महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी तथाकथीत अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.
Read More
तुरुंगामध्ये जातीवर आधारित काम सोपवणे असंवैधानिक असून, राज्य कारागृह नियमावलीमध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.
तात्याराव सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई उर्फ माई यांचे माहेर त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या जव्हारचे. त्यांचे वडील रामचंद्र उर्फ भाऊराव चिपळूणकर हे जव्हार संस्थानचे दिवाण होते. ते अतिशय श्रीमंत होते. तात्यारावांचे आजोळ कोठूरचे. त्यांच्या मामांचे नाव गोविंद मनोहर. तात्यांचे आई-वडील खूप लवकर मृत्यू पावले असल्याने हे मामाच सावरकर कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होती. त्यांनी एके दिवशी अचानकपणे जाहीर केले की, “मी तात्याचे लग्न यमुना चिपळूणकरशी नक्की केले आहे.” थोड्या चर्चेनंतरतात्यांनीही या विवाहाला संमती दिली आणि मा
जाता जात नाही ती म्हणजे जात. जातीभेद ही समाजव्यवस्थेला लागलेली कीड असून ती नष्ट करण्यात आजही म्हणावे तितके यश आलेले नाही. जातीव्यवस्थेला लागलेली ही कीड भारतातच नव्हे, तर अगदी सातासमुद्रापार स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणवणार्या अमेरिकेतही पाहायला मिळते.परंतु, एका पुणेकर महिलेने अमेरिकेतील सिएटल शहरात जातीभेदावर प्रतिबंध घालण्यासाठी आवाज उठवला. क्षमा सावंत असे या महिलेचे नाव असून त्या सिएटल सिटी काऊंसिलच्या सदस्या आहेत. त्यांनी सिएटल शहरात जातीभेदावर बंदी घालण्याची मागणी करत एक विधेयक आणले. ‘सहा विरूद्ध एक’ अ
सावरकर संस्थेने केलेला सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध हे जातीयवाद वाद संपविण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे. ज्या दिवशी समाजातील जातीभेद नष्ट होईल तो देशासाठी सर्वोत्तम दिवस असेल, असे प्रतिपादन सावरकर अभ्यासक आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे केले.
मागील लेखात सशस्त्र क्रांतिकारक म्हणून सावरकरांविषयी महत्त्वाचे क्रांतिकारक आपल्या भावना कोणत्या शब्दांत व्यक्त करत होते, त्याचा थोडक्यात आढावा घेतला. या भागात आपण त्यांच्या इतर काही पैलूंविषयी काही निवडक मान्यवरांच्या भावना जाणून घेऊ.