मागील दोन दशकांहून अधिक काळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किमी अंतरावर वसलेल्या बारीपाड्याचा चेहरामोहरा बदलणार्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चैत्राम पवार यांना कालच भारत सरकारचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकास साधत, बारीपाड्याची एक आदर्श आणि स्वावलंबी गाव म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली. काही वर्षांपूर्वीच चैत्राम पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बारीपाड्याची ही यशोगाथा जवळून अनुभवण
Read More
‘वनवासी कल्याण आश्रम’ आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा पुढे नेणार्या नाशिकच्या युवा कीर्तनकार अश्विनी हिरामण चौधरी यांच्याविषयी...
‘अहिल्या महिला मंडळ’ ही संस्था गेली २७ वर्ष ’स्वयंसेवेतून समाज स्वास्थ्याकडे’ या उद्दिष्टाने समाजातील सर्व थरातील महिलांचा सर्वांगीण विकास करत आहे. महिलांचे सक्षमीकरण करतानाच तिच्या कुटुंबाचे आणि त्याद्वारे समाजाचे उत्थान करणार्या ‘अहिल्या महिला मंडळा‘च्या कार्याचा मागोवा घेऊया...
मृत्यू कोणालाही सोडत नाही. लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत, वेळ-काळ कोणताही असो, या जगात येणार्याला एके दिवशी हे जग सोडावयाचे आहे. जावयाचे तरी आहेच, पण ते रडत रडत नव्हे, तर आनंदाने जसे आमचे येणे आनंदाचे, तसेच जाणेदेखील आनंदाचे व्हावयास हवे. आम्ही जन्माचे स्वागत केले, मृत्यूचे स्वागत का म्हणून करु नये. याचाच अर्थ असा की, आम्हाला मृत्यूचे रहस्य समजले नाही. खरे तर मृत्यू हा जीवात्म्याचा नव्हे, तो तर शरीराचा आहे. कारण, आत्मा हा अजर व अमर आहे, तर देह नाशवंत आहे.
ज्या समाजात जन्मलो, त्या समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून अमरावतीमध्ये फासेपारधी समाजातील मुलामुलींच्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेतून जीवनाची उत्तरं शोधलेल्या मतीन भोसले यांच्याविषयी...
वैदिक संस्कृती ही भोगाकडून त्यागाकडे व प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे नेणारी आदर्श संस्कृती मानली जाते. आश्रम व्यवस्थेचा उद्देशचदेखील तितकाच उदात्त आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे मानवी जीवनाच्या प्रवासाचे चार टप्पे आहेत. शेवटचा संन्यास हा टप्पा सर्वोच्चस्थानी मानला जातो. वानप्रस्थाश्रमानंतर क्रम येतो, तो संन्यासाचा!
आज दि. २६ डिसेंबर म्हणजे ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक अध्यक्ष वनयोगी रमाकांत केशव देशपांडे उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांची जयंती आणि ‘वनवासी कल्याण आश्रमा’चा स्थापना दिन. त्यानिमित्ताने बाळासाहेबांनी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून उभारलेल्या समाजहित, राष्ट्रहिताला समर्पित कार्याचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरावे.
नाशिकच्या ’जनजाती कल्याण आश्रमा’ने ‘वीर जनजाती योद्धे’ या नावाचे मोलाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात दिलेल्या या आणखी काही प्रेरणादायी कथा.
१९५२ साली सुरू झालेली ‘वनवासी कल्याण आश्रम’ या सेवाभावी चळवळीची यात्रा आता ७० वर्षांची झाली आहे. एका अर्थाने अमृत महोत्सवी वर्षाच्या दिशेने ‘वनवासी कल्याण आश्रम’ची वाटचाल आता सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल. सर्वार्थाने उपेक्षित राहिलेल्या, आपल्याच हिंदू धर्माचे अभिन्न घटक असलेल्या वनवासी, जनजाती समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दिशेने चालू असलेला हा प्रवास म्हटला, तर थक्क करणारा तर आहेच. पण, या देशाच्या एका समाज घटकाला त्याचे आत्मभान आणि गौरवशाली वारसा पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी चालू असलेला, हा प्रवास त
मित्रांनो समाजामध्ये आतापर्यंत आपण मुलांच्या समस्या जर ऐकल्या, वाचल्या असतील तर आपल्याला बालगृह, वसतिगृह, आश्रमशाळा, अनाथालय असे ठरावीक शब्द बघायला मिळतात. अनेकदा या सर्व गोष्टी आपल्याला एकच वाटतात कारण तिथे लहान मुले असतात. मुले म्हटले की भावनिकता आपोआपच येते, संवेदनशीलता जागृत होते. या पार्श्वभूमीवर समतोल केंद्राची ‘बालनगरी’ संकल्पना समजून घेऊ...
नंदुरबार : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या १० वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयांमुळे राज्यातील ६४५ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी केले.
महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या जीवन सहचारिणी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रमामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. कौटुंबिक जबाबदार्यांसह त्यांनी सदैव सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात दिला. त्यांच्या अशा या कार्यमग्न जीवनाचा परिचय करुन देणारा हा श्रद्धाजंलीपर लेख...
बाळासाहेब देशपांडे यांनी १९५२ मध्ये सुरू केलेला रा.स्व.संघ परिवारातील एक महत्त्वाचा आयाम म्हणजे ‘वनवासी कल्याण आश्रम.’ २७ मार्च रोजी रसायनी ‘एमआयडीसी’मधील वडगाव-वाशीवली वाड येथे वनवासी समाजातील ७४ वधु-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या माध्यमातून’ पार पडला. त्यानिमित्ताने...
वनवासी कल्याण आश्रमाच्या हुशार, मेहनती कार्यकर्त्या वैशाली दिनकर देशपांडे यांची ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार ‘मालतीदेवी माधवराव पटवर्धन स्मृतिप्रीत्यर्थ’ दिला जातो. नुकताच पुण्यामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सध्या वैशालीताईंकडे प. महाराष्ट्र प्रांत महिला कार्य सहप्रमुख म्हणून दायित्व आहे.
प्रशासकीय सेवेत अमूल्य कार्यठसा उमटवणाऱ्या अधिकारी, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, वनवासी कल्याण आश्रम (कोकण प्रांत) उपाध्यक्षा वर्षा अनिल कोल्हटकर यांच्या कर्तृत्वाला वंदन करणारा लेखमालेतील दुसरा लेख...
‘नगरवासी -वनवासी, हम सब भारतवासी’ हे कल्याण आश्रमाचे जे सूत्र आहे ते सूत्र कमळाकर शारंगधर बेडेकर यांनी मुंबईत अक्षरश: प्रत्यक्षात उतरवून दाखवले. ते उत्तम प्रशासक व कर्तव्यकठोर तर होतेच; पण त्याहीपेक्षा अधिक ते कर्मठ कार्यकर्तादेखील होते. वनवासी बांधवांच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यांनी २५ ऑगस्टला या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या स्मृती कायमच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. त्या स्मृतींना प्रणाम!
वनवासी समाजबांधवांच्या उत्थानासाठी भारतीय राज्यघटनेने कितीतरी कायदे केले. कितीतरी व्यवस्था निर्माण करण्याचे सूचित केले. पण, आधीच प्रदीर्घ काळात मुख्य समाजप्रवाहापासून दूर असणार्या या समाजबांधवांचा प्रश्न कोरोनाकाळात आणखीन जटील बनला. त्यातही महाराष्ट्रातील १,२००च्या आसपास असणार्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचा प्रश्न तेथील विद्यार्थ्यांच्या जगण्याचा प्रश्न अनुत्तरित करून जातो.
रा. स्व. संघाचे प्रचारक, विद्यार्थीप्रिय शिक्षक तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ते भालचंद्र वासुदेव बर्वे ऊर्फ बापू (आप्पा) बर्वे यांचे दि. १० एप्रिल रोजी निधन झाले. बर्वे यांना गुरुतुल्य मानणार्या गिरीश जोशी यांनी आप्पांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
प्रशस्त इमारत आणि अद्ययावत शिक्षणाच्या सोयी या बाबी शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या सर्व सोयी पुरवण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी आयुक्तालयाचे प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे संगोपन करणारा व त्यांच्या जीवनात नवी उमेद जागृत करणारा नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथील ‘आधारतीर्थ’ आश्रम. या आश्रमाच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
प्रशांत भालचंद्र पाटील (वनवासी कल्याण आश्रम, नाशिक जिल्हा कार्यकर्ते व रा. स्व. संघ माजी नाशिक शहर सहकार्यवाह) यांचे शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
सेवा क्षेत्रातील महत्वाची संस्था मानली जाणाऱ्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे नवे अध्यक्ष म्हणून रामचंद्र खराडी यांची निवड करण्यात आली आहे. नागपूरात वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा निलीमा पट्टे, कृपाप्रसाद सिंह, राष्ट्रीय महामंत्री योगेश बापट प्रामुख्याने उपस्थित होते.
आज ९ ऑगस्ट. हा दिवस ‘जागतिक मूलदिवासी दिन’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. परंतु, भारत आणि या जागतिक दिनाचा काही संबंध आहे का? मुळात हा दिवस कोणी? का? कशासाठी सुरू केला? साजरा होऊ लागला? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’चे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उरांव यांच्या आकस्मिक निधनाने वनवासी, जनजाती समाजाची तसेच ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची कधीही भरुन न येणारी क्षती झाली आहे. त्यांचे जीवनकार्य आणि आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
कल्याण आश्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार हरपला
कम्युनिस्ट व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवाया कारणीभूत ठरल्याचा आरोप
चीनमधून सुरू झालेल्या ‘कोरोना’ व्हायरस नावाच्या वादळाने जगभरात धुमाकूळ घातला आहे आणि त्याच्या लाटेत आजवर असंख्य निष्पाप बळी पडले आहेत. भारतात पण सगळीकडे भीतीचे वातावरण आणि त्यात धोक्याची घंटा म्हणजे महाराष्ट्रात भारतातले सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. म्हणून आम्ही निवडलं ‘गो कोरोना’ नावाचं जनजागृती माध्यम...
नुकतेच दि. २५ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे माझे वडील बंधू गजानन यशवंत उर्फ बाळासाहेब दीक्षित यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. ते आजन्म रा. स्व. संघाचे पूर्ण वेळ प्रचारक होते व गेली काही वर्षे 'वनवासी कल्याण आश्रमा'चे संघटनमंत्री होते. परंतु, गेली काही वर्षे अपंगत्वामुळे कंबरेचे फ्रॅक्चर व नंतर उद्भवलेला स्मृतिभ्रंश व इतर आजरांमुळे अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या काही आठवणींना दिलेला हा उजाळा...
‘सत्कर्म बालक आश्रम, बदलापूर’ आणि ‘रश्मीज स्माईल ट्रस्ट, घाटकोपर’ यांच्या संयुक्त सहभागाने पार पडले, महाआरोग्य शिबीर! ज्यात पाचशेहून जास्त गरजूंनी लाभ घेतला.
९ फेब्रुवारी रोजी कोठिंबे, ता. कर्जत येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून नारायण रेकी सत्संग परिवार आणि ‘स्माईल ए स्प्रेड’ या संस्थेच्या मदतीने जनजाती समाजातील २०५ जोडप्यांच्या सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा विवाहसोहळा म्हणजे संस्कार, संस्कृती, धर्म आणि समाजाच्या समरस उत्थानाचे प्रतीकच आहे.
परवानगी शिवाय कन्हैय्या कुमार म.गांधी स्बामारकाबाहेर धरणे आंदोलनास बसला होता
सद्गुण आणि पावित्र्य यातून चिरकाल टिकणारा आनंद मिळतो, हे खरे आहे. तसेच मुलांवर जसे संस्कार घडवू तसे ते घडतात, याची प्रचिती आली रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यापासून २८ किमी अंतरावर वसलेल्या कोळथरेवासीयांना. कारण, येथील 'लक्ष्मी नारायण जोशी विद्यार्थी आश्रम.' या आश्रमामध्ये येणारे बहुतांशी गरजू विद्यार्थी, तर काही कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीने गांजलेले. त्यात पालकांनी हतबल होऊन, परिस्थितीपुढे हात टेकून आपल्या पाल्यांना या विद्यार्थी आश्रमात पाठवलेले.स्थानिक, पंचक्रोशीतीलच नव्हे, तर कोकणासह मुंबई-पुण्यास
आसाराम बापूचा मुलगा व बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला नारायण साईवर आरोप सिद्ध झाले आहेत. सुरत सत्र न्यायालयाने नारायण साईला जहांगीरपूरा आश्रमातील साधिकेवर बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले
जेष्ठ समाजसेविका तसेच भाजपच्या माजी कल्याण जिल्हा सरचिटणीस ज्योती पाटकर यांचे सोमवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. मुक्त बालिका आश्रम विरंगुळा केंद्र यासाठी त्यांनी सातत्याने काम केले होते. भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.
भाजीपाला पुरवठादाराचे बिल काढण्यासाठी पाच हजारांची मागणी करणार्या यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे (56, सिद्धेश्वर नगर, देना नगरजवळ, जामनेर रोड, भुसावळ) यांना लाच घेताना शाळेच्या बाहेर गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक करण्यात आली.
येथील 'संस्कार आश्रम फॉर गर्ल्स' (SAG) या सरकारी आश्रमशाळेतील ९ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आश्रमाला तात्काळ भेट देऊन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना याबाबतची माहिती दिली
जिजामाता उद्यानापासून सुरु झालेल्या वनवासी बांधवांच्या मोर्चाने अवघी मुंबई दणाणून सोडली.
जनजाती समाज, वनवासी बांधवांच्या जीवनमरणाचे प्रश्न, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त अस्मितेचा हुंकार जागविण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी गुरुवार दि.15 नोव्हेंबर रोजी मुंबईत राज्यस्तरीय धडक मोर्चा ‘वणवा’ चे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव लोहाणा सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हा सचिव रवींद्र पाटील बोलत होते.
चार महिला आणि एका मुलाच्या हत्येप्रकरणी २०१४ पासून रामपाल कैदेत होता. त्याप्रकरणी न्यायालयाने आज शिक्षा सुनावली
या प्रकरणी १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. २०१४ साली या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या
ब्रिटीशांनी शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या वनवासी समाजाला वनवासी कल्याण आश्रमाने शिक्षणाशी जोडले व त्यांच्या मूलभूत क्रीडा कौशल्याला वाव दिला, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
महात्मा गांधींच्या आदर्शांवर आधारित प्रश्नावलीद्वारे नुकतीच एक परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १५९ कैदी सहभागी झाले होते.
राज्यातील ९८ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात उपरोक्त साहित्य खरेदीसाठी सुमारे ४७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत
४५ वर्षांपासून छत्तीसगढ मधील जांजगिर जिल्ह्यातील चंपा येथे भारतीय कुष्ठ निवारक संघ द्वारा चालविण्यात येणाऱ्या कुष्ठ आश्रमासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.