Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. य
Read More
नवी दिल्ली : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्या पथकाला संभल जामा मशिदीतही ( Sambhal Masjid ) प्रवेश देण्यात आला नाही. या मशिदीच्या संवर्धनाची आणि देखभालीची जबाबदारी १९२० पासून एएसआयकडे असली तरी बऱ्याच दिवसांपासून एएसआयला मशिदीत जाण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे त्याच्या सध्याच्या स्वरूपाची माहिती एएसआयकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Moinuddin Chishti Dargah राजस्थानातील अजमेर न्यायालयाने मोईनुद्दीन चिश्ती यांचा असलेला दर्गा महादेवाचे मंदिर असल्याचा दावा या याचिकेत दाखल करण्यात आला. यावर पुढील सुनावणी येत्या २० डिसेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्रालय, दर्गा समितीने आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणाच्या याचिकेत दर्गाच्या जागी हिंदू मंदिर उभारण्यासाठी तीन कारणे देण्यात आली आहेत.
इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे!
या लेखाच्या कालच्या पहिल्या भागात मांडलेली बाबरीच्या पतनापूर्वी आणि पश्चात हिंदू मंदिरांसह मालमत्तांच्या नरसंहाराची दाहक आकडेवारी सर्वस्वी मन विषण्ण करणारी अशीच. आजच्या दुसर्या भागात बाबरी पतनानंतर हिंदूंवर झालेले जीवघेणे हल्ले आणि या एकूणच घटनाक्रमात इस्लामी ताकदींनी माध्यमांचा नॅरेटिव्ह सेटिंगसाठी केलेला यथायोग्य वापर, याचा केलेला हा पदार्फाश...
डिसेंबर १९९२च्या बाबरी ध्वस्तीकरणाच्या अगोदर व नंतर भारतासह पाकिस्तान व बांगलादेशात हिंदूंना नृशंस अत्याचाराला सामोरे जावे लागले. हजारोंच्या संख्येने मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. हिंदू बांधवांची घरे, दुकाने अशा मालमत्तांनाही धर्मांधांनी लक्ष्य केले. तेव्हा, दि. २२ जानेवारीच्या अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदूंवरील या अनन्वित अत्याचारांचे स्मरण करणे क्रमप्राप्त ठरावे.
ज्ञानवापीत सर्वेक्षणसाठी पाचव्या दिवशी, दि. ८ ऑगस्ट रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) पथक पोहचले आहे. आज ASI टीमचे लक्ष व्यासाच्या खोलीवर आणि पश्चिमेकडील भिंतीजवळ साचलेल्या मलब्यावर असेल. याशिवाय तळघरही आज उघडू शकते.
वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षणात दि. ६ ऑगस्टपासून सुरू आहे.त्याचवेळी ज्ञानवापीत हिंदू पक्षकारांनी खंडित मूर्ती, तुटलेले खांब, खंडित कलाकृती, त्रिशूल आणि कलशाची अनेक चिन्हे इत्यादी आढळल्याचा दावा केला आहे. मात्र, एका इमामने हा दावा फेटाळून लावला आहे.
ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्व सर्वेक्षणाविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून निर्णय येण्याची अपेक्षा आहे. वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्व सर्वेक्षणास आव्हान देणारी मुस्लिम पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्विकारली आहे. त्यावर आता आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयात यापूर्वी हिंदू पक्षातर्फे दोन कॅव्हेटदेखील दाखल करण्यात आल्या आहेत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे २४ सदस्यीय पथक ज्ञानवापीचे आज सर्वेक्षणाचे करणार आहे. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नाही म्हणून शहरात प्रशासन हाय अलर्टवर असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सोमवारपासून (२४ जुलै २०२३) होणार्या या सर्वेक्षणात हिंदू पक्षाने सहकार्याचे आश्वासन दिले असले तरी मुस्लिम पक्षाने सर्वेक्षणाची तारीख वाढवण्याची मागणी केली होती.
वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे (एएसआय) करण्यात येत असलेल्या ज्ञानवापी मशीद परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बुधवारपर्यंत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलाचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचा आदेश वारणसी जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणास (एएसआय) दिला आहे. सर्वेक्षणाचा अहवाल ४ ऑगस्टपर्यंत सादर करायचा आहे.
वेरूळ लेण्यांच्या समोर उभारण्यात आलेला कीर्तिस्तंभ हटवण्यास जैन समाजाने विरोध केला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने वेरूळ लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलेला जैन कीर्तीस्तंभ हटवण्याची सूचना केली होती
काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानव्यापी मशिदीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार वाराणसी दिवाणी न्यायालयाचा आदेश ; राज्य सरकार करणार खर्च
एएसआय अहवालावर सुनावणी नाही
अमेरिकेतल्या शालेय पाठ्यपुस्तकातून ‘आर्यांचे आक्रमण’ ही संकल्पना काढून टाकण्यात आली आहे. आपल्याकडचे विद्वान नि विचारवंत मात्र सगळ्या नव्या संशोधनाकडे साफ दुर्लक्ष करून व्हिन्सेंट स्मिथ साहेबांचे जुनचे धडे गिरवत आहेत. आता या अंधश्रद्धेचं निर्मूलन कुणी करायचं?