नदीविषयीची श्रद्धा गढूळ झाली तेव्हा नदीचे पात्रदेखील गढूळ होत गेले. बालपणात पाहिलेले नदीचे काठ आणि आज पाहत असलेले नदीचे काठ यात अंतर पडले असून आपणच नदीच्या केलेल्या या अवस्थेचा विचार होणे आवश्यक आहे.
Read More
मराठी भाषेमध्ये दीड हजार नव्या शब्दांची भर पडणार आहे. त्यामुळे मराठी भाषेचे वैभव आणखी समृद्ध होणार आहे.
अमोल पालेकर एकेकाळचे प्रसिद्ध वगैरे अभिनेते, दिग्दर्शक असतील, त्याबाबत दुमत नाहीच. पण गेल्या काही काळापासून अमोल पालेकरांना स्वतःचीच किंमत कवडीमोल करून घेण्याचा म्हातारचळ लागल्याचे दिसते. यातूनच ते जिथे जातील तिथे औचित्य सोडून इतरच विषयावर तोंडाची वाफ दवडताना पाहायला मिळतात. बरवे यांच्यावरील चित्रप्रदर्शनातही पालेकरांनी स्थळ-काळाचे भान सोडून विषय भरकटवण्याचाच प्रयत्न केला.
मराठी साहित्याला आज अरुणाताईंसारख्या १०० साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. क्षितीज पाटुकले यांनी केले.
प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता तननुप्राणनिजावद् वर्णनानिपुण: कवि अभिनवगुप्ताचे गुरू म्हणजे संस्कृतमधील अलंकारिक रचनांचे कर्ते भट्टतौत. त्यांच्या या ओळी कविचे वर्णन करतात. याचा स्वैर अर्थ असा की, प्रतिभा म्हणजे काय तर, तेजाच्या नित्यनियमित उन्मेषाने झळाळणारी बुद्धी आणि अशा प्रतिभेच्या तेजाचा संचार झाल्याने ज्याची वर्णनेही जिवंत भासतात तो कवी. मराठीचे भाग्य थोर की सर्व अपशकुनांवर मात करीत या ओळींची प्रचिती येण्याचा सोहळा अरुणा ढेरेंच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवला.
डॉ. अरुणा ढेरे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना आपल्या कळपात ओढून त्यांनी आपला अजेंडा राबवावा, असे प्रयत्न सुरू झाले. आजवर ज्यांनी केवळ आपल्या आत्मबलाच्या आधारे वाटचाल केली, त्यांना ही गोष्ट रुचणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांचे इथले जगणे कसे अशक्य करता येईल, असे प्रयत्न सुरू झाले. हा सर्व अजेंडा राजकीय होता. कारण कोणत्याही डाव्या विचारसरणीच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट राजकारणापासून सुरू होते व राजकारणातच संपते.
यंदा पहिल्यांदाच निवडणूक टाळून झालेली कवयित्री अरुणा ढेरे यांची निवड निर्विवाद झाली हे उत्तम आहे. अभिनंदनीय आहे. योग्य आहे.