आषाढी आणि कार्तिकी एकादशीमध्ये Ekadashi काय आहे फरक? Maha MTB मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा. https://www.amazon.in/dp/B0DKTSZVRF
Read More
यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ५ हजार बसेसव्दारे १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ०९ लाख ५३ हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २८ कोटी ९२ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.
आषाढी एकादशीच्या उपवासासाठी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील साबुदाणा, भगर, खजूर, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे
राज्यभरात सध्या आषाढी एकादशीनिमित्ताने विठूनामाचा गाजर सुरु आहे. अशातच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठू चरणी लिन होण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांना मराठीत शुभेच्छा देत उपस्थितांची मने जिंकली. तसेच, लवकरच पालखी मार्गाचे काम पूर्ण होऊन हे मार्ग वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोवळा॥ विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेला चाळाविश्व विठ्ठले॥ अशा या विश्वव्यापी विठ्ठलाची महती संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात वर्णिली आहे. लेकुरवाळा विठ्ठल केवळ महाराष्ट्राचेच आराध्यदैवत नाही, तर देशभरात आणि सातासमुद्रापारही या विठुरायाच्या भक्तीची, वारकर्यांच्या अपरंपार श्रद्धेची भुरळ अनेक संशोधक-अभ्यासकांनाही पडली. खरं तर ‘विठ्ठल आणि विठ्ठलभक्ती’ या विषयावर आजवर विपुल वाङ्मयनिर्मिती झाली आणि अजूनही ही प्रक्रिया सुरुच आहे. याच विषयावर जवळपास 65 वर्षांहून अधिक काळ
मुंबई : पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर ६ लाख ६४ हजार ६०७, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५ लाख ७७ अशा एकूण ११ लाख ६४ हजार ६८४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले.
मुंबई : शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील मयुर चंद्रकांत कांबळे यांच्या सक्रिय पुढाकाराने आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर, प्रति पंढरपुर येथे गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी लाडू वाटप आणि मोफत नेत्र चिकित्सा शिबिर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे नऊ लाखांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे आज सगळीकडे विठूरायाच्या नामाचा जयघोष पाहायला मिळत आहे. त्यात आता आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जय हरी विठ्ठल' म्हणत ट्विटरवर विठ्ठल भक्तांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
तळमावले : आषाढी एकादशीचे औचित्य साधत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानापासून दररोज कॅलिग्राफीतून अभंग आणि त्याला साजेसे पोस्टर्स पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डॉ. संदीप डाकवे यांनी तयार केली होती. या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांनी आपला प्रदर्शन भरवण्याचा संकल्प पूर्ण केला. परिसरातील वारकरी यांनी या अभंग चित्र वारी उपक्रमाचे कौतुक केले. दररोज रेखाटलेले अभंग आणि त्या सर्व अभंगांचे आषाढी एकादशी दिवशी प्रदर्शन असा अनोखा योग डॉ.संदीप डाकवे यांनी साधला
पुणे : आषाढी एकादशीच्या दिवशी पुणे शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईदसुद्धा एकाच साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा निर्णय नाशिकच्या चांदोरी येथील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. तर जळगावच्या अमळनेर शहरात तर यंदा कुर्बानीच दिली जाणारा नसल्याचा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे.
आषाढी एकादशी येताच हजारो वारकऱ्यांची पाऊले आपसूकच पंढरपूरच्या दिशेने वळतात. आषाढी एकादशी आता अवघ्या २ दिवसांवर आली आहे
आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला आठवते पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करणारी पंढरीची वारी आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी.
कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. या बद्दल आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थात आषाढस्य प्रथम दिवसे! संपूर्ण साहित्यजगतात केवळ कालिदास हा असा एकमेव कवी आहे की, ज्याच्या काव्यातील एका रचनेमुळे तो दिवस त्या कवीच्या नावे ओळखला जाऊ लागला. कालिदासाच्या उत्तमोत्तम काव्यरत्नातील ‘मेघदूत’ हे एक रत्न. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताचा थोडक्यात आस्वाद या लेखातून घेऊया...
कोरोनामुळे गेली दोन वर्षे असलेले निर्बंध वारकऱ्यांना वारीत सहभागी होण्यासाठी आडकाठी ठरत होते. यंदा मात्र परंपरेनुसार या 'आषाढ वारी'मध्ये सहभागी होण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत.
औरंगजेबासारख्या मोगल बादशहाने अनेक प्रयत्न करूनही पंढरीची आषाढी यात्रेची परंपरा बंद पडू शकली नाही. ती परंपरा मोडण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. कोरोना सारख्या आजाराशी लढा देण्यासाठी समाजाला मानसिक बळ देण्याचे सामर्थ्य असलेल्या आषाढी वारी सारख्या परंपरा यावर्षी सुरु करण्याची परवानगी आघाडी सरकारने द्यावी", अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते.
बॉलिवूडचे शेहेनशाहा अमिताभ बच्चन आता एबी आणि सीडी या मराठी चित्रपटामधून प्रेक्षांसमोर येणार आहेत. त्यामुळे हा योगायोग म्हणावा की काय, तर आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. या संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिली. महाराष्ट्रातील संक्रमण काळात हेच संत विचार समाजाच्या पाठिशी उभा राहिला असे ते म्हणाले.