नवी दिल्ली : बशर अल-असाद सरकारला बंडखोर सैन्याने पदच्युत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने सीरियातून ( Syria ) ७५ भारतीय नागरिकांना बाहेर काढले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली आहे.
Read More
बशर अल असद यांची एकहाती राजवट संपुष्टात आली असून, सीरियाचे पुढे काय होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पण, प्रश्न केवळ सीरियापुरता मर्यादित नसून संपूर्ण मध्य-पूर्वेत याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यानिमित्ताने सीरियातील संकटाचे परिणाम आणि भवितव्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
दमास्कस : सीरियात ( Syria ) बंडखोरांनी सत्तापालट केला आहे. अध्यक्ष बशर अल-असद कुटुंबाची ५० वर्षांची हुकुमशाही राजवट आता संपुष्टात आल्याची घोषणा खुद्द सीरियाच्या लष्करप्रमुखांनी केली आहे. बंडखोर आता राजधानी दमास्कसपर्यंत पोहोचले असून राष्ट्राध्यक्ष असद यांनीही दमास्कसमधून पळ काढला आहे.
सीरियामध्ये बशर अल असद यांची राजवट वाचवण्यासाठी इराण आणि रशिया कोणत्याही थराला जातील. दुसरीकडे ‘हयात अल तहरीर’ला यश मिळावे, म्हणून तुर्की प्रयत्नशील असून यात पाश्चिमात्य देशही मदत करु शकतात. गेल्या १४ वर्षांच्या यादवी युद्धामध्ये सीरिया होरपळला असला, तरी बशर अल असद स्वतःची खुर्ची सोडण्याची शक्यता तशी कमीच.
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून संपूर्ण जगाने सीरिया, लेबेनॉन आणि आफ्रिकेतील देशांमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. जागतिक राजकारणात खासकरून पाश्चिमात्य देश आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधाला धक्का लागताच मानवाधिकाराच्या नावाखाली युद्धात उतरतात.
इसिसचा उधळलेला वारू कोबानमध्ये नुसता रोखला गेला असे नाही, तर या पराभवामुळे इसिसला जोरदार झटका बसला. इसिसचा पराभव करता येऊ शकतो हा आत्मविश्वास इसिसविरोधकांना मिळाला.