पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली भारत अंतर्गत सुरक्षेत एका नव्या स्वदेशी स्वरूपात सक्षम झाला आहे. मागच्या ११ वर्षात मजबूत झालेली अंतर्गत सुरक्षा ही देशाच्या स्थिरतेचा कणा बनली आहे. एखाद्या देशाची अंतर्गत सुरक्षा केवळ दहशतवाद आणि हिंसाचाराशी लढण्यापुरती मर्यादित नाही, तर ती त्या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासावर देखील परिणाम करते.
Read More
(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आण
(Tahawwur Rana Extradiction) मुंबईतील २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अखेर अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात येत आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदिल दिल्यानंतर भारतीय पथक त्याला आणण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले होते. राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन जाणारे विशेष विमान दिल्लीतील पालम टेक्निकल विमानतळावर उतरले आहे. येथून तहव्वूर थेट एनआयएच्या मुख्यालयात नेले जाईल. एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रयागराज बॉम्बस्फोटात जुना कटरा बाजारात अलीकडेच बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. अशातच आता पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. त्यांची ओळख अब्दल्ला. मनजीत आणि अदनान अशी आहे. या संबंधित घटनेची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
Pakistan bomb blast पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये किमान ११ कामगार ठार झाले आहेत. तसेच ६ जण जखमी झाल्याचे गंभीर वृत्त समोर आले आहे. सरकारी अधिकाऱ्याने यासंबंधित माहिती शुक्रवारी दिली. अधिकारी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत आहेत. या प्रकरणात चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Umar Khalid दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या दंगलीच्या कटाशी संबंधित प्रकरणात दिल्लीच्या कड़कड़डूमा न्यायालयाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला एकूण ७ दिवसांसाठी अंतरिम जामीन देण्यात आला आहे. खालिद .याला त्याच्या चुलत भावाच्या निकाहाच्या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने हा जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले गेले आहे.
ISIS मुंबई येथे २००२- ०३ च्या साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणारा मास्टरमाईंड साकिब नाचनने ISIS ला दहशतवादी संघटना म्हणू नका अशी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आयएसआयचे भारताचे प्रमुख असलेले नाचन यांनी इस्लामिक स्टेट आणि इतर गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारी सरकारी अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.
पंजाब येथील लुधियानाच्या आदर्श पब्लिक स्कूल या शाळेस अज्ञात व्यक्तींकडून बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी शाळा व्यवस्थापनाला एका ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. ही घटना ५ ऑक्टोबरची असून ईमेलद्वारे सकाळी शाळेत बॉम्बस्फोट केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. मात्र धमकी देणारा दुसरा तिसरा कोणीही नसून आदर्श शाळेचा अल्पवयीन विद्यार्थी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचे कारण ऐकून थक्क व्हाल.
लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या शेवटच्या टप्प्यासाठी दि. १ जून रोजी मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मतदान आजच्या टप्प्यात नोंदवले गेले आहे. तर बिहार मात्र पिछाडीवर आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु आहे. टीएमसी कार्यकर्त्यांकडून मतदारांना धमकावण्याच्या आणि बॉम्बस्फोटाच्या घडवल्याच्या घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगालमधील जयनगर लोकसभा जागेवर मतदानाजदरम्यान टीएमसीच्या गुंडांनी केलेल्या दगडफेकी.त एएनआयच्या पत्रकाराला गंभीर दुखापत झाली. पत्
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी NIA (National Investigation Agency) सातत्याने छापे टाकत आहे. एनआयएने मंगळवार, दि. २१ मे २०२४ दक्षिण भारतातील ११ ठिकाणी छापे टाकले. दि. १ मार्च २०२४ रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये १० लोक जखमी झाले होते. या स्फोटाशी संबंधित मुख्य दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचा २०२४ चा तिसरा टप्पा पार पडला आहे. याशिवाय निवडणुकीचे ४ टप्पे बाकी आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर येथील भाजप नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याची माहिती काही वृत्तसंस्थानी दिली आहे. भाजपच्या या नेत्याकडे पक्षाचे पंचायत प्रमुख पद आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी सहा बॉम्ब पेरण्यात आले होते. यातील २ बॉम्बचे स्फोट झाले. दि. १० मे २०२४ रोजी मध्यरात्री ४ सक्रीय बॉम्ब जप्त करण्यात आले आणि ते निकामी करण्यात यश आले आहे.
२०१९ मध्ये, देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये थंडीचे वातावरण होते. जेव्हा जहाँजेब सामी आपली पत्नी हिना बशीर बेग हिच्यासह जम्मू काश्मीरमधून दिल्लीत स्थलांतरित झाला. मोदी सरकारने कलम ३७० कलम हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक फुटीरतावादी नेते नजरकैदेत असताना त्याच वर्षी दि. ६ ऑक्टोबर रोजी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर दोघेही दिल्लीला रवाना झाले. जहाँजेब सामी एका ब्रिटीश कंपनीत काम करत होता.
बिहारच्या बांका येथे बॉम्बस्फोट झाल्याची बातमी आहे. हे प्रकरण धोरैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बॉम्बस्फोटामुळे चार निष्पाप मुलेही गंभीर जखमी झाली आहेत. या सर्वांना गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता चौघांना भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे आणि भयाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. त्या घरातच बॉम्ब बनवला जात असल्याचे सांगण्यात आले.
कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पश्चिम बंगालमधून दोन संशयितांना अटक केली आहे. या स्फोटांचे मुख्य आरोपी अब्दुल मतीन ताहा आणि मुसविर हुसैन शाजेब हे दहशतवादी असल्याचं सांगण्यात येत आहे. एनआयए या दोघांची कसून चौकशी करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३५ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांनी भाजपला रोखण्यासाठी, ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला घडवून आणला का, हा प्रश्न आहे. हिंसाचाराला बळ देणारी, ममता बॅनर्जी यांची तालिबानी प्रवृत्तीच यामागे आहे. संदेशखाली प्रकरणातील शाहजहान शेख याला पाठीशी घालणार्या, ममता बॅनर्जी याच होत्या. आता बॉम्बस्फोटातील आरोपींची पाठराखण त्या करत असल्याचे दिसून येते.
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक केल्याचा दावा एनआयएने केला आहे. ३ राज्यांमध्ये १८ ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली. मुजम्मिल शरीफ असे अटक आरोपीचे नाव आहे. मुजम्मिलने स्फोटासाठी इतर आरोपींना संसाधने पुरवली होती. एनआयए सध्या या प्रकरणी मुसाव्वीर शाजेब हुसेन आणि अब्दुल मतीन ताहा यांचा शोध घेत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने बुधवारी, दि. २७ मार्च २०२४ या कारवाईची पुष्टी केली आहे.
बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा यंत्रणा एनआयए (NIA)ने या प्रकरणी स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याच्या सहाय्यकाला अटक केली आहे. त्याला कर्नाटकातूनच अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये दि. १ मार्च २०२४ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास करत असलेल्या एनआयएने संशयित शब्बीरला ताब्यात घेतले आहे. त्याला कर्नाटकातील बेल्लारी येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एनआयए त्याची कसून चौकशी करत आ
शुक्रवार, दि. १ मार्च रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील (Bomb Blast) आरोपींबाबत अधिक माहिती समोर येत आहे. या स्फोटाचा तपास आता एनआयएच्या हाती आहे. एनआयएने स्फोटातील संशयिताचा फोटो जारी करून बक्षीस जाहीर केले आहे. स्फोटातील संशयिताचे बस आणि कॅफेमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत.
बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, दि. ०१ मार्च रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोटासारखी धक्कादायक घटना घडली होती. या बॉम्बस्फोटात १० जण जखमी झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सदर प्रकरणात तपास सुरू केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका गावात मोहम्मद जावेदच्या घरातून पोलिसांनी ७ जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत. या भागात काही मोठी घटना घडवून आणण्याच्या योजनेचा भाग म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. येथे बॉम्ब कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आणले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय यात जावेदचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
नुकतेच दिवंगत झालेले ख्यातनाम उद्घोषक अमीन सायानी १९९८ साली मुंबईतील गावदेवी नगराच्या गुरुदक्षिणा समर्पण उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.रा. स्व. संघाच्या उत्सवांत बौद्धिक वर्गात किंवा अन्य कार्यक्रमांतही समाजातील प्रतिष्ठित, ख्यातनाम अशा व्यक्तींना बोलवण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. यात त्या व्यक्तींना संघाची कार्यपद्धती, शिस्त कार्यकर्त्यांचा परस्पर व्यवहार पाहायला मिळावा, असा हेतू असतो. अशा अनुभवांतून त्या व्यक्तींच्या मनात संघाबद्दल एक अनुकूल भावना निर्माण होते, काही पूर्वग्रह गैरसमज असतील,तर ते दू
न्यायालयाने श्रमजीवी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी बांगलादेशचा रहिवासी हिलालुद्दीन उर्फ हिलाल आणि बंगालचा रहिवासी नफीकुल बिस्वास या दोन्ही दोषी दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. दि. २८ जुलै २००५ रोजी (२००५ जौनपूर ट्रेन बॉम्बस्फोट) बॉम्बस्फोट प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश कुमार राय यांनी बुधवारी दुपारी ४.१५ वाजता दोन्ही दहशतवाद्यांना सजा सुनावली.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमला भारताने जोरदार झटका दिला आहे. केंद्र सरकारने नुकतेच दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारकडून वृत्तपत्रात जाहिरात ही देण्यात आली आहे. त्यानुसार दाऊदची रत्नागिरीतील संपत्तीचा लिलाव दि.५ जानेवारीला दुपारी २ ते २.३० यावेळेत होणार आहे. दाऊद हा रत्नागिरीतील खेड तालुक्यातील मुंबके गावचा रहिवाशी होता. या गावात त्याचा बंगला आणि आंब्याची बाग आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राईमचा शार्पशूटर ‘सलीम कुत्ता’ हा पेरोलवर तुरुंगाबाहेर असताना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने त्याच्यासोबत डान्स पार्टी झाडल्याची माहिती नितेश राणे यांनी विधानसभेत मांडल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.
छत्तीसगडमध्ये मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. मात्र, इथे मतदानाची सुरुवातच बॉम्बस्फोटाने झाली आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी ३ आयईडी स्फोट केले आहेत. यामध्ये सुरक्षा दलाचे तीन जवान आणि २ मतदान कर्मचारी जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मणिपूर पोलिसांच्या मदतीने मोहम्मद इस्लाउद्दीन खानला अटक केली. २१ जून २०२३ रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता भागात कार बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
'गदर २' च्या तिकिट आणि पार्किगवरून पाटण्यातील एका सिनेमा हॉलबाहेर गदारोळ झाला. एवढेच नाही तर पार्किंगजवळ बॉम्बस्फोटही झाले. मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांनी दोन बॉम्ब फेकल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी एकाचा स्फोट झाला. तसेच सिनेमा हॉलची मालकीण सुमन सिन्हा यांनी दावा केला आहे की, ' हल्लेखोरांनी तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकावले'.
मुंबई, पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी अज्ञातांकडून देण्यात आली होती. मात्र या अज्ञातास अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह, अंधेरी, कुर्ला भागात उद्या २४ जून २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली होती. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम 505 (1) (बी), 505 (2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये मंदिरात नमाज पठण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अन्वर असे आरोपीचे नाव आहे. मंदिरात नमाज अदा करत असताना अन्वरने गझवा-ए-हिंदचा नारा दिला आणि मंदिर उडवून देण्याची आणि मशीद बांधण्याची धमकी दिली, असा आरोपा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ही घटना दि. ९ जून रोजी घडली.
हशतवादाचे बदलते स्वरूप जागतिक पातळीवर दहशतवादाचे स्वरूप झपाट्याने बदललेले दिसते. आता केवळ बॉम्बस्फोट घडवून आणणे म्हणजे दहशतवाद इतका दहशतवाद हा मुद्दा सीमित नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्नाटकमधील चार आणि उत्तर प्रदेशातील दोन कार्यालये बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्या राज मोहम्मदला तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. त्याची पुढील चौकशी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाद्वारे (एटीएस) केली जाणार आहे.
१२ मार्च१९९३ साली झालेल्या देशद्रोही हल्ल्यात अनेक जणं शहीद झाले त्यात एक माझी आई होती, देशद्रोला संपवण्याचा आईच्या शवाचा कोळसा पाहून वयाच्या १३ व्या वर्षी निश्चय केला, तेव्हा लहान लवाह काय करावे कळत नव्हते, ती संतापाची आग रगारगात कायम रहावी ह्यासाठी आईच्या शरीराचा ज्या ठिकाणी कोळसा झाला त्या सेंच्यूरी बाजार येथे रात्री जाऊन उर्जा निर्माण करायचो तेव्हा त्या वयात आश्रू देखील गोठले पण देशद्रोहा विरोधातला संताप मात्र रात्र रात्र झोपून देत नव्हता
१९९२-९३ साली आपणच मुंबई वाचवल्याचे शिवसेनेचे म्हणणे असते. पण, आज त्याच प्रकरणाचा सुत्रधार कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधाच्या आरोपांवरुन कारवाई केलेल्या नवाब मलिकांच्या बचावासाठी सत्तेच्या लाचारीतून शिवसेनेने पुढाकार घेतल्याचे दिसते. म्हणजेच शिवसेनेला बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या शेकडो मुंबईकरांचे काहीही घेणेदेणे नाही, तर त्यांना आज नवाब मलिकच हवा आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून चौथ्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. याच क्रमाने, मध्य प्रदेश शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी (२० फेब्रुवारी २०२२) यूपीच्या देवरिया येथे सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना या काळातील औरंगजेब म्हटले आहे. जे वडिलांचे झाले नाही ते तुमचे कसे होतील, असे शिवराज म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अखिलेश यांनी वडीलांचा जेवढा अपमान केला आहे, तितका त्यांचा अपमान कोणीही केलेला नाही, असे स्वतः मुलायम सिंह यांनी एकदा सांगितले होते.
अहमदाबाद येथील बॉमस्फोटातील अतिरेकी समाजवादी पक्षाचा प्रचार करत असल्याचा घणाघाती आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखमापूर खेरी येथील प्रचार सभेत केला
२००८ साली मालेगावमध्ये धडलेल्या बाॅम्बस्फोट प्रकरणातील एका साक्षीदारने दावा केला आहे की, योगी आदित्यनाथ यांना खोटे ठरवण्यासाठी महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाने आपला छळ आणि बळजबरी केली होती. या प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केली आहे. कुमार म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) 'भगवा'ला दहशतवादाशी जोडण्याचा कट रचला.
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटात एका साक्षीदाराने केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे. योगी आदित्यनाथ आणि रा.स्व.संघातील नेत्यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघड झाला आहे.
ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल या दोघांशी केलेले आर्थिक व्यवहार आणि त्यांच्याकडून कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावात कशी खरेदी केली, याचे पुरावेच त्यांनी सादर केले.
इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. रविवारी टेलिग्राम चॅनेलवरील अमाक न्यूज एजन्सीच्या गटाने सांगितले की, शनिवारी जलालाबादमध्ये तालिबानच्या वाहनांवर तीन आणि रविवारीए एक हल्ला झाला. या सर्व घटनांमध्ये ३५ हून अधिक तालिबान मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.
मालेगाव स्फोटाबाबत माहिती नसल्याचे स्पष्टीकरण
पाकिस्तानातील लाहोर शहर बुधवारी शक्तिशाली स्फोटाने हादरले. येथील प्रसिद्ध सुफी दर्ग्याबाहेर स्फोट झाला. त्यात किमान नऊ जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले.
आपल्याकडे छद्मी पुरोगामी आपल्या सेक्युलरिझमचा खोटा बुरखा फाटू नये म्हणून ज्या प्रकारचे तर्क देत असतात, त्याच्या चिंध्या करणारी ही कृत्ये आहेत. श्रीलंकेत झालेला हा हल्ला काही पहिला नव्हे आणि शेवटचा नाही. उलट याला जोपर्यंत कठोर उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत अशी कृत्ये करणार्यांचे मनोबल वाढतच राहणार आहे. श्रीलंका त्याचा मुकाबला कसा करते ते पाहावे लागेल.
आत्मघाती बॉम्ब हल्ल्याने हादरलेल्या श्रीलंकेत पुन्हा एकदा स्फोटाचे आवाज ऐकू आल्याने साऱ्यांचा थरकाप उडाला आहे. राजधानी कोलंबोपासून ४० किमी दूर असलेल्या पुगोडाजवळ स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली आहे.
ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. आठ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली असून यात जवळपास १५० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका खासगी शाळेत बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात १० विद्यार्थी जखमी झाले आहेत.
ज्यांना इथल्या नागरिकांची काळजी नाही, त्यांना परदेशातून आलेल्या घुसखोरांबद्दल मात्र जिव्हाळा दाटून आल्याचेच दिसते.
बीजिंगमधील भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दूतावासाबाहेरच हा स्फोट झाला असून आतापर्यंत या स्फोटामध्ये कसल्याही प्रकारची जीवित्त वा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
बॉम्बस्फोटांमुळे होणारे मृत्यू, अशांतता यामुळे लोकांची ऑनलाईन शॉपिंगवर झुंबड वाढत आहे