नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सीएनएन’ या जागतिक माध्यम संस्थेच्या अहवालात भारताच्या महासत्ता होण्याच्या प्रवासात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच उद्योजक गौतम अदानी, मुकेश अंबानी यांचेही योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तेव्हा, अंबानी आणि अदानींच्या नावाने केवळ राजकीय डावपेच खेळणार्या, विरोधकांच्या डोळ्यांत अंजन घालणार्या या अहवालाविषयी थोडे विस्ताराने...
Read More
शत्रूला कात्रीत पकडल्यावर उगाच मोठेपणा दाखवून त्याला माफ करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात मारा किंवा मरा इतकाच पर्याय असतो. चारही बाजूंनी शत्रूने घेरलेल्या आपल्या स्वराज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवर दया न दाखविण्याचे जे धोरण स्वीकारले, त्यामुळेच हिंदवी स्वराज्य टिकू शकले. हिंदवी स्वराज्याप्रमाणेच इस्रायलही चारही बाजूंनी शत्रूने घेरलेला असल्याने इस्रायलने छत्रपतींचाच आदर्श ठेवला असून, ‘हमास’बरोबर युद्धबंदीची शक्यता फेटाळून लावली आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान’ उतरवण्याचा ऐतिहासिक पराक्रम भारताने केला आणि संपूर्ण जगाने त्याचे कौतुक केले. अवकाशातील महासत्तांमध्ये भारताचा झालेला समावेश साहेबांच्या इंग्लंडला पचनी पडलेला नाही, म्हणूनच त्यांची पोटदुखी सुरू झाली आहे. ‘बीबीसी’ने त्याबाबत केलेले वार्तांकन हे त्याचेच लक्षण!
‘सेंटर फॉर इंडियन बांबू रिसोर्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘सिबार्ट’चे संचालक म्हणून संजीव कर्पे कार्यरत आहेत. तसेच युरोपियन युनियनच्या अर्थसाहाय्याने सुरु असलेल्या एका प्रकल्पावर ते बांबूतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाचे ‘मॉड्यूलर बांबू फर्निचर क्लस्टर, सिंधुदुर्ग’ याचे अध्यक्ष म्हणूनसुद्धा संजीव कर्पे कार्यरत आहेत.