वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलींना संपत्तीत समान वाटा मिळणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे
Read More
न्यायमूर्तींची वक्तव्ये सध्या बातम्यांचा विषय असतो. न्या. धनंजय चंद्रचूड ते न्या. दीपक गुप्ता व्हाया न्या. अरुण मिश्रा असा या वक्तव्यांचा प्रवास होता. समर्थन, वा विरोधाच्या पलीकडे जाऊन एक देश म्हणून आपण या विधानांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत, हा मुख्य प्रश्न आहे. कारण न्यायाधीशांनी केलेली वक्तव्ये हा अडचणीचा मुद्दा नाही, तर न्यायपूर्ण वातावरण टिकवून ठेवण्यासाठी न्यायाधीशांनी भूमिकापर वक्तव्ये करू नयेत, हे तत्त्व सांभाळले पाहिजे.
भांडवली वृत्तसमूहाच्या पगारावर जगणारे बुद्धीजीवी हल्ली प्रत्येक घटनात्मक संस्थेच्या विश्वासार्हतेचे न्यायाधीश बनू इच्छितात. न्यायालयात सुनावणी करणारे न्यायमूर्ती निष्पक्ष असणे अपेक्षित आहेच. पण, निष्पक्षतेचा आग्रह धरणार्यांची निःस्पृहता कोण तपासणार?
सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी बेशिस्त वागणाऱ्या वकिलांची आज चांगलीच कानउघडणी केली आहे. तुम्हा सर्वांमुळे आज न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या बेशिस्त वागण्यामुळेच न्यायपालिकेची एकप्रकारे हत्या होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली आहे.