किती होते, ही आर्थिक मदत कशा पद्धतीने केली जाणार आहे आणि या अशा अनुदानातून फक्त एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच ही अनुदानाची खिरापत वाटली जाऊ नये आणि नंतर साहित्य संमेलनाच्या नावाखाली आणखी गडबड होऊ नये एवढीच अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी दिली.
हिजाब’ हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळे शाळा अथवा महाविद्यालयांमध्ये ‘हिजाब’ घालून वर्गात बसता येणार नसल्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे
आंतरराष्ट्रीय सीमारेषा असलेल्या राज्यांमधील सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्राच्या विस्तारावरून केंद्र आणि राज्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाचा धुरळा अद्याप खाली बसलेला नसताना आता आयएएस (कॅडर) नियम १९५४ मधील सुधारणांवरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. तेव्हा हा वाद नेमका काय आहे, राज्यांची, केंद्र सरकारची भूमिका काय, त्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा.
लातूरमधील उद्गीर येथे आयोजित ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कथाकार आणि साहित्यिक भारत सासणे यांची एकमताने नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने भारत सासणे यांनी त्यांच्या साहित्यकृतींपासून ते संमेलनापर्यंत विविध विषयांना स्पर्श करत दै. ‘मुंबई तरुण भारत’शी केलेली ही खास बातचित...
आजपासून रविवार दि. ५ डिसेंबरपर्यंत गोदाकाठी सारस्वतांचा मेळा भरणार आहे. यानिमित्ताने साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषविण्याचा तिसऱ्यांदा मान नाशिकनगरीला लाभला आहे. त्यानिमित्ताने यापूर्वी नाशिकमध्ये संपन्न झालेल्या १९४२ आणि २००५च्या साहित्य संमेलनाचा धांडोळा घेणारा हा लेख...
नाशिकमध्ये पावसाची परिस्थिती असल्यामुळे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी नियोजनात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे. पुढे ग्रंथदिंडी महापौर बंगला, रेमंड सिग्नलला उजवीकडे वळणार, जुने ‘सीबीएस’ सिग्नल ओलांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोडवरून नाशिक जिमखाना, सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृहवरून सार्वजनिक वाचनालय येथे विसावा, त्यानंतर ग्रंथ
नाशिक येथे आयोजित ९४ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’वरील विविध संकटे काही कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचेच चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. दि. २६ ते २८मार्चमध्ये आयोजित असणारे हे संमेलन राज्यासह नाशिकमध्ये झालेल्या कोरोना उद्रेकामुळे पुढे ढकलले गेले. मोठ्या महतप्रयासाने आयोजकांना दि. ३ ते ५ डिसेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात यश मिळाले.
नाशिकमध्ये होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध विज्ञान साहित्यिक आणि खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर भूषविणार आहेत. संमेलनाच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यानिमित्ताने ‘लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’, ‘सीओईपी’ माजी विद्यार्थी संघटना आणि ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन समिती यांच्यावतीने विज्ञान साहित्यावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये होणार्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांच्या नावावर शनिवारी अखेर शिक्कामोर्तब झाले. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्धाटन होणार असून विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थिती लावणार आहेत. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.
“सर्वसामान्यांचे पर्यावरणाशी कृतिशील नाते निर्माण होण्यासाठी नाशिक येथे आयोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक उत्तम व्यासपीठ ठरू शकते,” असे परखड मत पर्यावरण अभ्यासकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.