लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. एका मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानला समृद्ध देश म्हटले आहे. त्यासोबतचं भारताने पाकिस्तानशी चांगला संवाद ठेवला पाहिजे, ना की बंदूकीचा धाक दाखवला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. मणिशंकर अय्यर त्यांनी लिहिलेल्या नवीन पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी मुलाखती देत आहेत. याचं दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
Read More
पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याने भारताने त्यांच्यासोबत सन्मानानेच वागावे, असे वक्तव्य करून मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला अडचणीत आणले आहे.काँग्रेसला अडचणीत आणण्याचा विडा उचललेल्या नेत्यांपैकी अतिशय दिग्गज नेते मणिशंकर अय्यर अखेर मैदानात उतरले आहेत. मैदानात उतरताच त्यांनी पहिल्याच झटक्यात पाकप्रेम दाखवून काँग्रेस पक्षाला चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यामुळे सॅम पित्रोडा यांच्या धक्क्यातून सावरण्याचे प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा दणका बसला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हा सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेचा शब्द आहे. आता यांच तंत्रज्ञानाबद्दल फर्म बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक बैठकीत अब्जाधीश वॉरेन बफेट म्हणाले , एआय सर्व प्रकारचे काम करू शकते. मात्र जेव्हा एखादे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकतो , तेव्हा मला काळजी वाटते. कारण या एआयवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणार आहोत.त्यामुळे एआय हा मानवाच्या अस्तित्वाला धोका असून अणुबॅाम्बसारखा आहे, असे विधान वॉरेन बफेट यांनी केले आहे.
पंजाबमध्ये आप सरकार स्थापन केल्यानंतर शिरोमणी अकाली दल हा पक्ष पुरता बिथरला आहे. आधी शेतकर्यांच्या मुद्द्यांवरुन शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली. त्यानंतर मायावतींच्या बसपासोबत संधान साधत निवडणूकही लढवली. पण, त्यांच्या पदरी पराभवच पडला. भाजपशी फारकत घेऊन अकाली दल अस्तित्वाची लढाई लढत आहे.
तालिबानसोबत मिळून भारताच्या नाशाचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानने अत्यंत धोकादायक मार्गाने अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रे बनवायला सुरुवात केली आहे. बुलेटिन ऑफ अणुशास्त्रज्ञांच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की जर पाकिस्तानने या वेगाने अणुबॉम्ब बनविणे सुरू ठेवले तर २०२५ पर्यंत त्याच्याकडे सुमारे २०० अणुबॉम्ब असतील. भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानकडे सध्या सुमारे १६५ अण्वस्त्रे आहेत. एवढेच नव्हे तर पाकिस्तान हे अणुबॉम्ब टाकण्यासाठी सातत्याने आपली क्षेपणास्त्र आणि हवाई शक्ती वाढवत आहे.
‘द नॅशनल इंटरेस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये पीटर सुसीउ यांनी असा दावा केला आहे की, १९६४ ते १९९६ या काळात झालेल्या ४५ अणुचाचण्यांदरम्यान चीनमध्ये तब्बल १ लाख, ९४ हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आता या नवीन लेखामुळे कोरोनाचे माहेरघर ठरलेल्या चीनचा आणखीन एक क्रूर चेहरा जगासमोर आला आहे.