New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते.
Read More
(Social Media) सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करणारे सध्याचे कायदे मजबूत करण्याची नितांत गरज आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
( Dadar Railway Station ) मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे परिसरातील अस्वच्छता, फेरीवाल्यांचा विळखा आणि टॅक्सीवाल्यांच्या मनमानीकडे मुंबई भाजपने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भातील निवेदन रेल्वेमंत्र्यांना सादर करीत समस्यांचे निराकरण करण्याची विनंती भाजपने रेल्वे मंत्र्यांना केली आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने १०८ गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत गणेश दर्शनासाठी आले असता त्यांनी मुंबई लोकलने प्रवास केला. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधत अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. शुक्रवार, दि.१३ रोजी केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडुप दरम्यान लोकलने प्रवास केला.
नेरुळ - उरण रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसूल त्याचबरोबर ऐतिहासिक व पारंपारिक गावांनुसार ओळख कायम राहावी, त्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांना नावे देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे आज (दि. २३ मे ) दिल्ली येथे भेट घेऊन केली.