आज जवळपास सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ‘ऑडिओ बुक्स` अगदी सहज असतात. ज्ञानेश्वरी जशी ज्ञानेश्वरांनी स्वतः उलगडून म्हंटली तर ती ऐकण्यात जी मजा येईल ना, तशीच मजा सावरकरांच्या आवाजात त्यांच्या पुस्तकांचे विश्लेषण ऐकण्यात मिळाली असती. एक मात्र नक्की वाटतं, टीव्हीवर होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये सावरकरांनी भाग घेतला नसता. कारण, `क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे` या तत्त्वावर आयुष्यभर चालले होते सावरकर!
Read More