'जनकल्याणासाठी महापालिकेतील पालकमंत्री कार्यालय सुरूच राहणार', अशी भूमिका मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत मांडली. विरोधकांच्या आरोपांना मंत्री लोढा यांनी विधानसभेत ठणकावून उत्तर दिले. ते म्हणाले, आजवर फक्त पालकमंत्र्यांसाठी उघडी असणारी बृहन्मुंबई महापालिकेची दारे, आमच्या निर्णयाने जनतेसाठी खुली झाल्याचे त्यांनी सांगितले.
Read More
मुंबई महापालिका मुख्यालयात उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना कार्यालय देण्यात आल्याने विरोधकांकडून प्रचंड टीका होत आहे. परंतु याच विरोधकांच्या मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहराचे पालकमंत्री असलेल्या अस्लम शेख यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना मलबार हिल मधील निवासस्थान देण्यात आले होते.
काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या मढ येथे असलेल्या कथित स्टुडिओशी संबंधित एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणला होता. या घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. ६ ऑगस्ट) नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत.
मुंबई : महाविकास आघाडीतील (मविआ) नेत्यांमधील मतभेद आता नवे राहिलेले नाहीत. आता यात महापालिका आरक्षण सोडतीच्या मुद्द्यांची भर पडली आहे. मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत आमच्यावर अन्याय झाला असून शिवसेना योग्य न्याय देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला असून त्यांनी न्यायालयात जाण्याचीही भूमिका घेतली आहे.
भाजपने ४ राज्यामधील निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर कॉंग्रेस मंत्री असलम शेख यांनी केली होती भाजपवर टीका
काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांचा कारनामा
मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी काँग्रेसकडून केले जात आहेत. स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. २६ जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत.
ठराविक कंत्राटदारांना कामे मिळवून देण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न ; पालकमंत्री अस्लम शेख यांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप
मालाड-मालवणी दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वतःची व्होट बँक तयार व्हावी म्हणून बेकायदा इमारतींना देण्यात आलेले अभय लहान मुलांच्या जीवावर बेतले. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे हात या दुर्घटनाबाधितांच्या रक्ताने माखलेले आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केली आहे.
तबलीगी जमात आणि कुंभमेळ्याची असलम यांच्याकडून तुलना ?
'आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, अशी विनंती मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. परंतु कोणीही हे ऐकत नाही. अशीच स्थिती राहिली तर जे नियम रात्रीचे आहेत ते नियम सकाळी देखील लावावी लागतील,' असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
अवैध मशिदीविरोधात तक्रार करणाऱ्याला दमदाटी, घर सोडून जाण्यासाठी हिंदूंवर दबाव, हिंदूंच्या मालमत्ता स्वस्तात लाटणे, अशा झुंडशाही विरोधात सातत्याने दैनिक 'मुंबई तरुण भारत' व 'महाMTB'तर्फे उठवलेल्या आवाजाला भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधान भवनात वाचा फोडली. हिंदूंविरोधात सातत्याने चालवल्या जाणाऱ्या 'मालवणी पॅटर्न'विरोधात डरकाळी फोडत सभागृह दणाणून सोडले. हिंदू मतदार पद्धतशीरपणे कमी करून रोहिंग्या, बांग्लादेशींना मतदार यादीत घुसवून मतदार संघ तयार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
वर्षानुवर्षे एकाच खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करा, अशी मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आयुक्त काय भूमिका घेतात, अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात की त्यांची उचलबांगडी करतात याकडे पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यात बुधवारी दुपारी भेट झाली. यानिमित्त त्यांनी मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली.