नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या गणेशपेठ बसस्टॅंडजवळच्या द्वारकामाई हॉटेलमध्ये ( Hotel ) बॉम्ब ठेवल्याची धमकी वजा सूचना दि. ९ डिसेंबर रोजी ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली. या बातमीने नागपूरात खळबळ उडाली. पोलिसांसह बीडीडीएस पथक आणि अग्निशमन दलदेखील घटनास्थळी तपास करीत आहेत.
Read More
मुंबई पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात म्हाडाला २५०० घरे म्हाडा बांधेल. या २५०० घरांच्या उभारणीसाठी नुकत्याच निविदा अंतिम करून राज्य सरकाराला पाठविण्यात आल्या. या निविदांना राज्य सरकारने मंजुरी दिली अजून येत्या २ दिवसात पत्रा चाळीतील घरांचे काम सुरु होईल. या इमारती उंच असल्याने या बांधण्यासाठी साधारण अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. २०२४मध्ये हे काम सुरु होऊन २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
नायगाव (दादर) येथील BDD चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकल्पाला त्यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले होते. आव्हाड यांच्या निर्णयावर विद्यमान सरकारने फुली मारली आहे.
(BDD Chawl) नायगाव (दादर) येथील बीडीडी चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी महायुती सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकल्पाला त्यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले होते. आव्हाड यांच्या निर्णयावर विद्यमान सरकारने फुली मारली आहे.
राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याच कामाची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. चाळीचं काम सुरू असलेल्या ठिकाणची राज ठाकरेंनी पाहणी केली. चाळीतील स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या घेऊन अनेकदा बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि व्यापारी राज ठाकरे यांच्या भेटीला येत होते.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये चाळीत वास्तव्यास असलेल्या पात्र पोलिस कर्मचारी गाळेधारकांना वितरित करावयाच्या ११३३ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली.
मुंबई : तब्बल तीन दशकांपासून प्रलंबित असलेला बीडीडी चाळीतील स्टॉलधारकांचा प्रश्न फडणवीस-शिंदे सरकारने मार्गी लावल्याने येथील रहिवाशांनी शासनाचे आभार मानले आहेत, तसेच या प्रश्नाची ठळकपणे दखल घेणारे वृत्त शुक्रवार, दि. ३० जून रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानिमित्त स्टॉलधाकरकांनी आभार मानत वरळीतील अनेक चौकात त्या आशयाचे भव्य फलक लावले आहेत.
महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेला कारभार आणि त्यात मुंबईकरांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे मुंबईकरांचा ठाकरेंवर असलेला रोष कायम आहे. मुंबईतील २०७ बीडीडी चाळींमधीलस्टॉल धारकांना पुनर्विकासात सहभागी करून घेण्यात ठाकरे सरकारने टाळाटाळ केलेल्या टाळाटाळीमुळे बीडीडीवासियांमध्ये सरकारप्रती मोठी नाराजी होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळात बीडीडी चाळीतील स्टॉल धारकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरेंना फडणवीसांनी आपल्या कामातून प्रत्युत्तर दिले आहे. बीडीडी चाळी
मुंबई(ओंकार देशमुख) : मविआ सरकारच्या कार्यकाळात ‘बेस्ट मुख्यमंत्री’म्हणून गौरवून घेतलेले उद्धव ठाकरे यांना आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात जनसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात असलेलीनाराजी अनेकदा उफाळून आली आहे. त्याचा प्रत्यय ‘बीडीडी’ चाळधारकांनाही आला आहे. मुंबईतील २०७ ‘बीडीडी’ चाळींमधील स्टॉलधारकांना पुनर्विकासात सहभागी करून घेण्याबाबत ठाकरे यांच्या सरकारने उदासिनता दाखवली. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बीडीडी’ चाळीतील अन्यायग्रस्त स्टॉलधारक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. खारघर दुर्घटनेबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, "तो एक अपघात होता. त्याच राजकारण करु नये. अपघाताचं काय राजकारण करायचं? तसंच म्हटलं तर मग कोरोनामध्ये किती माणसं गेली. त्या प्रकरणातसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल."
ठाकरे सरकारमुळे ४ हजार कोटींचा भुर्दंड!
आम्ही वरळीच्या याच ‘बीडीडी’ चाळींमध्ये मागील किमान ५० वर्षांपासून अधिवासास आहोत. मुळात ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्वसन आणि पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिक आधीच त्रस्त आहेत, तर दुसरीकडे या चाळीतील इमारतींच्या अंतर्गत वाहतुकीसाठी बनविण्यात आलेल्या रस्त्यांची इतकी वाईट अवस्था झाली आहे की, त्यातून चालणे तर सोडा,
शिवडी येथील ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या जागेवरील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासासाठीच्या प्रकल्पाबाबत शिवसेनेने आरोप केल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.
नायगाव ‘बीडीडी’ चाळीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर असे नामांतर करण्यात येणार आहे. या नावाला स्थानिकांकडून प्रचंड विरोध असतानाही राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
घरं हवी असतील तर पन्नास लाख भरा, अशी भाषा करायची. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांनी बरबटलेल्या या सरकारला ५० लाख रक्कम ही फारच क्षुल्लक वाटत असावी, परंतू, ज्या पोलीसांनी आपली संपूर्ण आयुष्याची कारकिर्द आपल्या संरक्षणासाठी अर्पण केली, त्यांच्यासाठी ही रक्कम न परवडणारी आहे. त्यामुळे या विठ्ठलाचा खरा सन्मान करायचा असेल तर त्यांना आहे त्याच ठिकाणी मोफत घरे द्या अन्यथा आम्ही सरकार म्हणून पोलीसांनी दिलेल्या सेवेची परतफेड करण्यासाठी अकार्यक्षम आहोत, हे मान्य करा.
मुंबई बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पोलिसांना ५० लाख रुपयांत ही घरे मिळतील असा निर्णय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच जाहीर केला.
“कोरोनाकाळात याच पोलिसांना विठ्ठलाची उपमा दिलीत. हा विठ्ठल कसा राहतो, कोणत्या घरात राहतो, याची दखल घेतली का, शासकीय निवासस्थान कसे असतात, याची दखल कोणी घेतली का? मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “कोणत्याही न्यायालयात जा, तुम्हाला तुमची घरे कधीच मिळणार नाहीत. कायद्याचा विचार न करता अशी विधान तुम्ही कशी करता,” असा प्रश्न ‘बीडीडी’ चाळीतील पोलीस पत्नी साक्षी सावंत यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना केला आहे.
“ ‘बीडीडी’ चाळीतील पोलिसांना ५० लाख रुपयांत घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा पाच हजार भाजप कार्यकर्त्यांना घेऊन भाजप ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घुसल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराच भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
वरळी बीडीडी चाळ पूर्नविकासाच्या मुद्द्यावर पार पडलेल्या बैठकीत निवृत्त पोलीसांना मोफत घरे मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. या भागात पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने राहतात. त्या बैठकीत निवृत्त पोलिसांना बीडीडी चाळीत मोफत घरे मिळणार नाहीत, असे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईतील बीडीडी चाळींच्या नामकरणाची घोषणा गृहनिर्माणमंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आता स्थानिकांकडून जोरदार विरोध होताना दिसतो आहे. नायगाव बीडीडी चाळी, वरळी बीडीडी चाळी आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील नागरिकांशी आणि काही संघटनांशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संवाद साधला असता नागरिकांनी नामकरणाच्या निर्णयाला जाहीर विरोध दर्शविला.
"आम्ही पण चाळीतूनच आलो आहोत. कोणाचीही फसवणूक होणार नाही. काही लोक या प्रकल्पात आडकाढी आणत असतील तर ते खपवुन घेतले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. यापुर्वी २८१ कुटुंब स्थानांतरीत झाले आहेत तर ६८ लोकांनी ॲग्रीमेंट करून घर सोडले नाही, या लोकांनी सहकार्य करावे असे डॉ.आव्हाड यांनी आवाहन केले आहे. आव्हाड पुढे म्हणाले, इथे काय काम चालू आहे ते बघायला आलो आहे. इथल्या रहिवाशांना जुन्या १८० चौ.फु च्या घरातून पाचशे चौ.फु घरात जायला मिळणार आहे. पक्के आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत. पुढची पिढी चांगल्या वातावरणात वाढ
मुंबईच्या सोनेरी इतिहासातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, आव्हाड यांच्या या घोषणेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. बीडीडी चाळींतील डिलाईल रोड भागातील इमारतींना राज्यसभा खासदार आणि (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार नगर’ नाव देण्याचे आव्हाड यांनी विधानसभेत जाहीर केले आहे.
निवडणूक आली की अनेक घोषणा केल्या जातात नंतर विसरून जातात असे महाविकास आघाडी सरकार नाही. केवळ घोषणा करणारे नव्हे तर काम करून दाखवणारे महाविकास आघाडीचं शासन आहे. मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले
वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच गोरेगाव येथील पुर्नविकास होत असलेल्या पत्रा चाळीला यापुढे सिद्धार्थनगर नावाने ओळखले जाईल असेही आव्हाड यांनी जाहीर केले.
मुंबईतील सर्वाधिक चर्चित प्रकल्पांपैकी एक असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. लोअर परेलच्या डिलाईल रोड भागातील बीडीडी चाळ रहिवासी आणि पोलीस प्रशासनामध्ये बुधवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी कडवा संघर्ष झाल्याचे दिसून आले.
मुंबईतील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वरळी मतदारसंघातील ना. म. जोशी मार्गावरील इमारतींमधील नागरिकांनी पुनर्विकासातील त्रुटी आणि इतर बाबींवरून प्रशासनाला खडे बोल सुनावत राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे. “जर प्रशासनाला पुनर्विकास प्रक्रिया राबविताना आमच्याशी संपर्क साधायचा नसेल किंवा आम्हाला विश्वासात घ्यायचे नसेल, तर ठाकरे सरकारने आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया बीडीडी च
प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी सचिन वाझे यास अटक करण्यात आली होती. या बाबतीत आता एटीएसकडून नवीन माहिती हाती लागली आहे. स्कॉर्पिओ गाडीचा तपास करताना सचिन वाझे बॉम्ब निकामी करणारे पथक (बीडीडीएस) पोहोचण्या आधीच घटनास्थळी पोहोचला होते. या तपासात हस्तक्षेप झाल्याचा दावा एटीएसने केला आहे. याबाबत बीडीडीएस कडून रिपोर्टमध्ये स्पष्टीकरण देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
स्थानिकांकडून काम बंद करण्याचे प्रयत्न ; कामाला विरोध नाही ; पण स्थानिकांना विश्वासात घ्या
भाजप नेते नितेश राणे यांनी केली राज्य सरकारवर टीका
वरळीच्या कामगार वसाहतीतील बीडीडी चाळ परिसरात झालेल्या स्फोटातील तिसऱ्या रुग्ण विद्या पुरी (वय २५ वर्षे) यांचा सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.
बीडीडी चाळ रहिवसीयांना पुनर्विकासाठी करारपत्र कायदेशीर सुरक्षित करण्यात यावे. किमान 17 ते 25 लाखांचा कॉर्पस फंडची तरतूद करण्यात यावी आणि लेआऊट याबाबत च्या रहीवासीयांच्या मागणीची पूर्तता करण्याची सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
कट्ट्याबाबत पालिका प्रशासनाची नोटीस ; महापालिकेच्या भूमिकेवर नागरिकांची नाराजी
प्रकल्पाला विरोध नाही, मागण्या मान्य करा ; बिगरराजकीय समितीची मागणी
प्रकल्पाला होत आलेला विलंब आणि मुद्रांक शुल्काची रक्कम यामुळे हा प्रकल्प राबविणे म्हाडाला कठीण होणार होते. त्यामुळे म्हाडाने मुद्रांक शुल्क एक हजार रुपये करण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महसूल व वन विभागाने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमनुसार घेण्यात येणारे मुद्रांक शुल्क एक हजार निश्चित केले आहे. याबाबत राज्यपालांच्या आदेशानुसारचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे तिन्ही बीडीडी चाळीतील रहिवाशांसोब
महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत
धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. जवळपास २०० हेक्टरहून अधिक जागेत पसरलेल्या या अवाढव्य झोपडपट्टीत सुमारे ७ लाखांच्या आसपास लोकसंख्या वसली आहे
गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी चाळीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाठी आवश्यक असणारी निविदा सादर करण्यामध्ये टाटा कंपनी अग्रेसर ठरली आहे.