विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या ६८ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने काल सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.
Read More
एन्व्हायरोकेअर लॅब्समार्फत देण्यात येणाऱ्या एन्व्हायरोकेअर ग्रीन अवॉर्ड्स (EGA) या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एनव्हायरो केअर लॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निलेश अम्रितकर यांनी ही माहिती दिली. करण्यात आली असून यासाठी जगभरातील पर्यावरण प्रेमींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( Kamgar Bhushan and Vishwakarma Qualified Worker Awards ) कामगारांच्या मेहनतीमुळेच महाराष्ट्राचा विकास शक्य झाला आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या दिशेने वाटचाल करीत असताना आणि एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा ध्यास घेतलेला असताना या स्वप्नपूर्तीत कामगारांचा वाटा केवळ गरजेचा नाही तर अनिवार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
(Maharashtra State Film Awards)महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सिनेक्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान केला जातो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
( Two MMRDA projects win prestigious awards ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए)च्या दोन प्रकल्पांना नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड्स २०२५ ’मध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १५९व्या प्राधिकरण बैठकीत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत प्रदान केले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या 'गुढीपाडवा' या आपल्या हिंदू नववर्ष दिवसाचे औचित्य साधत, 'शेलार मामा फाउंडेशन' आयोजित 'चिरायू' हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्याच्या उत्सवांचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला. यंदाचं हे १८ वर्ष असून ९०च्या दशकातील ज्येष्ठ कलाकारांनी 'चिरायू' ची मुहूर्तमेढ रोवली होती. कालांतराने खंडित झालेल्या या परंपरेला पुन्हा एकदा झळाळी आणली ती म्हणजे लोकप्रिय कलाकार सुशांत अरुण शेलार यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २००६ पासून 'शेलार मामा फाउंडेशन'द्वारा आयोजित 'चिरा
'झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन रितेश देशमुख आणि अमेय वाघ करत आहेत. कार्यक्रमातील एका खास क्षणी संपूर्ण वातावरण भावनिक झालं, जेव्हा अभिनेता जितेंद्र जोशीने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लिहिलेलं एक पत्र रितेशसमोर वाचून दाखवलं.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली. विविध क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान देऊन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार्या अनेक दिग्गजांचा, दरवर्षी ‘पद्म’ पुरस्काराने सन्मान केला जातो. कला आणि साहित्य या क्षेत्रांत मोलाची कामगिरी करून, यावर्षी ‘पद्मविभूषण’ पुरस्काराला ( Padma Vibhushan Award ) गवसणी घालणार्या या चार दिग्गजांचा हा अल्पपरिचय..
(60th State Marathi Film Awards) ६०व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीकरिता अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी याबाबत माहिती दिली.
: क्रिडाक्षेत्रात भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरास्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय भारतीय पुरूष हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह यांना सुद्धा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टी धोक्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये अनेक कलाकारांची घरं असून मोठ्या संख्येने ती जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले असून तेथे आणीबाणी जाहिर करण्यात आली आहेलॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या आगीचा फटका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही बसला असून १७ जानेवारी २०२५ रोजी होणारा नामांकनाचा सोहळा पुढे
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल गावाचे सरपंच रविंद्र माने यांचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थाकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले.
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. त्यांची लव्हस्टोरी सर्वांना माहिच आहेच. पण नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि यावेळी उमेशने आजवर कधीही न सांगितलेला मजेशीर किस्सा २५ वर्षांनी पहिल्यांदाच सांगितला. नक्की लव्हस्टोरीचा तो खास किस्सा कोणता आहे जाणून घेऊयात..
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्त आला आहे. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मिडियाद्वारी ही घोषणा केली आहे. मनोरंजन विश्वासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तसेच, सचिन सुर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वारसा' या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मराठी मनोरंजनसृष्टीतील मानाचा मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर (Filmfare Marathi Awards 2024) पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात कोणते चित्रपट बाजी मारणार आणि कोण सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Marathi Awards 2024) ‘आत्मपॅम्फलेट’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पटकावला असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार आशिष बेंडे यांनी मिळवला आहे.
‘चौक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणाऱ्या देवेंद्र गायकवाड यांना फिल्मफेअर पुरस्कार २०२४ मिळाला आहे. पहिल्याच दिग्दर्शकीय पदार्पणात पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा मित्र आणि लेखक-दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Pravin tarade) यांनी मित्रासाठी खास पोस्ट केली आहे.
कोकणी भाषेसाठी सुनेत्रा जोग यांना त्यांच्या ’अस्ताव्यस्त बायलो’ या पुस्तकासाठी पुरस्कार प्राप्त झाला. ‘साहित्य अकादमी’चे २०२३ सालचे अनुवादासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यात गोव्यातील स्थानिक भाषेत लिहिलेले पुस्तक म्हणून त्यांची निवड झाले. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
नुकताच ’ब्राह्मोस एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा’ या अभय सदावर्ते यांच्या अनुवादित पुस्तकाला ’साहित्य अकादमी’चा २०२३ सालचा ’उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार’ जाहीर झाला. मराठी भाषेसाठी मिळालेला हा पुरस्कार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
काही दिवसांपुर्वी ९६वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता. यात जरी भारतीय चित्रपटांना एकही पुरस्कार मिळाला नसला तरी नुकत्याच संपन्न झालेल्या 'क्रिटिक्स चॉईस पुरस्कार २०२४' (Critics Choice Awards) सोहळ्यात भारतीय चित्रपटांनी यशस्वी बाजी (Critics Choice Awards) मारली आहे. विधू विनोद चोप्रा यांच्या ‘बारावी फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रात मेस्सी याला मिळाला आहे.
झी गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav) सोहळा प्रत्येक कलाकारांसाठी मानाचा पुरस्कार सोहळा आहे. ५ मार्च रोजी झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या आणि प्रेक्षकांची मने जिकंणाऱ्या कलाकारांना पुरस्काराच्या स्वरुपात त्यांच्या कामाची पोचपावती मिळते. यंदाच्या झी चित्र गौरव (Zee Chitra Gaurav) पुरस्काराचे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. साधारणत: सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एक किंवा दोन जणांमध्ये विभागून दिला जातो. पण यावेळी हा पुरस्कार (Zee Chitra Gaurav) एक दोन नव्
मराठी चित्रपटसृष्टीत बॅक डान्सर म्हणून करत कालांतराने मराठी चित्रपटांचा एक सोज्वळ चेहरा झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाईक. ७० च्या दशकापासून एकाहून एक दर्जेदार भूमिका प्रेक्षकांना बहाल करणाऱ्या उषा नाईक (Usha Naik) यांना नुकताच महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेले अनेक वर्ष चित्रपटसृष्टीला दिल्यानंतर मराठी कलाकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांबद्दल उषा नाईक (Usha Naik) यांनी महत्वाचे विधान केले आहे. उषा नाईक यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० फेब्रवारी रोजी मुंबईत संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात वर्षभर काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या अभिनयाची पोचपावती मिळाली. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात किंग खान शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर, अभिनेता बॉबी देओल आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना ‘अॅनिमल’ चित्रपटासाठी गौरवण्यात आले.
'' मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार २०२४' या कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्सची निवड करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विशेष विशेष समारंभात तसेच सिनेक्षेत्रातील प्रथितयश अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते दिनांक १० फेब्रुवारीला टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्या
जागतिक पातळीवरील ग्रॅमी पुरस्कार मिळणे म्हणजे प्रत्येक कलावंताला त्याने आजवर केलेल्या कामगिरीला योग्य गौरव जगाच्या पाठीवर मिळाला हे सिद्ध करते. आजवर ग्रॅमी पुरस्कारावर भारतीय कलाकारांनी आपल्या नावावर केले आहेत. यंदाही हा बहुमान भारताला मिळाला आहे. प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या धीस मुवमेंट अल्बमचा ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. याशिवाय जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांनी आपल्या नावावर ३ ग्रॅमी पुरस्कार कोरले आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि मानाचा समजला जाणारा ‘६९ वा फिल्मफेअर पुरस्कार २०२४’ चा सोहळा २८ जानेवारी २०२४ रोजी गुजरातमध्ये संपन्न झाला. २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारे चित्रपट आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देण्यात आला. यात '१२ वी फेल' ते 'सॅम माणेकशॉ' या प्रेरणादायी चित्रपटांनी पुरस्कारांवर नावे कोरली आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावे दिला जाणारा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२४’ या सोहळ्याची पत्रकार परिषद २४ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत संपन्न झाली. यावेळी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सी.ई.ओ अभिषेक मिश्रा, अभिनेत्री दिया मिर्झा, अदिती राव, नुसरत भरुचा सह मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली की, “ओटीटी वाहिन्यांमुळे माझ्यासारख्या काही वर्ष ह
६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा मुंबईऐवजी गुजरातमध्ये रंगणार आहे. नुकतीच या पुरस्कार सोहळ्याची नामांकने समोर आली असून यावेळी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानने बाजी मारली आहे.
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये संपन्न होणार आहे. याची घोषणा सिनेनिर्माता दिग्दर्शक करण जोहर यांनी मुंबईत झालेल्या फिल्मफेअर पत्रकार परिषदेत केली. '६९वा ह्युंदाई फिल्मफेअर पुरस्कार २०२४' यंदा गुजरात येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे. यंदा या सोहळ्याला 'गुजरात टुरिझम'चे विशेष सहकार्य लाभणार आहे. दरम्यान, २०१८ ते २०२३ दरवर्षी फिल्मफेअर पुरस्कार हे मुंबत आयोजित केले जात होते. केवळ २०२० मध्ये हा सोहळा गुवाहाटी येथे संपन्न झाला होता. आणि आता०२४ चा फिल
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज पुरस्कारांपैकी एक असलेला फिल्मफेअर पुरस्कार २०२४ चा सोहळा यावेळी गुजरातमध्ये रंगणार आहे. 'फिल्मफेअर' पुरस्काराचे यंदाचे हे ६९ वे वर्ष असून या पुरस्कार सोहळ्यात देखील नव्या-जुन्या कलाकारांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. २८ जानेवारी २०२४ रोजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये 'फिल्मफेअर २०२४ चा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कलेवर किती प्रेम आहे हे दिसून येतेच. नुकतेच त्यांनी संगीत क्षेत्रातही मोठे नाव कमावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'अबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याला ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. संगीत क्षेत्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाल्यामुळे ही गर्वाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२३ ची नामांकने अखेर जाहिर झाली आहेत. महत्वाची बाब म्हणजे या नामांकनांच्या यादीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलकारांची वर्णी लागली आहे. या यादीत २० देशांतील ५६ नामांकित लोकांचा १४ विविध श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. यात भारतातून शेफाली शाह, जिम सरभ आणि वीर दास यांच्या नावाचा समावेश असून ‘दिल्ली क्राइम २’ या वेब मालिकेसाठी शेफाली शाह हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
तरूण आपल्या देशाचे भवितव्य आहेत त्यामुळे आज तरूण सुशिक्षित असणे पुरसे नाही, तर ते रोजगारक्षम असणे देखील महत्त्वाचे आहे. अधिक पुढे जात आपण आपल्या लोकशाहीचा लाभ घेत भारताला नव्या उंचीवर नेले पाहिजे, ज्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका, त्यांचा पाठिंबा व सहयोग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन पद्मविभूषण विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ते मुंबईत आयोजित मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अॅण्ड अवॉर्ड्स सोहळ्यात बोलत होते.
‘मस्क शिपिंग’ कंपनीत कार्यरत असलेला नवीन गोरे यास उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे कंपनीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘सी एक्स चॅम्पियन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई : दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’तर्फे ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पूर्वसंध्येला, दि. ४ जून रोजी ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या एकूण १३ पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे. रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून ऑस्कर सन्मानप्राप्त ‘द एलिफंट व्हिस्परर्स’साठी ‘साऊंड इंजिनिअरिंग’ची जबाबदारी निभावणार्या प्रद्युम्न चावरे या हरहुन्नरी तरुणाच्या पुणे ते ‘ऑस्कर’ या रंजक प्रवासाची कहाणी...
गोव्यात होऊ घातलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२२ साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 'इंडियन पॅनोरमा' या विभागात फिचर फिल्म विभागात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. एकूण ३५४ भारतीय चित्रपटांपैकी निवडक अशा २५ फिचर फिल्म्स निवडण्यात आल्या आहेत. त्यात ‘शेर शिवराज’ चित्रपटाने बाजी मारली आहे. २० ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन होत आहे.
ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गेलेला चित्रपट म्हणजे 'छेल्लो शो'. हा चित्रपट आज १४ ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे. नुकतीच या चित्रपटाबाबत एक दुःखद माहिती समोर आली होती. ती म्हणजे या चित्रपटातील एक बालकलाकार राहुल कोळी याने काही दिवसांपूर्वीच वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे चित्रपटातील सर्व कलाकारांवर शोकळला पसरली आहे. मात्र तरीही दुःखावर मात करत चित्रपटाची संपूर्ण टीम आज चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या 161व्या जयंतीनिमित्त ‘पश्चिमबंग बांगला अकादमी’तर्फे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका शासकीय कार्यक्रमात साहित्यविषयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, आता अकादमीच्या निर्णयाविरोधात अनेक बंगाली साहित्यिकांनी आवाज उठवला आहे.
अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२ चर्चासत्र आणि पुरस्कार सोहळा शुक्रवार २९ एप्रिल २०२२ रोजी मादाम कामा सभागृह, स्वातंत्रवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे संपन्न झाला.
चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहबे फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्काराची कलाकारांसह प्रेक्षकांनाही प्रतीक्षा लागून असते. यंदाचा या पुरस्काराचा सोहळा रविवारी म्हणजेच २० फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडला.
९३व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांचेही केले स्मरण
९३व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून नोमडलँडला मिळाले ३ पुरस्कार मिळाले
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गायिका 'सावनी रविंद्र'ने पटकावला 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्कार
३० डिसेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारावर भारतीय वेब सिरीज दिल्ली क्राईमने पटकावला सर्वोत्कृष्ट नाट्यमय मालिका पुरस्कार
‘मोहन वीणे’ची निर्मिती करून तिला भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणणार्या पं. विश्व मोहन भट्ट यांच्याविषयी...
आपल्या वडिलांनंतर भारतीय शास्त्रीय संगीताला सितारवादनाच्या माध्यमातून नवीन आयाम देणार्या अनुष्का शंकर यांच्याविषयी....
०२१च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने/ शिफारशी दाखल करण्याची सुरुवात १ मे २०२०रोजी झाली होती. ही नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२० आहे.