वस्तीपातळीवर विकासात्मक काम उभे राहावे, यासाठी डोंबिवलीमध्ये लोकसहभागातून सातत्याने कार्यरत असलेले अमेय काटदरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा मागोवा...
Read More
आप्पा जोशींची ही विशेष मुलाखत, त्या सगळ्यांसाठी ज्यांना वाटतं, पालघरमध्ये दोन संतांची हत्या झाली, ती निव्वळ गैरसमजातून. आप्पांनी अनेक वर्षे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात सेवाकार्य केले आणि तेव्हा त्यांच्यावरही असाच जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. म्हणूनच पालघरच्या या साधू हत्यांकाड प्रकरणातील ‘कम्युनिस्ट कनेक्शन’चा आप्पांनी केलेला हा पर्दाफाश...
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मन सुन्न अवस्थेत असतानाच 'फॅमिली स्टोअर्स'चे अप्पा जोशी गेल्याची बातमी कानावर आली. मन अधिकच सुन्न झाले. 'विवेक'च्या कामामुळे माझा अप्पा जोशींशी सतत संपर्क येत असे. त्यातून अप्पा जोशींशी माझा स्नेहबंध जुळत गेला आणि पुढे तो एकदम घट्ट झाल्याचा अनुभव मला येऊ लागला होता. अप्पांनी आपल्या जन्माचा सोहळा केला होता असे मी म्हणेन.
आप्पा जोशींनी ठाणे परिसरात जल संधारण, कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत, शोषखड्डा असे अनेक प्रयोग राबविले आहेत. यासोबतच त्यांनी साप्ताहिक विवेकची जबादारीही सांभाळली होती.
मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीला सार्थ करत अप्पा जोशी या व्यक्तीची नव्हे, तर त्या व्यक्तीच्या ध्येयवादी कार्याची गाथा म्हणजे ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’ म्हणू शकतो.