( MHADA CEO Sanjeev Jaiswal ) “मुंबईत जमिनीची उपलब्धता कायमस्वरूपी आव्हान आहे. म्हाडाला रखडलेले प्रकल्प ताब्यात घेण्यास सक्षम बनवणार्या कलम ९१ अ मध्ये अलिकडेच सुधारणा करण्यात आली. सेस बिल्डिंग पुनर्विकासात दीर्घकाळ अडथळा असलेल्या जमीन मालकांना भरपाई देण्याचे काम आता कलम७९ अ अंतर्गत न्याय्य तरतुदींसह केले जात आहे. पुनर्विकास म्हणजे केवळ नवीन इमारती बांधण्याबद्दल नाही तर व्यवहार्यता, पारदर्शकता आणि वेळेवर वितरण करणे ही यात अध्याहृत आहे. यातील भाडेकरूंचे हक्क आणि प्रकल्प व्यवहार्यता दोन्ही सुरक्षित करण्यासाठी
Read More
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई)मध्ये काही दशकांत लक्षणीय बदल घडून आले आहेत. भारतीय भांडवली बाजारातील प्रवेश आणि माहितीच्या सर्वसमावेक धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल दिसून लागले आहेत, असे बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन रामामूर्ती यांनी सांगितले.
जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क याच महिन्यात भारताच्या दौर्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भेटीत मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, भारतात ‘टेस्ला’तर्फे गुंतवणुकीचीही घोषणा होऊ शकते. त्यानिमित्ताने एकूणच भारतीय वाहन निर्मिती उद्योगक्षेत्राचा घेतलेला हा आढावा...
ती आणि अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत सधन असणार्या, नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत कुपोषित बालके व माता आढळाव्यात ही बाब खेदजनकच आहे. जिल्ह्यातील वनवासी दुर्गम भागांत विशेषतः गर्भवती माता व नवजात अर्भकांचे योग्य जागृती अभावी पोषण होत नसल्याचे, निरीक्षण आरोग्य यंत्रणेला आढळले.
TRAI ( Telecom Regulatory Authority of India) देशातील दूरसंचार व टेलिकॉमचे नियामक मंडळाच्या नियमावलीत सुधारणा होणार असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेस ने दिले आहे. या वृत्तानुसार TRAI चे अध्यक्षपद खासगी क्षेत्रातील व्यक्तीला देण्यात येणार आहे. टेलिकॉम विश्वातील हा मोठा बदल मानला जात आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज समुहातील जिओ कंपनीने आता पोस्टपेड बरोबर प्रीपेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन लाँच केल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे. गेल्या ४-५ वर्षात स्वस्त दरात ४ जी नेटा उपलब्ध करून जनसामान्यात धुमाकूळ घातला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून ही स्कीम ग्राहकांसाठी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेतील ‘लेटलतिफ’ कर्मचारी हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ मिनिटे ते सायंकाळी ६.१५ मिनिटे अशी असली तरी प्रत्यक्षात विलंबाने येणारे आणि काम संपण्यापूर्वीच घरी पळणार्या कर्मचार्यांची वाढती संख्या बघता, अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. लेटलतिफांना शिस्त लागावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या ’सीईओ’ आशिमा मित्तल यांनी काही कडक पावलेही उचलली. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला कर्मचार्यांच्या वेळेची तपासणीचे आदेशही त्यांनी दिले.
पाळीव प्राण्यांचे संगोपन करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून यासाठी ज्या कुटुंबाकडे पाळीव प्राणी असतात त्यांचा त्यासाठीचा वार्षिक खर्च सरासरी ६४ हजार रुपये इतके असल्याचे निदर्शनास आले आहे. तर पाळीव प्राण्यांचा बाजार जगभरात २०१९ च्या तुलनेत १३% वाढला असल्याची आकडेवारी तज्ज्ञांनी दिली आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून रोशनी नाडर यांनी सलग दुसऱ्या वर्षीही आपले स्थान कायम राखले आहे. भारतातील पहिल्या तीन माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील एक असलेल्या एचसीएल टेकनॉलॉजिजच्या रोशनी नाडर या अध्यक्ष आहेत
जळगाव : जिल्हा परिषदेत शुक्रवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी विविध विभागातील कामांचा आढावा घेतला. त्या जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील ५ कोटींच्या वसुलीतील अफरातफरीबाबत अधिकार्यांना धारेवर धरले. ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठ्यासह इतर अफरातफरीची रक्कम त्वरित वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे.
केंद्र सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे भारताबाहेरील उद्योजकांचा देशात गुंतवणूक करण्याकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे.
राज्यामध्ये एकूण ५८ हजार मतदान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कुमार यांनी यावेळी सांगितले.