मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच पथकर नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भरपाई देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंगळवार, दि.3 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच पथकर सवलतीचा कालावधी दि. १७ सप्टेंबर २०२९पर्यंत वाढविण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
Read More
करारनाम्यातील अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यास सरकारची मान्यता
राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक ही सर्वंकष योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंगळवार, १३ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत चिंताजनक ठरलेल्या अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सज्जता तसेच आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची विविध मंत्रालये तसेच विभाग यांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
( Ahilyanagar cabinet meeting ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ६ मे रोजी चौंडी (अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी मंगळवार, दि. ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा अग्निप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात 'कॉल हिंदू' नामक एका खाजगी डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन करण्यात आले. याद्वारे हिंदू समाजासाठी रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाईन विवाह संस्था यासारख्या विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते विशाल दुराफे यांच्या संकल्पनेतून सदर डिजिटल व्यासपीठ साकारत असून, आज त्याच्या वेबसाईटचे उदघाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. आज या वेबसाईटच्या माध्यमातून कॉल हिंदू जॉब्स या सेवेची सुरुवात करण्यात आली असून हिंद
(Caste census in India) गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. बुधवार दि. ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी ही घोषणा केली.
( mahrashtra state cabinet meeting ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार, ९७२ कोटी, ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख, ९६ हजार, ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे
मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
( maharashtra cabinet will be paperless ) फडणवीस सरकारच्या यापुढच्या कॅबिनेट ‘पेपरलेस’ होणार आहेत. राज्यात लवकरच ई-मंत्रिमंडळ प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली जाणार असून, असा निर्णय घेणारे करणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य ठरणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ९ निर्णय घेण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी २२ हजार, ९१९ कोटी रुपयांची पीएलआय योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारात स्पर्धात्मक वातावरण तयार झाले असून, मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत यशस्वी होणार आहे.
( Farmers become fuel providers in the future Union Minister Nitin Gadkari ) आपल्या देशात प्रदूषणाची मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जैविक इंधन तयार करण्याचा प्रकल्प पानिपत येथे सुरू केला आहे. जैविक इंधनाचे 400 प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यातील 60 प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाता, हवाई इंधन दाताच नव्हे, तर बिटुमेन दाताही होणार आहे. त्यामुळे येणार्या काळात आपण ऊर्जा आयात करणारे नाही, तर निर्यात करणारा
राज्यतील पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी आणि राज्यातील कोणत्याही भागातून गतिमान रस्ते प्रवासासाठी राज्यात विविध रस्ते प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व रस्ते प्रकल्पांची कामे गतीने हाती घेण्यासोबतच नवीन प्रकल्पांसंदर्भात प्राधान्याने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
माहितीचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य आधारसामग्री’ धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. डेटा ही आजच्या काळातील सर्वांत मौल्यवान संपत्ती असल्याचे मानले जाते. या माहितीचा योग्य पद्धतीने वापर केला, तर त्याचा जनतेला मोठा फायदा होणार आहे.
महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांनी पुणे हादरले असताना आता पुन्हा एक विनयभंगाची घटना पुढे आली आहे. एका आयटी कंपनीत कामाला असलेल्या महिलेचा कॅब चालकाने विनयभंग केला असून भयभीत झालेल्या महिलेने चालत्या कारमधून उडी घेत पोलिस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली.
अतुल सावे म्हणजे मराठवाड्यातील भाजपचा आश्वासक आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ या ब्रीदवाक्याप्रमाणे त्यांचे कर्तृत्व दिसून येते. यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहिताच्या तळमळीतून त्यांचे सामाजिक, राजकीय कार्य अखंड-अविरत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ते इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आज दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने
शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील स्टारलिंग सिनेमॅक्समध्ये छावा या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग आयोजित केली. या विशेष स्क्रिनिंगसाठी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. थिएटरमधील चारही स्क्रिनिंग रूम हाऊसफुल्ल होत्या. संपूर्ण चित्रपटगृहात “छत्रपती शिवाजी महाराज की जय!”, “छत्रपती संभाजी महाराज की जय!”, “हर हर महादेव!” अशा जयघोषांचा निनाद घुमत होता, आणि शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई, दि.१९: प्रतिनिधी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाढत्या प्रवासी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेच्या विस्तारासह आगामी पाच परिवहन विभागांतर्गत ‘रोप वे’ या नवीन परिवहन सेवेचा अंतर्भाव करण्याच्यादृष्टीने राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास बुधवार, दि.१८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली असून यात विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय क्रिटीकल मिरल मिशनला ( Critical Minerals Mission ) (एनसीएमएम) मंजुरी दिली आहे. यामध्ये सार्वजनिक उपक्रमांद्वारे १८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Fadanvis Government ) यांनी राज्यात ई-कॅबिनेट संकल्पना राबविण्याचा सुतोवाच केले. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी मंत्री आणि अधिकार्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. ई-कॅबिनेटसाठी आवश्यक ‘टॅब’ची हाताळणी, तसेच सॉफ्टवेअरबाबत आज मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात 'केबल कार' प्रकल्प राबविण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. येत्या ७ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे 'विकसित भारत २०४७' या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक होणार आहे.
(CM Devendra Fadnavis) महायुती सरकारच्या दि. २ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना राज्य सरकार ४ हजार ८४९ एकर जमीन परत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(Ashish Shelar) महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे विजयी आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून शपथबद्ध झालेले माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला आहे.
रेल्वेने जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील भारतातील पहिल्या सर्वाधिक उंच केबल-स्टेड रेल्वे ब्रिज अंजी खाड ब्रिजवर टॉवर वॅगनची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. ही यशस्वी चाचणी हा पूल पुढील वर्षी जानेवारीमध्ये काश्मीरला रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
नागपूर : ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही ते लोक पक्षाचे आणि संघटनेचे काम करणार आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, शुक्रवार, २० डिसेंबर रोजी आमदार विजय शिवतारे, नरेंद्र भोंडकर आणि प्रकाश सुर्वेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
(Chhagan Bhujbal) मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवले जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपण राज्यसभेवर जाणार नाही, असे भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. "आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारसंघातील मतदारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल", असं भुजबळ म्हणाले आहेत.
(Narendra Bhondekar) राज्याच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम दि. १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील राजभवन येथे पार पडला. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा तसेच पूर्व विदर्भाच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने मला मंत्रिपदाचं आश्वासन दिल्यानंतरही आता डावलल्याने शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप होत असून वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामाही देणार असल्याचे नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत.
नागपूर : आम्ही राज्यात एक सक्षम आणि मजबूत धर्मांतरविरोधी कायदा आणणार आहे, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) दिले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवार, १६ डिसेंबर रोजी ते पहिल्यांदाच विधान भवनात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
three cabinet ministersमहायुती सरकारच्या नविन मंत्रीमंडळात ठाणे जिल्ह्याला उपमुख्यमंत्रीपदासह तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह भाजपच्या गणेश नाईक यांच्याकडे आता ठाण्याच्या विकासाची धुरा सोपवली आहे. हे तिघेही दिग्गज नेते असल्याने ठाणे जिल्हयात नवनवे प्रकल्प आणि विकासाची कामे व्हावीत, अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, जिल्हयात ९ आमदार असलेला भाजप मोठा भाऊ असल्याने ना. गणेश नाईक यांच्यासमोर तळागाळात पक्षवाढीचे आव्हान असेल.
Mahayuti विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथविधी झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र आता त्याच मंत्रिमंडळात कोणाला स्थान देण्यात येणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच कोणाच्या वाट्याला काणते पद येणार? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच १५ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या विस्ता
Chandrashekhar Bawankule नागपूर राजभवन येथे दि : १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. काही दिवसांआधी ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. अशातच आता भाजपचे सदस्य आणि नवनिर्वाचित मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच शपथ घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात नागपूरातील राजभवन येथे दि : १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. काही दिवसांआधी ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. अशातच आता महायुतीच्या एकूण ३९ आमदरांनी मंत्रिपदाची शपथ घेत मंत्रिपदाचा विस्तार करण्याचा निर्णय हाती घेतला आहे.
मुंबई: मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि सन्मानार्थ लोढा यांनी रामनामाचा मफलर घालून संस्कृत भाषेतून शपथ घेतली.
Devendra Fadnavis 3.0 cabinet महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथ घेतली. त्याचसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत कारभार स्वीकारला आहे. यामध्ये जातीय सलोखा जपत कोणताही भेदभाव न करता मंत्रिपदे दिली आहेत.
मुंबई : तब्बल ३३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नागपूरच्या राजभवनात लगबग पहायला मिळाली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या ( Mahayuti ) 'मेगा' शपथविधीसोहळ्यात तब्बल ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
मुंबई : 'व्हिजनरी' नेता अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात ( Cabinet ) १९ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्वाधिक नऊ चेहरे हे भाजपमधील आहे.
Devendra Fadnavis 3.0 cabinet मध्ये एकूण २५ नवनिर्वाचितांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे आता महायुतीच्या देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात भाकरी फिरवली असे म्हणता येईल. कारण आता महायुतीतील एकूण २५ नवनिर्वाचित आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
मुंबई : नागपूरातील राजभवन येथे महायुतीच्या एकूण ३९ आमदारांचा शपथविधी १५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. नागपूर राजभवन येथे झालेल्या मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यामध्ये नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
( CM Devendra Fadnavis) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी वरिष्ठ नेतृत्वासोबत चर्चा करून तयार केली आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने देशभरात नागरी/संरक्षण क्षेत्रांतर्गत ८५ नवीन केंद्रीय विद्यालये उघडण्यास आणि विद्यमान शिवमोग्गा, जिल्हा शिवमोग्गाला कर्नाटकापर्यंत विस्तार करण्यास मान्यता दिली आहे. यात महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकींनंतर माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या विकासकामांचा उल्लेख केला.
नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करू असे सांगत जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याची ग्वाही महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर मंत्रालयातील विधिमंडळ आणि वार्ताहर कक्षात आयोजित महायुती सरकारच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईतील आझाद मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच देशभरातील दिग्गजांच्या मांदियाळीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला आहे. शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही मंत्रालय परिसरात दाखल झाले . मंत्रालयातील लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
"नवं सरकार हे धोरात्मक निर्णय घेणार आहे. नवं सरकार अधिक जोमानं आणि गतीनं काम करणार आहे. आमच्या कामाची दिशा बदणार नाही. दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही तातडीनं पाऊलं उचलणार आहोत. मी राज्यातील १४ कोटी जनतेला विश्वास देतो की हे सरकार पूर्णपणे पारदर्शी कारभार करेल", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. शपथविधीनंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : 'मातोश्री' म्हणजे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर ( Matoshree ) जमायचे. पण, बाळासाहेबांच्या पश्चात 'मातोश्री'चा रुतबा कमी झाला. 'मातोश्री'वरील राजकीय दरबाराची जागा 'किचन कॅबिनेट'ने घेतली. त्यांचेचे निर्णय पक्षात अंतिम ठरू लागले. संघटनात्मक पातळीवर कर्तृत्वशून्य असलेल्या शिलेदारांचा भरणा त्यात असल्यामुळे अधोगतीशिवाय काहीच हाती लागले नाही. विधानसभा निवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण. परंतु, विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर