वायनाड लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची संपूर्ण माहिती न दिल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नव्या हरिदास यांनी केला आणि त्यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात केली आहे.
Read More
(Kerala High Court) केरळ उच्च न्यायालयाने लक्षद्वीप (Lakshadweep) या केंद्रशासित प्रदेशातील शालेय अभ्यासक्रमातून अरबी आणि महाल भाषा काढून टाकण्याच्या अलिकडच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, शाळांमध्ये जुना अभ्यासक्रम शिकवण्यात यावा आणि मुलांना अरबी आणि महाल भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत.
(TMC MP Saket Gokhale apologised to Ex-Diplomat Lakshmi Puri) तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मानहानीच्या प्रकरणात माजी भारतीय राजदूत आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांची बिनशर्त माफी मागितली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने साकेत गोखले यांना एका आठवड्याच्या आत लक्ष्मी पुरी यांची जाहीर माफी मागण्याचे आणि ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.
मदरसे महाविद्यालय होतील की मदरसेच राहतील?
केवळ कायदेशीर क्षेत्रातच नव्हे तर भारतीय लोकशाहीच्या रचनेतही आंबेडकरांचे योगदान : सरन्यायाधीश बी.आर. गवई
" आपल्या संवैधनिक खंडपीठाने पर्यावरणीय न्यायाला उच्च स्थान दिले आहे आणि ते सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून वेगळे करता येणार नाही असे वारवांर म्हटले आहे. पर्यावरणीय न्याय हा सामाजिक न्यायाचा भाग आहे." असे प्रतिपादन न्यायाधिश अभय ओक यांनी केले. शनिवार दि. ७ जुन रोजी सोसायटी ऑफ इंडियन लॉ फर्म्स (SILF) ने आयोजित केलेल्या हवामान बदल परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
(Karnataka High Court Slams Siddaramaiah Govt Over Bengaluru Stampede) आयपीएल २०२५ च्या अठराव्या हंगामातील आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर ४ जून रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारतीय सैन्याची बदनामी करणारी विधाने करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नाही, अशा शब्दात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी खडसावून अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना मानहानीच्या खटल्यात दिलासा देण्यास नकार दिला आहे.
(Sharmistha Panoli Arrest Case) कोलकाता पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला तुरूंगात मूलभूत सुविधा नाकारल्या गेल्याचा आणि तिला धमक्या मिळाल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. शर्मिष्ठाचे वकील मोहम्मद समीमुद्दीन यांनी यासंदर्भात अलीपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने ४ जूनपर्यंत या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात न्यायालयीन बदल्यांनंतर दिल्ली दंगल कट प्रकरणावर न्यायालय नव्याने युक्तीवाद ऐकणार आहे.
विशेष प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल चाईबासा येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणारी याचिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य दोघांवर सामूहिक हत्या करण्याव्यतिरिक्त अन्य काही आरोप ठेवले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातल्या हिंसाचारप्रकरणी हे आरोप ठेवण्यात आले आहेत. हसीना यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरोधातल्या खटल्याच्या सुनावणीला रविवार, दि. 1 जून रोजीपासून सुरुवात करण्यात आली.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला शुक्रवारी नेपाळमधून अटक करण्यात आली. त्यानंतर शनिवार, ३१ मे रोजी त्याला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘आरजी कर केस’ प्रकरणी व्हिडिओ तयार करताना ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचे छायाचित्रण वापरले म्हणून मोहक मंगल या युट्यूबर विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मंगल यांच्यावर ‘एएनआय’ने कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला असून त्याविरोधात दंड म्हणून ४० लाख रुपयांची मागणी केली होती.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने पारदर्शकता, जनहित आणि नैतिक प्रशासनावरील कटिबद्धता अधोरेखित करत घोडबंदर- भाईंदर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया नव्याने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गाईमुख-भायंदर प्रकल्पासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला उच्च न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप न करता एमएमआरडीएच्या कार्यपद्धतीला मान्यता दिली आहे.
गेटवे ऑफ इंडियाजवळ उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधांच्या प्रकल्पावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, दि.२७ रोजी नकार दिला आहे. सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, “शहरात काहीतरी चांगले घडते आहे, हे लक्षात घेता प्रकल्पाला रोखणे उचित ठरणार नाही." या प्रकल्पासंबंधी याचिका मुंबई उच्च न्यायालयानेही जनहिताचा प्रकल्प ठरवून यापूर्वी ७ मे,२०२५ रोजी फेटाळली होती. २२९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा असल्याचे
(Vaishnavi Hagwane Case Hearing) वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले. मात्र वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे. मात्र आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवीची एका व्यक्तीसोबत चॅटिंग पकडल्यानंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती,
वैष्णवी हगवणे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग करत असून आम्ही ते पकडले, असा युक्तीवाद हगवणे कुटुंबाच्या वकीलांनी न्यायालयात केला आहे. बुधवार, २८ मे रोजी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची सुनावणी पार पडली.
सर्वोच्च न्यायालयाने अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना मिळालेल्या अंतरिम जामिनाची मुदत वाढवली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अली खान महमूदाबाद यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका केली होती. त्यांच्या विधानानंतर अली खान महमूदाबाद यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरू झाली. पोलीसांत तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. गौरी गोडसे आणि न्या. सोमाशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकतेच खदिजा शेख या विद्यार्थिनीच्या वकिलाला तिच्या जामिनासाठीचा अर्ज तातडीने दाखल करण्यास सांगितले. "या विद्यार्थिनीला परीक्षेला बसता येईल, यासाठी हा अर्ज आम्ही आजच मंजूर करू,” असेही न्यायालयाने आश्वासन दिले. तसेच, न्यायालयाने म्हणे सरकार आणि महाविद्यालयाला फटकारले की, विद्यार्थिनीला सुधारण्याची संधी द्या. तिला गुन्हेगार का ठरवता? थोडक्यात, भारताची निंदा पाकिस्तानीचे पाय चाटूनही खदिजा आता निष्पाप रस्ता चुकले
(Jyoti Malhotra Court Hearing) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हिसार जिल्हा न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात ज्योती मल्होत्राची कसून चौकशी केली. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत असताना आपल्या आयएसआयशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे.
( Instructions issued during the visit of the Chief Justice of the Supreme Court ) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या मुंबई तसेच राज्यात अन्यत्र दौऱ्यादरम्यान विहीत राजशिष्टाचाराचे पालन होण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
( India is not a dharmshala Supreme Court rejects Sri Lankan man’s plea for setting in india) “जगभरातील निर्वासितांना सामावून घेता येईल, यासाठी भारत ही धर्मशाळा नाही,” असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले. ‘बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्या’अंतर्गत अलीकडेच तुरुंगवास भोगलेल्या श्रीलंकेच्या एका व्यक्तीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावताना याविषयी टिप्पणी केली.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. यशवंत वर्मा यांच्या जळीत नोटाकांडामुळे न्यायालयाच्या नि:स्पृहतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, अहवाल आले आणि त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्या. वर्मा यांना राजीनामा देण्याची किंवा निवृत्ती स्वीकारण्याची सूचनाही केली. पण, न्या. वर्मा यांनी ही सूचना अमान्य केल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीसाठी आता संसदेत ‘महाभियोग’ चालवावा लागेल. पण, भारतीय न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांवरील कारवाईचे हे पहिलेच प्रकरण नसून, यापूर्वीही ‘महाभियोगा’ची
( Draupadi Murmu questions to Supreme Court ) विशेष प्रतिनिधी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या कलम १४३ (१) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला एक संदर्भ पाठवला आहे, ज्या अंतर्गत न्यायालयाने राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कायदेमंडळांनी अलीकडेच मंजूर केलेल्या विधेयकांना मान्यता देण्यासाठी वेळ मर्यादा निश्चित केली आहे. भारताच्या इतिहासातील हे एक दुर्मिळ पाऊल आहे.
भारतात मुले दत्तक घेण्यासाठी दत्तक पालकांना करावा लागणारा प्रतीक्षा कालावधी हा दीर्घ असल्यामुळे अनेक अडचणीला समोर जावे लागते, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सुओ मोटो दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावत या संदर्भातील विस्तृत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
(Maharashtra Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या’ असा आदेश न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यासंदर्भातील सुनावणी आज दि. ६ मे रोजी पार पडली.
र्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा आदेश, मंगळवार दि. ६ मे रोजी दिला आहे. न्यायालयाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासंहित निवडणूका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्याच्या सुनावणी दरमान्य दिले आहेत.
न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास वाढवण्याचा दिशेने सर्वोच्च न्यायालयाने, सोमवार दि. ५ मे रोजी न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली
फक्त लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्रीवर पण दावा ठोका! सुलताना बेगमला सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल
ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी आणि सक्रियपणे त्या धर्माची आचरण करणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा भाग राहू शकत, असे म्हणत एका पादरीची आंध्र पद्रेश न्यायालयाने कानउघडणी केली आहे. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९च्या संदर्भात एका खटल्यातील सुनावणीवेळी हा निकाल दिला.
द्रास उच्च न्यायालयाचा बनावट आदेशाचा दाखला देत तमिळनाडूतील दिवाणी न्यायालयाचा निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि युनायटेड किंग्डमचे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका (पीआयएल) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सोमवारी फेटाळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी १५ मे रोजी भारताचे नियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर 'कुत्रा माफिया'चा भाग असल्याचा आरोप करणाऱ्या महिलेच्या अवमान शिक्षेला गुरवार दि. १ मे रोजी तुर्तास स्थगिती दिली.
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचे निर्देश मागणाऱ्या जनहित याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला आणि याचिकाकर्त्याला फटकारले.
सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली आहे. गुरवार, दि. १ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
डिजिटल सेवेचा वापर करणे, हा सध्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत २० निर्देश जारी केले. या ऐतिहासिक निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने डिजिटल सेवाचा लाभ घेणे व त्याचा वापर करणे हा मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडितांनी डोळे गमावले असतील, ज्यांना दृष्टीदोष किंवा अंधत्वासारख्या समस्या असतील, अशा ग्राहकांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. केवायसी म्हणजेच Know Your Customer ज्यात ग्र
दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ
वक्फ कायद्याविरोधात नव्याने याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी याबद्दल झालेल्या सुनावणीत वक्फ सुधारणा कायद्याविरुद्धात कॉपी-पेस्ट याचिका नको, अशा शब्दांत कानउघडणी केली आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला आव्हान देणारी कोणतीही नवीन रीट याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्पायवेअर वापरण्यात काहीही गैर नाही, परंतु खाजगी व्यक्तींविरुद्ध त्याचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल; असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले आहे.
राष्ट्रीय राजधानीतील पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी २६/११ चा कट रचणारा इस्लामी दहशतवादी तहव्वुर राणा याच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आणखी १२ दिवसांची वाढ केली आहे.
नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ‘तामिळनाडू राज्य वि. तामिळनाडू राज्यपाल’ या याचिकेमध्ये दिलेल्या निकालात, राष्ट्रपतींना काही निर्देश दिले. त्यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तीव्र निषेध नोंदवत केलेल्या वक्तव्याने, पुन्हा एकदा न्यायालयीन सक्रियता, न्यायालयाचे अधिकार मर्यादा उल्लंघन अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या आहेत. त्यातच उपराष्ट्रपतींनी संविधानातील ‘कलम 142’ला न्यायपालिकेचे ‘न्युक्लिअर मिसाईल’ म्हणत, ते लोकशाहीच्या विरुद्ध डागले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यानिमित्ताने केलेला हा ऊहापोह...
आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी यांना त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते हे माहित आहे का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केला. त्याचप्रमाणे भविष्यात स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध वादग्रस्त विधान करू नका, अन्यथा ‘परिणामांना सामोरे जावे लागेल’ असा इशाराही दिला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. महात्मा गांधींनी स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर केला होता. उद्या तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणाल!, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची कानउघडणी केली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली. डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"उबाठा गट या देशाचा इतिहास विसरलेला दिसतो. युद्धाची किंवा युद्धसदृश्य परिस्थिती असताना आणि देशावर हल्ला झालेला असताना, भारतातील राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. हा या देशाचा इतिहास आहे. मात्र अशा परिस्थितीत उबाठा गटाकडून विरोध करणे, उपहास करणे किंवा मूर्खासारखी वक्तव्ये करणे सुरू आहे. देशाची जनता त्यांना माफ करणार नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी केला.
वक्फ सुधारणा कायदा हा भारताच्या संसदेने पारित केला आहे. त्यामुळे संसदेना पारित केलेला कायदा सर्वोच्च न्यायालय रोखू शकत नाही, असे केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.