राहुलजी, २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मतदारांची आकडेवारी जाहीर करून राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखावर बावनकुळेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
Read More
जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढू शकत नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवर लिहिलेल्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत असल्यामुळे ते सातत्याने त्याच त्या गोष्टी बोलतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकांवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
(ECI Slams Rahul Gandhi’s Allegations on Maharashtra Polls as Baseless) काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'मॅच फिक्सिंग महाराष्ट्र' या नावाने लिहिलेल्या लेखात, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार भाजपाकडून गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, त्यांचे आरोप कायद्याचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे.
(Rahul Gandhi)लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेतया दौऱ्यात त्यांनी बोस्टन या ठिकाणी असलेल्या ब्राऊन विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतेवेळी आपल्या भाषणातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेतून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. राहुल गांधींच्या या टिकेनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत ते अजूनही आलेले नाहीत, हे पुन्हा स्प
(Maharashtra Legislative Council Elections 2025) राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २७ मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या या ५ जागांवर कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या कामगिरीतून धडे घेत भारतीय जनता पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल केले. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची कामगिरी चमकदार ठरली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही लालू आणि काँग्रेसवर भाजप कुरघोडी करून विजयी होईल, हे निश्चित.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार असलेल्या सोनिया गांधी खडबडून जाग्या झाल्या आहेत. नाताळच्या उत्सवानंतर संसदेत गदारोळाचे विक्रम करत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने जनतेच्या प्रश्नांना चुना लावलाच. परंतु, मुलाने तर थेट खासदारांना धक्काबुक्की करण्याचे महापातक केले. त्याला जोड म्हणून आता मायलेक दोघेच उरले नाहीत, तर त्यात नवी एन्ट्री झाली आहे, ती थेट वायनाडला जाऊन खासदार झालेल्या प्रियांका गांधींची.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेली १० वर्षे असलेले दिल्लीकरांवरचे 'आप'चे संकट दूर झाले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजप सध्या विजयाच्या मार्गावर असून आम आदमी पक्ष पिछाडीवर आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. त्यामुळे कृपया मला फोन करू नका, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
Delhi Assembly election दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly election) निकालानंतर दिल्ली सरकारच्या प्रशासन विभागाने सुरक्षेचे कारण देत दिल्ली सचिवालय कुलूप बंद करण्यात आले. राजधानीत भाजपच विजय स्पष्ट झाला. आपच्या बड्या नेत्यांना परभवाला सामोरे जावं लागलं आहे. त्यावेळी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
Narendra Modi दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्ष आणि त्यांचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. त्याचबरोबर भाजपच्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले असून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आम आदमी पक्षाचा दारूण पराभव करण्यात आला. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना बोजा बिस्तारा उचलावा लागला आहे. आपच्या सत्तेची १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निवडणुकीत मुस्तफाबाद मतदारसंघातून मुस्लिमबहुल भागामध्ये भाजपच्या उमेदवाराने पक्षाला विजय मिळवून दिला. मुस्ताफाबादमध्ये भाजपचे उमेदवार मोहन सिंग बिश्त यांनी आम आदमी पक्ष, एमआयएम आणि काँग्रेसचा पराभव केला होता.
‘दिल्ली हैं दिलवालों की’ असा हा देशाच्या राजधानीचा स्वभावगुण. तेव्हा, यंदा दिल्लीकरांनी मतपेटीतून कुणाला आपला ‘दिल’ दिला आणि कुणाला दगा दिला, ते उद्याच्या शनिवारी स्पष्ट होईलच. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे, ‘आप’विषयी नाराजी आणि मतांची टक्केवारी काय सांगते, याचा उहापोह करणारा हा लेख...
केजरीवालांपासून दिल्ली दूर का गेली? Arvind Kejriwal
Delhi Assembly Election ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान झाले. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याआधीच एग्झिट पोलने दिल्लीमध्ये कमळ फुलून भाजप विजयी होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. भाजप २७ वर्षींनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सत्तेत येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आम आदपी पक्षाच्या विजयाची कोणतीही शक्यता नाही. दरम्यान काँग्रेसचे मुश्कीलीने खाते खोलता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
(Delhi Assembly Election 2025) राजधानी दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सत्तारुढ आप पक्ष आणि विरोधी बाकावरचे भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील एकूण एक कोटी ५६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
(AAP) दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षातर्फे (आप) वापरल्या जात असलेल्या दबावतंत्राचा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी तीव्र निषेध केला आहे.
Narendra Modi दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्लीतील दहावीच्या बोर्डाचे निकाल सुधारण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्ष नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ते दिल्लीतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना म्हणाले आहेत.
Delhi Assembly election दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण आपच्या सात नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखेरचा राम राम केला आहे. राजीनाम्यात त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी आणि पालममधील भावना गौर यांचाही यामध्ये समावेश आहे.
दिल्ली विधानसभेत ‘आप’चा पराभव होण्याचे स्पष्ट संकेत मिळताच, केजरीवाल यांनी भाजपवर बिनबुडाच्या आरोपांचा झपाटाच लावलेला दिसतो. याच केजरीवाल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलन करत, रस्त्यावर ठिय्या मांडला होता. त्यावेळीही ते अराजकतावादी होते आणि आजही तीच गत!
Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्की
(AAP Manifesto Delhi Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मध्यमवर्गीय लोकांना आकर्षित करण्यासाठी १५ हमी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला धडा शिकवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पददेखील त्यांना मिळू नये, अशी तजवीज केली. तरीदेखील हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची विशेषतः उबाठा गटाची धडपड सुरू असल्याचे दिसते. मुळात या पदासाठी अपेक्षित संख्याबळ नसताना, असे धाडस करणे मूर्खपणाचेच. पण, देवेंद्र फडणवीस दया दाखवतील, या एकमेव आशेने उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात. फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणार्या उद्धवरावांनी त्यासाठीच तर नागपुरात त्यांची भेट घेतली. ते देवेंद्र फडणवीस होते म्हणून
Delhi Assembly Election 2025 दिल्लीत थंड हवामानासह आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशातच प्रतिस्पर्धी एकमेकांवर आरोप प्रत्योराप करत आहेत. प्रचार सुरू असून याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा दणाणून सोडली आहे. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला कचऱ्याचा डबा {डसेटबिन) बनवल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेपासून एकत्र असाणार्या ‘इंडी’ आघाडीतील बेबनाव समोर आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये पुढे जाण्यास ‘इंडी’ आघाडीमधील इतर पक्ष तयार नाहीत. ‘आप’ने तर काँग्रेसशी ( Congress ) उभा दावा मांडला आहे. त्यामुळे काँग्रेसला देखील मुस्लीम मतांवर डोळा ठेवत, त्यांची वेगळी चूल मांडावी लागली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, येत्या ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या तीन पक्षांमध्ये ही लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी भाजपने आपले संकल्पपत्राचे अनावरण केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये यशस्वी झालेली लाडकी बहिण योजना दिल्लीमध्ये भाजप राबवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
दिल्ली विधानसभा ( Delhi Assembly ) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सध्या राजधानीत गोठवणारे शीतवारे आणि पावसांच्या सरींतही राजकीय वातावरण मात्र तापलेलेच. दिल्लीचे रण आता पूर्णपणे पेटले आहे. त्यामुळे सत्ताधारी ‘आप’ तिसर्यांदा राजधानीचे कारभारी होणार की जनता काँग्रेसला पुन्हा धुडकावून भाजपला संधी देणार, हे आता सुज्ञ दिल्लीकरांच्याच हाती...
(Prithviraj Chavan) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस वरिष्ठांकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकांचा मौसम आला की ‘इंडी’ आघाडीच्या ( Indi Aghadi ) तोंडदेखल्या एकतेला आणखीन तडे जातात. तसाच अपेक्षित प्रकार आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही समोर आला असून, ‘आप’ आणि काँग्रेस हे पक्ष निवडणुका स्वतंत्र लढविणार आहेत. तसेच ‘एकला चलो रे’चे वारे बिहारमध्येही वाहू लागले आहेत. त्यामुळे ‘इंडी’ आघाडीचा पोपट अखेरीस मेला का, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत अरविंद केजरीवाल जिंकतील, असा दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
दिल्लीत जसे घडले तसे मुंबईत पालिका निवडणूकीत होऊ शकते, असे विधान संजय राऊतांनी केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा झाली असून दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे. यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत मुंबई महापालिका निवडणूका स्वतंत्र लढण्याचे संकते दिले.
Congress विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आधीच काँग्रेसमध्ये गळती सुरू असताना ठाणे काँग्रेसमध्ये आजी - माजी पदाधिकाऱ्यांची गच्छंती करण्यात येत आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या कारणास्तव ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी माजी जिल्हाध्यक्ष अनिल साळवी यांना पक्षातुन निलंबीत केले आहे.
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभेची घोषणा झाली असून पुढील महिन्याभरात दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. यंदाची दिल्लीच्या सत्तेची खरी लढाई ही गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असलेला आम आदमी पक्ष (आप) आणि भाजप यांच्यामध्येच आहे.
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी पत्रकारपरिषदेत केली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
(AAP) गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. मात्र, आप सरकार आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी ठेवला आहे.
Delhi Assembly Election आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘इंडी’ आघाडीतील फूट ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मुळात ‘इंडी’ आघाडी नामक ही राजकीय आघाडीची तडजोड केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे नेतृत्वहीनता, राजकीय महत्त्वाकांक्षांचे ग्रहण लागलेल्या ‘इंडी’ आघाडीचे भविष्य हे अंध:कारमय आहे, हे निश्चित!
(Chandrashekhar Bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी विधानसभा विजयाबद्दल बावनकुळेंचे अभिनंदन केले.
नवी दिल्ली : भाजपने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारविरोधात ‘आरोपपत्र’ जारी केले. भाजपने भ्रष्टाचार आणि यमुना प्रदूषणासह ( AQI ) अनेक मुद्द्यांवरून ‘आप’ला लक्ष्य केले आहे.
(Election Commission of India) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या मतदानाबाबतचे गैरसमज दूर केले आहेत. काँग्रेस पक्षाला दिलेल्या सविस्तर प्रतिसादात आयोगाने मतदारांची नोंदणी अथवा नावे हटवण्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : “दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू,” असे रविवार दि. १ डिसेंबर रोजी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दिल्लीतील त्यांनी ‘इंडी’ आघाडीला धक्का देत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आता येथील विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपविरोधी इंडी आघाडीमध्ये एकूण २६ पक्ष आहेत. आघाडीने दिल्लीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, सर्वच जागांवर भाज
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे भाजप महायुतीला मोठा फटका सहन करावा. या नॅरेटिव्हला ( Fake Narrative ) ‘ब्रेक’ लावण्याची जबाबदारी भाजपने आमदारअमित गोरखे यांच्यावर दिली. त्यांनी राज्यभरात ‘बहुजन संवाद यात्रा’ काढत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचाराची पोलखोल केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सजग होत महायुतीला कौल दिला. जनमत बदलण्यासाठी फायदेशीर ठरलेल्या या यात्रेविषयी आमदार अमित गोरखे यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ येऊन ठेपले आहे. पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाची तयारी सुरु आहे. यावेळी आम आदमी म्हणून दिल्लीच्या सत्तेवर जवळपास एक दशक बसून दिल्लीकरांचा अपेक्षाभंग करणार्या केजरीवालांना दिल्लीची जनता धडा शिकवणार की, त्यांच्या रेवडी वाटपाला भुलून पुन्हा एकदा आपल्या भविष्याचा खेळ मांडणार हे पाहणे ही महत्त्वाचे होणार आहे.
मुंबई : “भाजप महायुतीने ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर येत्या दि. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी ( Shapathvidhi ) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता भव्य सोहळा होईल,” अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी केली.
(Eknath Shinde) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने तब्बल २३२ जागांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीच्या या विजयानंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार दि. २७ नोव्हेंबर प्रथमच पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीआधी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे यथोचित प्रयत्न करून झाल्यानंतर, हिंदू विरोधातल्या मुस्लीम मौलवींच्या मागण्या मान्य करण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली. त्यामुळे देव, देश आणि धर्म यावरील धोक्याची चाहूल ओळखलेल्या सज्जनशक्तीने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा जागर केला आणि त्याचे फलित म्हणजेच हा निकाल होय.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. महायुतीच्या पारड्यात जनतेने भरभरून मतांचे दान टाकले आहे. पाच वर्षांपूर्वी दगाफटका करुन जनतेच्या आदेशाचा ज्यांनी अपमान केला होता, त्यांना खर्या अर्थाने आज जनताजनार्दनाने न्याय मिळवून दिला. मात्र, पराभवाबाबत चिंतन करून, त्यातून काही बोध घ्यावा इतकेही शहाणपण विरोधकांकडे उरलेले दिसत नाही. सातत्याने आम्ही म्हणजे असामान्य नेतृत्व अशी शेखी मिरवण्यात विरोधी पक्षातील नेत्यांची हयात गेल्याने, त्यांच्याकडे बाप पुण्याई वगळता आप पुण्याईची वानवाच. त्यामुळेच झालेल्या
(Eknath Shinde) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला कौल दिल्याने महायुतीने राज्यात अविश्वसनीय मतांचा आकडा ओलांडला आहे. या अभूतपूर्व यशासाठी कारणीभूत असलेल्या कारणांपैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय. खरंतर या योजनेतील लाभार्थी ठरलेल्या लाडक्या बहिणींनी महायुतीला मतांच्या रुपात भरभरून दिलेले आशीर्वाद फळले. महायुतीच्या या ऐतिहासिक विजयानंतर लाडक्या बहिणींकडून वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंचे औक्षण करुन विजयोत्सव साजरा
ठाणे जिल्ह्यात ‘मोठा भाऊ’ असलेल्या भारतीय जनता पक्षाने एकूण 18 पैकी नऊ जागा जिंकून ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘भाजपच मोठा भाऊ’ असल्याचे सिद्ध केले. 2019 सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकली, तर जिल्ह्यात उबाठा, मनसे सोबतच काँग्रेसचाही सुपडा साफ झाला आहे.