गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शुक्रवार, १३ जून रोजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भेट दिली. यावेळी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवादही साधला.
Read More
पायलीपाडा (चिता कँप, ट्रॉम्बे) येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. भूमाफियांना कायमस्वरूपी धडा शिकवण्याचा इशारा देतानाच, राज्यातील सर्व शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांची माहिती सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नागपूरमध्ये ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारण्यात येणार असून त्यातून २ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
तुमचं मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करतो, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला. नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, ११ जून रोजी मंत्री संजय शिरसाट यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, ही भेट नेमकी कशासाठी आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. परंतू, बावनकुळे हे केवळ चहा घेण्यासाठी घरी आले असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, ११ जून रोजी संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दरम्यान, आता त्यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी कल्याण विभागाचा निधी कुणीही पळवू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तसेच जनसंवाद कार्यक्रमात बदल्याची निवेदने स्वीकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावरील घटना मन सुन्न करणारी आहे, असे म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून या घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राहुलजी, २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मतदारांची आकडेवारी जाहीर करून राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखावर बावनकुळेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढू शकत नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवर लिहिलेल्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्यभरात उबाठा गट आणि मनसेच्या यूतीच्या चर्चा सुरु असून आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारने जनतेला दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आम्हाला इतर गोष्टीत रस नाही, असे ते म्हणाले.
बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याने तस्करांना जेरबंद करा असे आदेश पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिल्याने जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत 238 गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, सुमारे 24 लाखांच्या मुद्देमालासह तस्करांनी टोळी जेरबंद करण्यात आली.
महसूल प्रशासन हे कोणत्याही राज्याच्या प्रशासकीय संरचनेतील एक अत्यंत संवेदनशील आणि मूलभूत अंग मानले जाते. ही यंत्रणा शासनाच्या लोकाभिमुखतेचे आणि पारदर्शकतेचे मूळ प्रतिबिंब आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, पारंपरिक चौकटींत अडकलेल्या या खात्याला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या कार्यपद्धतीत तांत्रिक सक्षमता, प्रशासनिक शिस्त आणि लोकहिताचा समतोल स्पष्टपणे दिसतो. त्यांनी धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून केवळ व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले नाही, तर त्यावर प्
उद्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागल्या तरी भाजप आणि महायूती तयार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोमवार, २ जून रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
पुढच्या काळात महाराष्ट्राचा महसूल विभाग हा देशातील क्रमांक एकचा विभाग ठरेल, असे काम आम्ही सुरु केले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोमवार, २ जून रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे हे ध्येय लोक कल्याणकारी राज्याच्या भुमिकेतून निश्चित केले आहे. या धोरणानुसार प्रत्येक मंडळनिहाय जागेची ज्या ठिकाणी उपलब्धता आहे त्या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करुन दिले जातील. याचबरोबर प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये जी घरे पाण्याखाली जातात अशा घरांचे विस्थापन करुन देण्याबाबत आम्ही विचार करत असून याबाबत लवकरच एक धोरणात्मक निर्णय जाहीर करु असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आता त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? त्यांच्याकडून पैसे परत घेणार का? यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, ३१ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिल्या जात आहे. नागपूर मधील विविध शासकीय रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वैद्यकीय सुविधांचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून शासकीय दंत रुग्णालयातील ही अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाची अर्थात मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची राज्यातील पहिली उपलब्धी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्याना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवार, २४ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
Minister Chandrashekhar Bawankule instructions to submit a complete proposal regarding the entries in the Satbara records
जन्म नोंदणी प्रमाणपत्र देताना प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी) अवलंब केला जावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. २२ मे रोजी दिले. त्यामुळे रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला लगाम लागणार आहे.
कोराडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या प्रकल्पांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी अनियमितता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा आज बैठकीत दिला.
राज्याच्या महसूल विभागाने हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली असून आता केवळ २०० रुपये शुल्कात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
स्थानिक पातळीवर लोकांचे प्रश्न संबंधित कार्यालयाद्वारे तात्काळ मार्गी लागलेच पाहिजेत. त्यात दिरंगाई होता काम नये, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार, १८ मे रोजी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने नियोजन भवन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय राऊतांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे नाव बदलून 'नरकातला राऊत' असे ठेवायला हवे, असा खोचक सल्ला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. लवकरच संजय राऊतांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून त्याआधीच यावरून प्रचंड गदारोळ सुरु आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून शासनाने पीककर्ज योजना सुरु केली. पात्र शेतकऱ्यांनी याचा अत्यंत मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. जे शेतकरी घेतलेल्या पीककर्जाची वेळेत परतफेड करु शकले नाहीत त्यांनी ओटीएस समझोता अंतर्गत कर्जाची रक्कम फेडली. ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करुनही ज्या बँकांनी त्यांना पीककर्ज दिले नाही त्या बॅकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
( inspection of Nagpur mining areas Minister Bawankule ) नागपूर जिल्ह्यातील खदानी तसेच खाण पट्ट्यात घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “मी स्वतः खाणपट्ट्यांची तपासणी करेन आणि अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करेन,” असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मंत्रालयात आयोजित बैठकीत सुरगाव येथील ३४४ एकर शासकीय जागेचा उपयोग आणि खाणपट्ट्यांबाबत चर्चा झाली. आमदार राजू पारवे यावेळी उपस्थित होते.
भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
( minister bawankule on Nagpur health services ) नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पदमान्यता, नवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जुन्या दवाखान्यांचे श्रेणीवर्धन करणे आवश्यक होते. असे अनेक निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले. तर कामठी येथे शंभर खाट्यांच्या रुग्णालयासाठी सहा एकर जमीन उपलब्ध करुन देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
आदिवासी समाज हा आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी झगडत आहे. त्याचे जीवनमान स्थिर नाही. त्यासाठी त्यांना जमीनीची मोजणी करुन आणि नकाशा तयार करुन देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच जमीन मोजण्याबाबत काही आर्थिक आणि तांत्रिक धोरण तयार करता येईल का याबाबत जमाबंदी आयुक्तांकडून माहिती घ्यावी. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरित्या पोहचाव्यात यासाठी ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. यात डिजीटल सेवांचा अंतर्भाव असल्याने शेतकऱ्यांना तेवढ्याच पारदर्शकपणे योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असलेल्या या योजनेंतर्गत येत्या 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी. या कामात टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीयस्तरावरील जबाबदार कर्मच
( Minister Bawankule on Nagpur Vidhan Bhavan ) नागपूर येथील शासकीय मुद्रणालयाच्या तसेच शहर पुरवठा कार्यालयाच्या काही जागा नागपूर विधानसभेच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असून, या जागांचे हस्तांतरण करावे. दोन्ही कार्यालयांनी पर्यायी जागा शोधून प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने त्याला अंतिम स्वरूप मिळेल. असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधीत होत आहेत. सुमारे ३० हेक्टर जागा संपादन करावयाची असून यामध्ये जे बाधीत होतील त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक आयोजित करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. ७ मे रोजी दिले.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून आपण सारे याच क्षणाची वाट पाहत होतो. हा निर्णय लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार देण्याऐवजी, त्यांना जो मोबदला अपेक्षित आहे, त्यासह आपण आपल्या मागण्या सरकारकडे सात दिवसांत मांडण्याचे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते म्हणाले, कोणत्याही स्वरूपाचा अन्याय सरकार शेतकऱ्यांवर करणार नाही. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना तसेच, भागातील तरुणांचे हाताला काम मिळेल."
राज्यात “वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन” ही योजना अंमलात आणण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात कुठल्याही उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे. राज्यभरातील नागरिकांना ही योजना दिलासा देणारी ठरणार आहे. यापुढे एकाच जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार असल्यामुळे वेळ आणि कागदपत्रांचा त्रास टळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवून, त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी ‘जिवंत ७/१२ मोहीम – टप्पा २’ सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे आदरणीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का? असा सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बावनकुळेंनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत विरोधकांना सवाल केला.
जातनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असल्याने प्रदेश भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी केली.
आजचा दिवस ऐतिहासिक असून जातिनिहाय जनगणनेमुळे सामाजिक असमतोल दूर होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, ३० एप्रिल रोजी दिली. केंद्र सरकारने आगामी जनगणनेमध्येच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सगळीकडे स्वागत होत आहे.
व्यक्तीने कितीही मोठ्या पदावर असले तरी असंवेदनशील बोलू नये. पण विजय वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि देशातील जनतेला दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना सुनावले आहे.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
देशावरील भयाण संकटावेळी देशातील नागरिकांच्या पाठीशी उभे न राहता पाकिस्तानी दहशतवाद्यांना खुश करण्यासाठी काँग्रेसचा छुपा अजेंडा दिसतो, असा घणाघात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २९ एप्रिल रोजी केला.
काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? असा संतप्त सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादाला कोणतीही जात, धर्म नसतो. दहशतवाद्यांना लोकांकडे जाऊन त्यांच्या कानात त्यांचा धर्म कोणता आहे, हे विचारण्यासाठी वेळ असतो का? असे वादग्रस्त विधान केले होते. यावर आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले.
आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शरद पवारांनी मतांच्या लांगूलचालनासाठी राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. पहलगाम येथील हल्ल्यावर शरद पवारांनी केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
हिंगणा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा दणका बसला आहे. शनिवार, २६ एप्रिल रोजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पहलगाममधील घटनेनंतर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस आहेत. यात जो कुणी राजकारण करेल ते त्यांना लखलाभ आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिले आहे.
शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी घेतला.