देशातल्या बड्या उद्योगपतीवर दुःखाचा प्रसंग ओढावला आहे. वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. अनिल अग्रवाल यांनी एक्स वर यासंदर्भात पोस्ट केली असून "आज आमच्या आईने मोक्षाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तिच्याशिवाय मला अपूर्ण वाटेल, आणि तिची उणीव भरून काढता येणार नाही, अशा शब्दात शोक व्यक्त केला आहे.
Read More
वेदांता ग्रुप आपल्या व्यवसायांच्या प्रस्तावित विलगीकरणासह पुढे जात अन्य सहा कंपन्यांना वाट मोकळी करून देईल, असे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सांगतिले आहे. तसेच, वेदांता ग्रुपच्या या निर्णयामुळे सहा स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करण्याच्या कंपनीच्या योजनेतील एक महत्त्वाचे पाऊल असेल.
वेगवेगळ्या कारणांनी वेंदाता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल चर्चेत असतात आता त्यांच्या मुलीच्या विधानाने नवीन चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीत अग्रवाल यांनी कन्या प्रिया अग्रवालने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'लंडनमध्ये मी वंशवादाची व गुंडगिरीची शिकार झाली असताना असे शाळेत बरे वाईट अनुभव आले.' असे धक्कादायक विधान प्रिया अग्रवालने केले आहे. या मुलाखतीत तिने आपला प्रवास विस्तृतपणे सांगितला होता.
आघाडीची मायनिंग कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या वेदांता (Vedatna) कंपनीने आणि ६ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. तसे वृत्तसंस्थेने म्हटल्याप्रमाणे,अल्युमिनियम,झिंक,स्टील,तेल गॅस अशा विविध उत्पादन घेणाऱ्या वेंदाता कंपनीने ६ अब्ज डॉलर उभे करण्याचे ठरवले आहे. गुंतवणूकदारांच्या बैठकीत कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अग्रवाल संचलित आपल्या कंपनी वेंदातानचा काही भागभांडवल राजीव जैन यांच्या जीक्यूसी पार्टनरला विकणार असल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या काही दिवसांत यांची अंमलबजावणी होणार आहे. याबद्दल संपूर्ण चर्चा झाली असून १ अब्ज डॉलरला हा व्यवहार होण्याची माहिती समोर येत आहे.
नैसर्गिक ऊर्जा संसाधने व तंत्रज्ञान कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेदांतांचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सीएनबीसी १८ शी बोलतांना ' कंपनी २०२४ पर्यंत आपली सगळी देणी चुकवेल' असे विधान केले आहे. वेदांतांचे मुख्य कार्यालय इंग्लंड येथे असून वित्तीय तरतूद झाली असून थकबाकी २०२४ पर्यंत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०२४ मध्ये १ बिलियन हून अधिक रक्कम कंपनीला देय आहे. याच धर्तीवर अनिल अग्रवाल यांनी स्टीलची विक्री करून प्रश्न निकाली काढण्यात असल्याचे सांगितले आहे.