पायाभूत सुविधांवर किंवा संशोधन विकासावर खर्च केल्यामुळे गरिबी संपते म्हणजे काय? त्यालाच साध्या भाषेत ‘आत्मनिर्भरता’ म्हणतात. पण, वाडगा घेऊन फिरण्यालाच ‘गरिबांचे कल्याण’ ठरवून बसलेल्यांना ‘आत्मनिर्भर’ शब्दाचे आकलन म्हणूनच होऊ शकणार नाही. कोरोनातून अर्थव्यवस्था बाहेर काढताना मोदी सरकारने आणलेले ‘पॅकेज’, ही नुसती उधळपट्टी वा खिरापत नसून विकास, पायाभूत सुविधा यातून गरिबांना सुसह्य जीवनाकडे घेऊन जाण्याची योजना आहेच.
Read More