Argentina

अभिषेक बच्चन आणि लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा वर्षभरापासू सुरु होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच आराध्याच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसल्यानंतर या सर्व चर्चांना पुर्णविराम लागला. परंतु, या मधल्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेक ग्रे डिव्हॉर्स घेणार आहेत, वेगळे राहात आहेत अशा असंख्य गोष्टी बोलल्या गेल्या. मात्र, आता २०२५ या नव्या वर्षात आराध्या, अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. शिवाय यावेळी ऐश्वर्याने मराठीत असं क

Read More

ऐश्वर्या राय बच्चनचा आई आणि लेकीसोबतचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तीन पिढ्या एकत्र…”

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांवर आता पुर्णविराम लागला आहे. आराध्या बच्चनच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र येत आपल्या मुलीला प्रोत्साहन दिले. याशिवाय सोबत अमितभा बच्चन आणि ऐश्वर्याच्या आईची उपस्थिती घटस्फोटांच्या चर्चा बंद करणाऱी ठरली. सध्या, बच्चन कुटुंबाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यापैकी आराध्याच्या शाळेत ऐश्वर्या आणि अभिषेक सोबत वृंदा राय आल्या होत्या. यावेळी आराध्या, ऐश्वर्या आणि वृंदा यांना एकत्र पाहून नेटकरी आनंदी झाले

Read More

“नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले आणि...”, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा

हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते बऱ्याच वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहेत. नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन लवकरच केबीसी १६ च्या भागात येणार असून या विशेष भागात नाना पाटेकर त्यांचा आगामी चित्रपट वनवासचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे केबीसीमध्ये नाना पाटेकर नाम फाऊंडेशनसाठी खेळत असून शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरांचा उद्देश आहे.

Read More

अभिषेक बच्चनने वैतागून बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय, पण बिग बी यांनी दिला ‘हा’ सल्ला

अभिषेक बच्चन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांतून विविधांगी बूमिका साकारल्या. मात्र, अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही त्यांच्यासारखी अभिननय कला त्याचा अंगी नाही असे टोमणे त्याला बऱ्याचदा ऐकून घ्यावे लागले. अभिषेकने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनयाच्या क्षमतेवर शंका घेत इंडस्ट्री सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बातचीत केली होती. आणि त्यावेळी वडिल म्हणून अमिताभ बच्चन यांनी कसा आधार दिला होता त्याबद्दलही अभिषेक या मुलाखतीत व्यक्

Read More

अभिषेक बच्चनने लग्नानंतरही पालकांबरोबर राहण्याबद्दल केला खुलासा; म्हणाला, “माझ्या आईचा एक नियम…”

हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली काहींची मोडली. अशातच गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. अर्थात दोघांनी याबद्दल अजूनही अधिकृतरित्या काहीही जाहिर केलं नाही. मात्र, गेल्या वर्षभरात अभिषेक आणि ऐश्वर्या कोणत्याही कार्यक्रमांना एकत्र हजर न राहिल्यामुळे लोकांचा संशय आता अधिकच वाढला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिषेक जलसावर अमिताभ बच्चन आणि जया बचच्न यांच्यासोबत न राहात असल्याची बातमी आली होती. त्याबद्दलच अभिष

Read More

ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चन संतापला; म्हणाला, "आता बस्स झालं..."

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची लग्न होणं आणि लग्न मोडणं या बातम्या सातत्याने समोर येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा असून अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याची सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. अभिषेक दुसऱ्याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं तुटल्याचं देखील म्हटलं गेलं. या संबंधित अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. पण आता यावर

Read More

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास जया बच्चन यांनीच दिलेला नकार

हिंदी चित्रपटसृष्टीतील पावरफुल्ल कपल म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन. या दोघांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं होतं. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अँग्री यंग मॅन' या माहितीपटामध्ये जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मैत्री आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याची कथा सांगण्यात आली आहे. तसेच, याच माहितीपटात अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेण्यात आल्या असून या मुलाखतींमध्ये काही खुलासेही करण्यात आले आहेत. यावेळी एका मुलाखतीत जया बच्चन म्हणाल

Read More

“DNAमध्ये फक्त तीनच नावं…”, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर चिन्मयने व्यक्त केल्या भावना

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने २४ एप्रिल २०२४ रोजी दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांच्या यादीत अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) याच्या गालिब नाटकाचा देखील विशेष सन्मान करत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चिन्मय (Chinmay Mand

Read More

डोळ्यावर गॉगल आणि हातात चार घड्याळं, 'थलायवर १७१' मधील रजनीकांत यांचा लूक वायरल

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचे चाहते त्यांची पूजा करतात. वयाची सत्तरी जरी पार केली असली तरी आजही प्रमुख नायक म्हणूनच ते चित्रपटांत झळकतात. ‘जेलर’ चित्रपटाचा फिव्हर अजूनही त्यांच्या (Rajinikanth) चाहत्यांवर कायम असतानाच त्यांचा ‘थलायवर १७१’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मास्टर’, ‘विक्रम’ आणि ‘लिओ’, सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लोकेश कनागराज यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘थलायवर १७१’ (Thalaivar 171) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या

Read More

अमिताभ ते रजनकांत... राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गज कलाकारांना पोहोचले निमंत्रण

देशभरातील तमाम रामभक्त सध्या २२ जानेवारी २०२४ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दिवशी अयोधअयेत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखदारपणे रंगणार आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी श्रीरामनगरी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या संदर्भातील घडामोडींवर नजर ठेवून आहेत. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजेरी लावणार असून यात अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुस

Read More

शोले मधील ‘गब्बर’ कसा सापडला? सलीम-जावेद यांनी सांगितला किस्सा

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला एक चित्रपट म्हणजे ‘शोले’. १९७५ साली आलेल्या या चित्रपटाची जादु आजही कायम आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे, आणि त्यांचे प्रत्येक संवाद हे प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. त्यापैकीच एक पात्र म्हणजे ‘गब्बर’. या पात्राचे नाव आणि त्यासाठी कलाकाराची निवड कसी झाली याचा खास किस्सा संगीतकार जावेद अख्तर आणि लेखक सलीम खान यांनी सांगितला. मनसेतर्फे आयोजित दीपोत्सव २०२३ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज

Read More

‘भारत’ या नावाला मनोरंजन विश्वातून शंभर टक्के पाठिंबा

देशात सध्या G-20 परिषद सुरू असून या परिषदेला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना जेवणाचे निमंत्रण राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आले होते. या निमंत्रणावर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असे लिहिल्यानंतर देशाचे नाव भारत की इंडिया असा नवा वाद सुरू झाला आहे. या प्रकरणात राजकारण्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनीच समाज माध्यमावरुन आपली मतं नोंदवली. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर व्यक्त होण्याचा अधिकार या देशातील नागरिकांना असल्यामुळे भारत आणि इंडिया या नावाच्या वादावर मनोरंजन विश्वातून कलाकारांनी देखील आपले मत मांडले आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121