महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. ५ जून २०२५ रोजी वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
Read More
( new electricity connections in Bhandup circle ) राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे यांनी दिले होते. त्यानुसार, भांडूप परिमंडलात सेवा पंधरवड्यात ४ हजार ४२३ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यासाठी, भांडूप परिमंडल अंतर्गत विविध ठिकाणी ग्राहकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ह्म, विष्णु आणि महेश या तीन देवांचा अंश असणाऱ्या श्रीगुरुदेवदत्त यांची आज जयंती. ( Datta Jayanti ) दत्त कथांविषयी आनी त्यांच्या अवतारांविषयी आपण आजवर बरचं ऐकलेलं आहे. आपल्या देशात दत्तांची अनेक मंदिरे आहेत आणि त्यांच्या अवतारांशी निगडीत अनेक स्थानं आहेत. पण त्यापैकी २४ स्थानं अशी आहेत ज्यांची परिक्रमा केली जाते. या परिक्रमेला दत्त परिक्रमा म्हटलं जातं.
(Sanpada) नवी मुंबईतील सानपाडा परिसरात २८ नोव्हेंबरला दुपारच्या वेळी भूमीराज कॉस्टॅरिका टॉवर (Bhumiraj Costa Rica) च्या १२ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर असणाऱ्या खासगी कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आयोजित 'द आरएसएस, मनू अँड आय' या कार्यक्रमाचा धसका घेऊन पोस्टर्स डाव्या विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमाचे पोस्टर्स फाडण्याचा नेहेमीचा बालिशपणा केला आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील ५३०९ घरांसाठी लवकरच सोडत निघणार आहे. यासंदर्भात म्हाडाकडून लवकरच जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे. दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून ऑनलाईन अर्जविक्री स्वीकृतीस सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःचे घर विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्वपरवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास १६ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या ६० दिवसांच्या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे.
'जी२०' शिखर परिषदेत 'भारत - पश्चिम आशिया - युरोप' असा विशेष आर्थिक कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, युरोपीय महासंघ, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका यांचा समावेश असलेल्या कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांवरील सहकार्याचा हा ऐतिहासिक आणि पहिलाच उपक्रम आहे.
ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहणारी गणेश कलंदाते नामक व्यक्तीने जंगली रमीमध्ये ऑनलाईन २० हजार रुपये गुंतवले होते, त्यात त्याला नुकसान सहन करावे लागल्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गणेश कलंदाते हा एक कॅब चालक असून त्याला मद्यपानाचे व्यसन होते. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र : महापारेषण कंपनीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे परिमंडळात दि.२१ जुन २०२३ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे क्षेत्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
पुणे : पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणार्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे.
मूळचा गुजरात येथील दर्शन सोळंकी या ‘पवई आयआयटी’च्या विद्यार्थ्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी ‘आयआयटी’ वसतिगृहाच्या परिसरातच आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने समाज ढवळून निघाला. काही संघटनांनी ठामपणे सांगितले की, दर्शन मागासवर्गीय होता म्हणून त्याच्याशी जातीभेद केला गेला. या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. यावर ‘पवई आयआयटी’ने अंतर्गत अहवाल सादर केला. महाराष्ट्र सरकारने दर्शनच्या मृत्यूसंदर्भात विशेष तपास पथक नियुक्त केले. दर्शनच्या मृत्यूनंतर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि घटना यांचा मागोवा घेणारा हा लेख..
‘स्लाव्ह मित्र मंडळ’ची २०१० साली स्थापना झाली. अजय मुरूडकर,अदिश देसाई, आनंद पंडित, मंदार मिराशी, संचनि नेमाने, योगी चव्हाण हे या संस्थेचे सदस्य. सात सदस्यांनी ‘स्लाव्ह मित्र मंडळा’च्या माध्यमातून हिंदू संस्कृती परदेशात जागृत राखली आहे. त्याविषयी...
मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधील गाळ काढणे आणि रस्त्यांवरील चर पुनर्बांधणी या दोन कामांची निकड लक्षात घेता त्यासाठीच्या मिळून एकूण ३० निविदांना महापालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे
नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील व्यावसायिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजप या राजकीय पक्षाशी विचाराने जोडले गेलेले दीपक वेढणे यांनी येथील नागरिकांमध्ये जनजागृती करत आरोग्य रक्षणाचा ‘दीप’ प्रज्वलित करण्याचे कार्य केले. तसेच अगदी तळागाळातील दुर्लक्षित समाजघटकांनाही त्यांनी मदतीचा हात दिला.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे फेसबुक लाईव्ह माध्यमातून ई व्याख्यानांचे आयोजन
म्हाडाच्या कोकण मंडळाची सुमारे ९ हजार २०० घरांच्या सोडतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या घरांसाठी सोडत निघणार आहे
मुंबईत पहिली मेट्रो सुरू होऊन दि. ८ जूनला पाच वर्षे पूर्ण झाली. आता मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती त्यांचा प्रवास सुकर करणार्या उर्वरित मेट्रोमार्गांची. तेव्हा, मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईतील महत्त्वाचा मानला जाणारा सायन सर्कल उड्डाण पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहे. जवळपास तीन ते चार महिन्यांसाठी हा उड्डाण पूल बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधारा रविवारीदेखील कायम होती.
एमआयडीसी निवासी विभागात मागील वर्षी खड्ड्यांची समस्या ‘जैसे-थे’ राहिली होती. यासह शहरातील अन्य सुस्थितीत असलेले रस्तेही खड्ड्यात जाऊ लागले आहेत.
कोंबड्यांचे वजन वाढण्यासाठी तयार करण्यात येणा-या प्रतिजैविकाची सर्रास विक्री करण्यात येत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे.
हल्ली प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यात जास्तच रस असल्याने सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात वाढला आहे.