विल्यम शेक्सपियर हा नाटककार प्रत्येक पिढीला नव्याने उलगडत जातो. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’पासून ते अगदी विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ या सिनेमापर्यंत, शेक्सपियरच्या लिखाणाची जादू लोकांना नव्याने अनुभवायला मिळते. प्रायोगिक रंगभूमीच्या विश्वात शेक्सपियरच्या लिखाणाचे नवनवीन अर्थ लावले जातात. मानवी वर्तनाचे विलक्षण पैलू शेक्सपियरच्या लिखाणात आपल्याला सापडतात. परंतु, याच शेक्सपियरचा वापर सांस्कृतिक वर्चस्ववाद प्रस्थापित करण्यासाठी, काही शतकांपूर्वी सुरू झाला होता. हाच सांस्कृतिक वर्चस्ववाद पुसण्यासाठी, शेक्सपियरच्या
Read More
( Sunita Williams returns after 9 months ) ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार बुच विल्मोर अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. दोन्ही अंतराळवीर बुधवार, दि. १९ मार्च रोजी पहाटे ३.२७ वाजता ‘स्पेसएक्स’च्या ‘ड्रॅगन कॅप्सूल’मधून परतले. निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील त्यांच्यासोबत होते. या चौघांचेही अमेरिकेतील फ्लोरिडाजवळील समुद्रात यशस्वी लॅण्डिंग झाले आहे. त्या ठिकाणावरून ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ टीमने त्यांना बाहेर काढले.
तब्बल ९ महिने अंतराळात राहिल्यालेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हानं असतील? त्यांची रिकव्हरी कशी होईल? या रिकव्हरीला किती वेळ लागेल? कसा झाला त्यांचा परतीचा प्रवास? लँडिंगच्या आधी लँडिंगच्या वेळी आणि लँडिंगनंतर नेमकं काय घडलं ?
पृथ्वीपासून दूर अंतराळात जवळपास नऊ महिने राहिल्यानंतर सुनीता विलियम्स अखेर पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांचा हा परतीचा प्रवास सुरु झालाय, त्यांची ही परतीची मोहिम नेमकी कशी असणार आहे?
Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून आता
जवळपास गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतणे पुन्हा एकदा लांबणीवर गेले आहे. त्यांना परत आणण्यासाठी नासानकडून मिशन क्रू -10 राबवण्यात येणार होते. बुधवारी हे क्रू -10 पाठवण्यात येणार होते. परंतू, तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले.
समाजात अगदी पूर्वापार सद्प्रवृत्ती विरुद्ध दुष्प्रवृत्तींचा संघर्ष अविरत सुरुच आहे. कालपरत्वे जरी या संघर्षाचे स्वरुप बदलले असले तरी सज्जन, दुर्जनांची विविध रुपे आजही अगदी सहज दृष्टिक्षेपास पडतात. पराकोटीची स्वकेंद्रीत ( Self Centered ) वृत्ती आणि नकारात्मकतेने भारलेल्या काही व्यक्ती, आपलेच खरे करण्याच्या नादात सज्ञान व्यक्तींनाही मूर्खात काढतात. आपले अज्ञान उघडे पडू नये, म्हणून शब्दच्छल, लपवालपवीचाही ते सोयीस्कर आधार घेतात. अशा या ‘संज्ञानात्मक विसंगती’विषयी..
केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
भारतामध्ये आढळणार्या काही पक्ष्यांची नावे ही ब्रिटिश सैन्यदलातील अधिकारी कर्नल साईक्सच्या नावावरुन देण्यात आली आहेत (Colonel William Henry Sykes). भारतीय पक्ष्यांवर अभ्यास करणार्या बर्याच ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञांपूर्वी आपल्याला कर्नल साईक्स यांचे भारतीय पक्षीसंशोधनामधील योगदान जाणून घेणे आवश्यक आहे (Colonel William Henry Sykes). असे का, तर कर्नल साईक्सने आपल्या पक्षीसंशोधनकार्यात जपलेले भारतीयत्व (Colonel William Henry Sykes).
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.
अमृत योजनेच्या कामात अनेक अडचणी आल्या. अमृत योजनेत डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्याचे काम केले गेले. टाक्यांच्या जागा निश्चित केल्या गेल्या नाहीत. ज्या जागा निश्चित केल्या होत्या. त्या जागा आपल्या ताब्यात नव्हत्या. पण आता समाधानकारक परिस्थिती दिसते आहे. लवकरच अमृत योजना कार्यान्वित होईल असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी अमृत योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामाच्या पाहणी दौरा दरम्यान केले.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि सहकारी विल्मोर गेल्या तीन महिन्यांपासून अंतराळात अडकलेले आहेत. नासाच्या अंतराळयानात बिघाड झाल्याने सुनीता विलियम्स अंतराळातून निवडणूक हक्क बजावणार आहे.
रस्त्यांवरील खड्डे भरण्यात कडोंमपा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा थेट इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे कडोंमपा आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
स्टार कॉलिनियर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण तीनदा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दि. ०५ जून रोजी स्टारलाईनर या स्पेसक्राफ्टमधून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून यान परत पृथ्वीच्या दिशेने परतताना तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यानात फक्त २७ दिवसांचे इंधन उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती आहे.
नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण पुन्हा एकदा रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टची अंतराळ मोहीत पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेद्वारे भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अंतराळात जाणार आहेत.
कल्याण: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता चिकनघर येथील मॅक्सी ग्राउंड येथे खेळ पैठणीचा या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या पृथ्वीतलावर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मृत्यू हा अटळ आहे. मृत्यूनंतर संपत्तीधारकाला त्याची संपत्ती, त्याला हवी त्या व्यक्तीलाच मिळावी, म्हणून जीवंतपणीच मृत्यूपत्र तयार करण्याचा सल्ला दिला जातो. वारसांमध्ये मयत व्यक्तीच्या संपत्तीवरुन वाद उद्भवू नये, संपत्ती सहज हस्तांतरित व्हावी, म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी, याचा आढावा घेणारा हा लेख...
केरळ राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांमी बुधवारी त्रिशूर येथील गुरुवायूर मंदिरात पूजा केली. त्याचवेळी त्यांनी कोचीमध्ये ४ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठादिनी घरोघऱी सद्भावनेचे दीप लावण्याचे आवाहनही केले.
आगरी समाजासह भूमिपूत्रांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार संवेदनशील आहे. भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील सर्वात उंच असलेल्या नेतिवली टेकडीवर संत सावळाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकासाठी सरकारकडून भरीव निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी येथे दिले.
तामिळनाडूत वैमानिकांना प्रशिक्षण देणारी पहिली व एकमेव संस्था उभारणारा कॅ. सचिन भाने आणि १२ लाख विद्यार्थ्यांमधून ४१ वा क्रमांक पटकावून सैन्यात अधिकारी होण्यासाठी `एनडीए'मध्ये दाखल झालेला श्रेयस शंकर भोईर, हे यंदाच्या आगरी महोत्सवातील खास आकर्षण ठरले आहेत . आगरी समाजाच्या सामान्य कुटुंबातील या दोघा तरुणांनी घेतलेली झेप तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
देशाला ‘परम वैभव’ मिळवून देण्यासाठी तेथे राहणार्या किंवा येऊन जाणार्या प्रत्येक व्यक्तीने पुण्यातील मोतीबाग संघकार्यालयाच्या जागेला मंत्राचे सामर्थ्य आणून दिले आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दि.१५ नोव्हेंबर २०२३ च्या रात्री न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करून भारताने क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांमुळे भारताने प्रथम फलंदाजी करत ३९७ धावा केल्या. एकेकाळी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांच्या खेळीमुळे न्यूझीलंड या धावसंख्येच्या जवळ जाईल असे वाटत होते. पण मोहम्मद शमी नावाच्या वादळाने न्यूझीलंडला २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यापासून रोखले.
जगभरात मंदीचे सावट असताना जागतिक व्यापारात याचा परिणाम दिसून आला. रशिया-युक्रेन युध्द असो की, इस्त्रायल-पॅलेस्टाईन युध्द असो याचा परिणाम जगाच्या आर्थिक व्यवहारांवरदेखील झाला. त्यामुळे काही देशांत महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. दरम्यान, भारतातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करतील, असा अंदाज विलिस टॉवर्स वॉटसन पब्लिक लिमिटेड या विमा सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने वर्तविला आहे.
जर तुम्हाला स्वतःला जगाबद्दल निराशावादी वाटत असेल, तर तुमच्या सभोवतालच्या शेजारपाजारच्या लोकांकडे एक नजर टाका, जे तुम्हाला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकतात. प्रेरणादायी लोकांच्या कथांवर लक्ष केंद्रित करा, जे खरंच महान गोष्टी करत आहेत आणि समाजासाठी शक्तिशाली योगदान देत आहेत.
इकडे फ्रान्स धगधगत असताना तिकडे डच अर्थात नेदरलॅण्ड सरकार कोसळल्याने जागतिक राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. नेदरलॅण्डचे पंतप्रधान मार्क रूट यांनी राजीनामा दिला. मार्क रूट यांचे सरकार हे आघाडी सरकार होते, स्थलांतर धोरणावर मित्रपक्षात मतभेद असल्याने रूट पंतप्रधान पदावरून पायउतार झाले. नेदरलॅण्डचे राजे विलेम अलेक्झांडर यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला असून, नवीन निवडणुका होईपर्यंत सर्व मंत्री काळजीवाहू मंत्रिमंडळ म्हणून कार्यरत राहणार आहे. रूट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चार मित्र पक्षां
पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट शून्य असला तरी सर्जिकल मायक्रो स्कोपच्या साहाय्याने त्यांच्या शरीरातील स्पर्म शोधून काढता येतो. याला मायक्रो टिसा असे संबोधले जाते. पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट शून्य असल्यास बहुतांश आयव्हीएफ सेंटर मध्ये ते दाताकडून घेतले जातात. मात्र मायक्रो टिसा या पध्दतीचा वापर करणारे आयव्हीएफ स्पेशालिस्ट डाॅक्टर महाराष्ट्रात केवळ दोनच आहे. अशा पध्दतीची उपचार आता डोंबिवलीत मिळणार असल्याने आई बाबा होता न येणाऱ्या दांपत्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. या पध्दतीचा वापर करून ३५ टक्के जोडप्यांना स्
‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’, असे जाणकार अनेकदा सांगतात. परंतु, परिस्थिती किंवा नाईलाजाने का होईना, अनेकांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. न्यायालयात एकदा का तुम्ही शिरलात की ती अलिबाबाची गुहा ठरते. त्यात तुम्ही आपल्या इच्छेने प्रवेश करतात. मात्र, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असल्यास तुम्हाला तुमचे वकील आणि न्यायालय यांच्या संमतीशिवाय बाहेर पडता येत नाही. त्यासोबतच तुम्हाला न्यायालयाच्या ‘तारीख पे तारीख’ आणि इंग्रजाळलेल्या किचकट भाषेचा सामना करावा लागतो. न्यायालयातील युक्तिवाद जरी स्थानिक भा
कल्याण डोंबिवलीत पुढील पावसाळ्य़ार्पयत जास्तीत जास्त रस्ते कॉक्रीटीकरणाचे होतील. एमआयडीसीमध्ये एकाच प्रभागात शंभर कोटींचा निधी दिला आहे. सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे. रस्त्याच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सहन देखील केले जाणार नाही. हे रस्ते सुस्थितीत तयार व्हावेत यासाठी अनेक वर्ष लोक वाट पाहत होते. आता ते रस्ते तयार होत आहेत, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
बृहन्मुंबई महानगर पालिकेने पवई तलावातील सायकल ट्रॅक संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष याचिका अखेर बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी मागे घेतली. सुनावणीच्या एक दिवस आधी ही याचिका मागे घेतली असली तरी हा बांधकामाधीन असलेला सायकल ट्रॅक पालिकेकडून कधी काढला जाणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पवई तलावातील 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक'चे काम थांबवून, तलाव परिसर तात्काळ पूर्ववत करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि. ६ मे रोजी महानगरपालिकेला दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 'सायकल ट्रॅक'चे काम थां
राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
न्यप्राणी बचाव व्यवस्थापन प्रणाली आणि राज्य सनियंत्रण प्रणाली या माध्यमातुन वनांचे शाश्वत व्यवस्थापन, संरक्षण, संवर्धन तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वन्यप्राणी बचाव व्यवस्थापन करणे सहज सुलभ व्हावे यादृष्टीने आयसीटी प्रकल्पाच्या माध्यमातुन विकसित करण्यात आलेल्या या दोन्ही प्रणाली अतिशय महत्वाच्या आहेत. या माध्यमातुन वनसंवर्धन व संरक्षण तसेच वन्यप्राणी संरक्षणाची प्रक्रिया अधिक गतीमान होईल असा विश्वास राज्याचे वन व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवा
हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी भारतीय ध्वज प्रदर्शित किंवा फडकवण्याचे आवाहन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदिनी हे आवाहन केले आहे. हर घर तिरंगा मोहीम ही भारत सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग आहे.
देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला. जागतिक स्तरावर सर्वोच्च मल्या जाणर्या या ९४व्या ऑस्कर पुरस्कारसोहळ्याच्या आनंदाच्या क्षणी एक अप्रिय घटना घडली
३१ मार्च हा International Transgender Day of Visibility. आजच्या दिवशी जगभरातील तृतीयपंथीयांवर होणाऱ्या भेदभावाबद्दल आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. ३१ मार्च २००९ रोजी पहिल्यांदा अमेरिकेत हा दिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर २०१४ पासून संपूर्ण जगात हा दिवस साजरा करण्यात येतो. समाजाने आखलेल्या एका विशिष्ट चौकटीतून बाहेर येत काहीतरी करण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी ही एक छोटीशी गोष्ट....
भडकलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली
स्वतःचा व्यवसाय सुरू करुन त्याला जागतिक पातळीवर यशस्वी करून दाखवणार्या श्वेता मॅकवान यांनी ‘शुभविधी’ ही कंपनी नावारुपाला आणली. तसेच, ‘स्त्री उद्योगवर्धिनी’ संघटनेची स्थापना करून उद्योजिकांना मार्गदर्शन करण्याचे कामही त्या करतात. तेव्हा, आज जागतिक महिला दिनानिमित्ताने या यशस्वितेच्या यशस्वी कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...
मल्याळम दिग्दर्शक अली अकबर आणि त्यांच्या पत्नीने इस्लामचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं रविवार, दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले. अंधेरीतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
डोंबिवलीतील 27 गावांतील भोपरगाव गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईने त्रस्त आहेत. याठिकाणाच्या अमृतयोजना रखडल्याने आणि एमआयडीसीमधील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली आहे. त्यावर प्रेशर वाढविले की पाईपलाईन फुटते त्यामुळे नागरिकांना पाणी येत नाही. दिवाळीला नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता त्यांना टॅकरने स्वखर्चाने पाणी देणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
कोरोना काळात बंद असलेला नाटयगृहाचा शनिवारी अखेर पडदा उघडणार आहे. मधला काही काळ वगळता आता तब्बल दोन वर्षीनी तिसरी घंटा ऐकू येणार आहे. महाराष्ट्रात नाटकाचा पहिला प्रयोग करण्याचा मान डोंबिवली शहराने पटकविला आहे.
१९९० मध्ये गाजलेल्या ‘टार्झन’ मालिकेत टार्झनची मुख्य भूमिका साकारली होती
कल्याण : कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विदयार्थ्यांची गुणवत्ताच वाढली नाही. त्यामुळे येत्या वर्षात विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे आवाहान शिक्षकांसमोर असणार आहे. येत्या वर्षात विदयार्थ्यांची गुणवत्ता न वाढल्यामुळे शिक्षकांसाठी पुढील वर्षी डोके दुखीच ठरणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
आंबिवली मोहने एन आर सी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिली जात नसल्याने एनआरसी कामगार संघर्ष समितीच्या वतीने गेल्या 16 दिवसापासून कंपनीसमोरच धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ते उद्या दुपारी एक वाजता या धरणे आंदोलनास भेट देणार आहे.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आरोपसत्राला सामोरे गेल्यानंतर गायब झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी गडावर जाणार आहेत. राठोड यांच्या घराबाहेर गाड्यांचा ताफा उभा ठेवण्यात आलेला आहे. इतके दिवस अक्षरशः गायब असणारे राठोड आज सबंध प्रकाराबाबत काय उत्तरं देतील, याकडे संपूर्ण महाराष्ट्रचं लक्ष लागून राहीलेलं आहे.
कोरोना काळात अनेकांना पन्नास हजारांपेक्षा जास्त वीजबिले आली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा खोटारेडपणा समोर आला आहे. सरकारचाच फ्यूज उडाला आहे. त्यांना जनता नक्की धडा शिकवेल अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्दयावर केली आहे.
आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला मजबूत करणे म्हणजे पर्यायाने आपल्या शरीरातील चैतन्यशक्तीला (डायनॅमिक एनर्जी) पोषण देणे होय. ‘डायनॅमिक एनर्जी’ ही आपल्या निसर्गातील मूळ ऊर्जास्रोताचाच एक भाग असल्यामुळे ही ऊर्जा प्रत्येकाच्या शरीरात शुद्ध स्वरुपात असते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ग’ प्रभाग अंतर्गत दत्तनगर येथील ‘संकल्पतीर्थ’ येथे स्थानिक नगरसेवक राजेश मोरे आणि नगरसेविका भारती मोरे यांच्या नगरसेवक निधीतून 150 फूट उंचीवर भारतीय तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे.
शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळावे या विषयाला प्राधन्य असून तो आमच्या यादीवर प्रथम आहे. निवृत्तीवेतन मिळण्यात जर अडवणूक होत असेल तर दूर करण्यासाठी शिक्षकसेना निश्चित पुढे येईल, असे मत शिक्षकसेना प्रांताध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केले.