आसाममध्ये १ लाख ६६ हजार अवैध घुसखोरांची ओळख पटली आहे. यामध्ये ३० हजार १०० हून अधिक राज्यातील निर्वासितांना राज्यातून हद्दपार करण्यात आले आहे. आसाम कराराच्या अंमलबजावणीबाबत काँग्रेसचे आमदार अब्दुल रहीम अहमदने या संबंधित प्रश्न केला होता. त्यापार्श्वभूमीवर आता मंत्री अतुल बोराने या प्रकरणाची माहिती मिळवली. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत असामच्या अवैधपणे १ लाख ६५ हजार ५३१ घुसखोरांबाबत माहिती समोर आली.
Read More
Ramayana सुदूर पूर्वोत्तर भारतातील आसाममधील राजकवी माधव कंदलीचे रामायण, ‘असामिया’ साहित्यातील पहिले रामायण महाकाव्य आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या आधी 14व्या शतकात, हा राजकवी होऊन गेला. त्याचे रामायणातील फक्त पाच कांड उपलब्ध आहेत. पुढील काळात, थोर संत शंकरदेव यांनी उरलेली आदिकांड, उत्तरकांड लिहून माधव कंदलांचे रामायण पूर्ण केले आहे.
Hanuman आसामच्या श्री भूमी जिल्ह्यामध्ये भगवान हनुमंतांचे प्राचीन मंदिर आढळले आहे. त्याच्या जतनासाठी स्थानिक लोकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाथरकांडीतील बिरबारीमधील लंगाई नदीजवळ उत्खननादरम्यान हे मंदिर सापडले आहे. मंदिरामागे हनुमान चालीसा कोरलेली दिसत आहे.
Bangladeshi terrorist इस्लामिक कट्टरवादी असलेल्या बांगलादेशातील आतंकवाद्यांना आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बांगलादेशास लागून असलेल्या धुबरी जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे एकूण अटकेची संख्या आता १४ वर गेली आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. ताब्यात घेतलेल्या आतंकवाद्याचे नाव हे अजिबर रहमान असून वय वर्षे ३१ आहे. ही अटक दि : १९ जानेवारी २०२५ रोजी घडली होती.
आसाम राज्यातील त्रिपुरामध्ये एकूण ८ बांगलादेशी घुसखोरांना सुरक्षा रक्षकांनी अटक करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये चार घुसखोरांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्रिपुरामध्ये घुसखोरांसोबत एका दलालाही पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी घुसखोरांना रेल्वे स्थानकाजवळ पकडण्यात आले असून ते भारतातील इतर भागांमध्ये जाणार होते अशी माहिती आता समोर आली.
बालविवाहासारख्या क्रुर प्रथेविरोधात आसाम सरकारने कठोर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेतला आणि याचा सकारत्माक परिणाम आता दिसू लागला आहे. गेल्या २ वर्षात आसाम पोलिसांनी ५३४८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्याच बरोबर ५८४२ गुन्हे नोंदवले आहेत. आसाम पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये बालविवाहाच्या विरोधातील मोहीम पोलिसांनी हाती घेतली होती. आसाम पोलिसांनी पहिल्या फेरीत एकूण ३४२५ जणांना ताब्यात घेतले होते. दुसऱ्या फेरीमध्ये ९१३ जणांना अटक केली होती.
बांगलादेशी बॉर्डर गार्डिंग फोर्स (BGB) च्या काही सैनिकांनी आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवर असणाऱ्या एका हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम थांबवल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. नमाजानंतर मंदिर पाहणे हे 'हराम' असल्याचे कारण देत मंदिराचे काम बंद पाडले. या अश्या कृत्यामुळे बांगलादेशी सरकारने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन तर केलेच. परंतु यामुळे युनुस सरकारच्या हिंदूंविरोधी असणारा इस्लामिक कट्टरतावादाचा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
Beef Ban आसाम भाजप सरकारने गोमांसवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी याची घोषणा केली. ते म्हणाले की, राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये गोमांसवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोमांसचा वापर करू शकत नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले की, याआधी मंदिराच्या ५ किलोमीटरच्या अंतरावर गोमांस खाण्यास बंदी होती, मात्र आता संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी याप्रकरणात व्यप्ती वाढवली जात आहे.
separating Assam सीसीए-एनआरसी विरोधात आसामचे भारतापासून विभाजन करण्याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांपासून शरजील तुरूंगात असताना त्याची बहीण फराह निशात न्यायिक सेवा उत्तीर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशातच आता शरजीलची बहीण न्यायाधीश झाली असून आता अत्याचाराविरूद्ध न्याय देणार असल्याचे बोलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टवरून सांगण्यात येत आहे की, शर्जील इमामच्या भावाने सोशल मीडियावर आसामची भारतापासून विभागणी व्हावी अशी वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे.
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी राज्याच्या ‘करीमगंज’ ( Karimganj ) जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. हा जिल्हा आता ‘श्रीभूमी’ म्हणून ओळखला जाईल.
प्रतिकूल हवामानाचा फटका आता चहा प्रेमींना बसण्याची शक्यता आहे. देशभरातील चहा प्रेमींना चहाकरिता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. चहा उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपनी टाटा कन्झ्युमरने यासंदर्भात भाष्य केले आहे.
आसाम येथील कारमेल शाळेत स्थानिक हिंदू विद्यार्थ्यांना गोमांस खाऊ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत कारमेल शाळेच्या प्रशासनाकडे याप्रकरणी तक्रार केली असता, त्यांनी याप्रकरणाची दखल घेण्याऐवजी विद्यार्थ्यांना धमकावले आहे. ही बाब मुलांच्या पालकांना समजताच त्यांनी या घडलेल्या घटनेसंबंधात एफआरआय दाखल केली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली.
Assam minor gang-rape case अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आसाम येथील आरोपीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या पोलिसांनी आरोपी तफझुलच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला २४ ऑगस्ट रोजी सकाळी पहाटे ४ वाजता घटनास्थळी आणण्यात आले होते. त्यावेळी त्याने आपला जीव वाचवण्याकरीता तलावात उडी घेतली. त्यामुळे आरोपी तफझूलचा तलावाच्या पाण्यात मृत्यू झाला.
Sexual Harassment लैंगिक अत्याचाराचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. पं. बंगालच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये लहानग्या मुलींवर अत्याचार कऱण्यात आला होता, त्यानंतर अकोल्यातही हाच प्रकार घडला आहे. त्यानंतर आता देशातील आसाम येथे अशीच घटना घडली आहे. शाळेतील विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घराकडे निघाली असताना एका रिक्षा चालकाने तिच्यासमोर अश्लील चाळे केले असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना १९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
दि. ३० जुलै रोजी केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली. त्यामुळे जनजीवन आणि दळणवळण देखील विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्य परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून केरळ राज्याला १० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिकसने देशात चिप उत्पादनात मोठी गुंतवणूक केली आहे. आसाम राज्यात टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट या अंतर्गत आसाममधील जागीरोड येथे प्लांट उभारणार असून याचे भूमीपूजन सोहळ्याकरिता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना लक्षात घेता, त्याविरोधात कठोर कायदे करण्याची गरज वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. त्याअनुषंगाने आसामचे मुख्यमत्री हिमंता बिस्व सरमा यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी आणखी कडक शिक्षेची तरतूद करणारे विधेयक विधानसभेच्या अधिवेशनात आणणार असल्याची घोषणा केली आहे. त्याविषयी...
केंद्र सरकारने ईशान्य भारतात दळणवळण मजबूत करण्यासाठी आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये नव्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
जूनमध्ये विश्रांती घेतल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पावसाने धुवाधार बरसात सुरू केली आहे. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कहर केला असून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच, पुढेही पाऊस वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील सर्व नद्यांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. 90 पेक्षा अधिक छोटे-मोठे रस्ते बंद आहेत. उत्तराखंडमध्ये वाहने आणि दुचाकी वाहात आहेत. बिहारमध्ये तर याहून भीषण परिस्थिती असून पावसाचा सर्वाधिक कहर उत्तराखंडमध्ये झाला आहे.
आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये पोलिसांनी मोहम्मद बिलाल हुसेन नावाच्या गुन्हेगाराला अटक केली आहे. बिलाल एका मुलीला आणि तिच्या मैत्रिणींना सायबरस्टॉक करत होता. तो युवतीचे आणि तिच्या मित्रांचे मॉर्फ केलेले आणि अश्लील फोटो बनवून इंटरनेटवर शेअर करून मुलीला त्रास देत होता. बिलालच्या कृत्याला कंटाळून तरुणीने पोलिसांत तक्रार केली होती.
आसाम सरकारने २०२२ मध्ये सुमारे ४० लाख मूळ आसामी मुस्लीम असल्याचे आणि बांगलादेशातून आलेले बंगालीभाषी मुस्लीम वेगळे असल्याचे म्हटले होते. आसाममधील हा वाद तसा जुना आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी बंगालीभाषी स्थलांतरित मुस्लिमांपुढे ज्या अटी ठेवल्या आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या काळात आसाममधील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) संदर्भात मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, एनआरसीसाठी अर्ज न करता, एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळाले तर ते राजीनामा देणारे पहिले व्यक्ती असतील. वास्तविक, देशात सीएए लागू झाला आहे. त्याचवेळी आसाममध्ये याला विरोध होत आहे. आंदोलकांच्यामते, यामुळे बाहेरच्या लोकांचा राज्यात पूर येईल.
"काँग्रेसवाल्यांनो ऐका, जोपर्यंत मी हिमंता बिस्वा सरमा जिवंत आहे, तोपर्यंत आसाममध्ये लहान मुलींचे लग्न होऊ देणार नाही. मुस्लिम समाजाच्या मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही लोकांनी उघडलेले दुकान आम्ही पूर्णपणे बंद केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही." असे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना केले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. काँग्रेस पक्षाला देशातील अनेक राज्यातून राजकीय धक्के बसत आहेत. तीन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तर आता आसाम काँग्रेसला सुद्धा मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे. आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे.
'आसाम को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँक लिमिटेड'अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. 'आसाम को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँक लिमिटेड'मधील पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज नेते असलेल्या मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आसाममधील अपूर्वा भट्टाचार्य यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्यापूर्वी रविवारी काँग्रेसला हा दुहेरी झटका बसला आहे. अपूर्वा भट्टाचार्य हे आसामध्ये काँग्रेसचे आसाममध्ये सचिव होते.
‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा), केंद्र आणि आसाम सरकार यांच्यात नुकताच त्रिपक्षीय शांतता करार झाला. यासंबंदी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा उपस्थित होते. त्यानिमित्ताने ईशान्य भारतातील शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सर्वार्थाने ऐतिहासिक ठरलेल्या या कराराचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ४० वर्षांत प्रथमच आसाममधील सशस्त्र बंडखोर संघटना उल्फाने केंद्र सरकार आणि आसाम राज्य सरकारसोबत शांतता करार केला.
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह राज्याचे सचिवही उपस्थित होते.
आसाममधील फिरदौस नावाच्या एका स्थलांतरित मजुराने केरळमधील एर्नाकुलममध्ये एका ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला फेकून दिले. आरोपी फिरदौसला अटक करण्यात आली असून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ डिसेंबर २०२३ बुधवारी घडली.आहे. फिरदौसने अलप्पुझा येथील एका महिलेला मार्ग दाखवण्याच्या बहाण्याने एर्नाकुलम उत्तर रेल्वे स्थानकाच्या दिशेने नेले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
महादेव ॲप आणि कुख्यात दहशतवादी दाऊदच्या भागीदाराशी संबंधित बांधकाम प्रकल्पाला पैसे पुरवणाऱ्या रशेश शहा आणि त्यांच्या एडलवाईस कंपनीतील व्यवहारांची येत्या दोन महिन्यांत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
अराजकवादी दि. १३ डिसेंबर रोजी संसदेत घुसले. तेव्हा राहुल गांधी काय करत होते, याबाबत काँग्रेसी नेता सुप्रिया श्रीनेत यांनी एक्स आणि ट्विटरवर पोस्ट टाकली. त्यांनी राहुल गांधींच्या फोटोसोबत लिहिले की,”डरो मत। कहते ही नहीं, बल्कि करके भी दिखाते हैं। जब संसद में हंगामा हुआ, तब सीना फुलाकर खड़े थे नेता।” यावर नतद्रष्टांनीही मतं व्यक्त केली.
आसाममधील मुस्लिमांचे सर्वसमावेशक सामाजिक-आर्थिक मूल्यमापन करण्याचा निर्णय तेथील हिमंता बिस्वा सरमा सरकारने घेतला आहे. विकासापासून दूर राहिलेल्या मुस्लिमांचा सर्वांगीण विकास करणे, त्यामुळे शक्य होणार आहे. सामाजिक तसेच आर्थिक अडचणींना सामोरे जात असलेल्या या समाजाच्या विकासाला चालना देण्यासाठीच हे मूल्यांकन करण्यात येत आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मनाभजी आचार्य यांचे शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभाविप, भाजप मुंबई आणि विद्यानिधी शिक्षण संकुल यांच्यातर्फे मुंबईत दि. ०२ डिसेंबर रोजी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, अभाविपचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे, राष्ट्रीय स्वयंसेवक
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सशस्त्र क्रांतीचे जे प्रयत्न झाले, ते केवळ शहरी भागापुरते मर्यादित नव्हते. दुर्गम भागात राहणार्या वनवासी बांधवांचे याबाबत असलेले योगदान अतिशय मोठे. पण, दुर्दैवाने अज्ञात राहिलेले आहे. जेव्हा-जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला, तेव्हा-तेव्हा वनवासी बांधवांनी इंग्रजांचा कडवा प्रतिकार केला. अशा घटना 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीपासून घडत आलेल्या आहेत. गुजराथ, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र, आसाम, मेघालय, नागालॅण्ड, ओडिशा आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांत अनेक वनवासी क्रांतिका
कामाख्या शक्तीपीठाचे व्यवस्थापन करणारी विद्यमान यंत्रणाच योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मंदिराचे पुजारीच कामाख्या शक्तीपीठाते व्यवस्थापन करणार आहेत.
आसामवासींसाठी श्रद्धेचे स्थान असलेल्या कामाख्या देवीचे मंदिर आता लवकरच महाराष्ट्रात बांधणार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. पत्रसूचना कार्यालयाने (पीआयबी) महाराष्ट्रातील काही पत्रकारांचा मेघालय व आसाम या ईशान्येतील दोन राज्यांचा दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात काही पत्रकारांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वशर्मा यांची येथील सचिवालयात भेट घेतली. या वेळी हिमंता यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधत ही माहिती दिली.
केरळ पोलिसांनी १० दिवसांच्या निष्पाप बाळाची हत्या केल्याप्रकरणी आसाममधून दोघांना अटक केली आहे. मक्सिदुल इस्लाम आणि मुशिदा खातून अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गळा दाबून बाळाची हत्या केली आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत मृतदेह गुंडाळून फेकून दिला होता.
नागभूमीचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे दि. १० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. १९९५ ते २००१ मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस म्हणुन जबाबदारी आचार्य यांनी जबाबदारी साभाळली होती. त्याना पुर्वांचलातील सात भगिनी राज्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी या सर्व राज्यांत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले होते. आचार्य यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच नागभूमी, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम राज्याचे राज्यपाल पद भुषवले.
नागभूमीचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे दि. १० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे ईशान्य भारताला संपुर्ण देशाशी जोडणारा दुवा निखळला. त्याचबरोबर ईशान्य भारतातील तरुणांना देशातील तरुणाईशी समकक्ष बनविण्यात पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचा सिंहाचा वाटा होता, असे विधान उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नवी दिल्ली येथे शुक्रवारी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. संरक्षण आणि धोरणात्मक विषयांशी संबंधित अनेक मुद्यांवर दोन्ही मंत्र्यांनी सर्वसमावेशक चर्चा केली.
त्रिपुरातून रेल्वेने आसाममध्ये पोहोचलेल्या ४५० रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्यात आले. आसामचे विशेष डीजीपी (विशेष पोलीस महासंचालक) हरमीत सिंग यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाच्या मदतीने अवैध घुसखोरांना परत पाठवण्यात आले. जुलैमध्ये, आसामच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) ऑपरेशन सुरू केले. यात अवैध घुसखोरी आणि मानवी तस्करीत सक्रिय दलाल शोधण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
अविनाश हजारिका... ज्यांनी स्वतः स्वावलंबी होण्याबरोबरच गावकर्यांनाही स्वावलंबनातून समृद्धीचा मार्ग दाखवत त्यांच्या आयुष्याचा कायापालट केला, अशा माणसाची ही यशोगाथा...
आसाममधील बंगाली मुस्लिमांचा पक्ष म्हटल्या जाणार्या एआययूडीएफचे अध्यक्ष आणि आसामच्या जमियत उलेमाचे प्रमुख मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी मुस्लिमांना गुन्हेगारीत अव्वल स्थान दिले आहे. आसाममधील धुबरी येथील लोकसभा खासदार बदरुद्दीन यांनी म्हटले आहे की, बलात्कार, दरोडा, चोरी आणि दरोड्यासारख्या गोष्टीत मुस्लिम प्रथम क्रमांकावर आहेत. तुरुंगात जाण्याच्या बाबतीतही मुस्लिम पहिल्या क्रमांकावर आहेत. हे मुस्लीम मुलांना शिक्षण घ्यायचे नसल्यामुळे असे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आसाम सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आसाममधील कर्मचाऱ्यांना त्यांचा जोडीदार जिवंत असेपर्यंत दुसरे लग्न करता येणार नाही. हा नियम सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू असून धर्माच्या आधारे यात कोणालाच सूट देता येणार नसल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत दीड हजार निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तरीही काही लोकं पॅलेस्टाईनच्या नावाखाली हमासला समर्थन देत आहेत. अशा लोकांना आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्येही जातीव्यवस्था असून, त्यात काही पुढारलेल्या, तर काही मागास जाती आहेत. आता मुस्लिमांना मिळणार्या अनेक सवलती या गरजूंनाच मिळत आहेत का, ते निश्चित करण्यासाठी आसाममधील मुस्लिमांच्या पाच प्रमुख जातींचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून त्यांची सामाजिक स्थिती काय, ते निश्चित केले जाणार आहे. यामुळे सरकारी योजनांचा खरा लाभ गरजूंना मिळेल आणि लांगूलचालनाच्या राजकारणाला चाप बसेल.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी १० सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. त्यासोबत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख 'बनावटी नेते' असा केला. एका मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, “जेव्हा मते गोळा करण्याची वेळ येते तेव्हा काँग्रेसचे लोक भारत जोडो यात्रा काढतात. कर्नाटक निवडणुका संपल्या की ते 'इंडिया' झाले.
राज्यात बालविवाह करणाऱ्या अथवा त्याच्याशी संबंध असणाऱ्या ३ हजार व्यक्तींना येत्या दहा दिवसात अटक केली जाणार आहे, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या कार्यकारिणीचे आयोजन आसाममध्ये करण्यात आले होते. कार्यकारिणीच्या समारो आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्या उपस्थितीत झा